शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

बावनथडी पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली ...

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, पुलावरून हलके वाहनाची वाहतूक सुरू झाली असताना पुलावरून पुन्हा वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांत रोष आहे. परिणामी, पुलावर बॅरिकेटिंग उभारून सात फूट उंचीच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांना दिले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. ३५ वर्षांपासून पुलाची देखरेख झाली नाही, तसेच नागपूर- मनसर-सिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सुरू असल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक बावनथडी नदीपुलावरून वळविण्यात आली होती. परिणामी, अतिभाराचे ट्रक, तसेच मोठ्या वाहनांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अधिभाराची वाहतूक होत असल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला. पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली होती. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूल बंद केले होते. त्यामुळे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५० किलोमीटरचा फेरा घालावा लागत होता. परिणामी, नातेवाईक, शेतकरी, व्यापारी, कामगारांचे जीवन प्रभावित झाले होते. बावनथडी पूल आजही साबूत आहे. केवळ त्याचे मेंटेनन्स झाले नाही. त्यामुळे पुलाखालील स्प्रिंग निकामी झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी पुलावरील सर्व वाहतूक तडकाफडकी बंद केली होती. पुलावरून हलके वाहनाच्या वाहतुकीस परवानगी घ्यावी, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे पुलावरून हलके वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस विभागाला त्या संदर्भात कसलेही पत्र प्राप्त न झाल्याने, पोलिसांनी लॉकडाऊन लागल्यानंतर नाली खोदून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. परिणामी, कोरोना काळात दोन्ही राज्यांतील नागरिक प्रभावित झाले असताना, खासदार प्रफुल पटेल कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी व खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्याबाबत आढावा बैठकीसाठी रविवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, ही बाब रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खासदार पटेल यांच्या निर्देशनास आणून देताच, त्यांनी कोरोना काळात आंतरराज्यीय मार्ग बंद न करता सात फूट उंचीचे वाहन जाईल, असे बॅरिकेटिंग उभारून हलके वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच वाहतूक पूर्वरत होणार असल्याने, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.