शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली ...

तुमसर : बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, पुलावरून हलके वाहनाची वाहतूक सुरू झाली असताना पुलावरून पुन्हा वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांत रोष आहे. परिणामी, पुलावर बॅरिकेटिंग उभारून सात फूट उंचीच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांना दिले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. ३५ वर्षांपासून पुलाची देखरेख झाली नाही, तसेच नागपूर- मनसर-सिवनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे बांधकाम सुरू असल्यामुळे, या मार्गावरील वाहतूक बावनथडी नदीपुलावरून वळविण्यात आली होती. परिणामी, अतिभाराचे ट्रक, तसेच मोठ्या वाहनांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अधिभाराची वाहतूक होत असल्यामुळे सदर पुलाला धोका निर्माण झाला. पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली होती. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूल बंद केले होते. त्यामुळे दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५० किलोमीटरचा फेरा घालावा लागत होता. परिणामी, नातेवाईक, शेतकरी, व्यापारी, कामगारांचे जीवन प्रभावित झाले होते. बावनथडी पूल आजही साबूत आहे. केवळ त्याचे मेंटेनन्स झाले नाही. त्यामुळे पुलाखालील स्प्रिंग निकामी झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व आरटीओ विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी पुलावरील सर्व वाहतूक तडकाफडकी बंद केली होती. पुलावरून हलके वाहनाच्या वाहतुकीस परवानगी घ्यावी, अशी मागणी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह रायुकाँ तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे पुलावरून हलके वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस विभागाला त्या संदर्भात कसलेही पत्र प्राप्त न झाल्याने, पोलिसांनी लॉकडाऊन लागल्यानंतर नाली खोदून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. परिणामी, कोरोना काळात दोन्ही राज्यांतील नागरिक प्रभावित झाले असताना, खासदार प्रफुल पटेल कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी व खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्याबाबत आढावा बैठकीसाठी रविवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, ही बाब रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खासदार पटेल यांच्या निर्देशनास आणून देताच, त्यांनी कोरोना काळात आंतरराज्यीय मार्ग बंद न करता सात फूट उंचीचे वाहन जाईल, असे बॅरिकेटिंग उभारून हलके वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच वाहतूक पूर्वरत होणार असल्याने, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.