शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

रोहयोची कामे तात्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी धान पिकाच्या शेतात घुसले तसेच सततच्या पावसामुळे धान पिकावर ...

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी धान पिकाच्या शेतात घुसले तसेच सततच्या पावसामुळे धान पिकावर करपा, तुडतुडे यासारख्या इतर वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक उद्‌ध्वस्त झाल्यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बँका तसेच सावकारी कर्ज कसे फेडावे, मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार कसा करावा आणि रोजगारा अभावी वितभर पोटाची खळगी कशी भरावी, येणाऱ्या खरीप हंगामात शेतीची मशागत कशी करावी असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे.

खरीप हंगामातील शेतकामे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले असून रोजगार मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. संबंधित विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस.के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, अरुण ठवरे, दामोदर उके, संदीप बर्वे, बंडू फुलझेले, अंबादास नागदेवे,रक्षानंद नंदागवळी, मंगेश मेश्राम, नितीश काणेकर, नत्थु वाघमारे यांनी रोजगार हमी योजना मंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.