शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

रोहयोची कामे तात्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी धान पिकाच्या शेतात घुसले तसेच सततच्या पावसामुळे धान पिकावर ...

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी धान पिकाच्या शेतात घुसले तसेच सततच्या पावसामुळे धान पिकावर करपा, तुडतुडे यासारख्या इतर वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक उद्‌ध्वस्त झाल्यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे बँका तसेच सावकारी कर्ज कसे फेडावे, मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार कसा करावा आणि रोजगारा अभावी वितभर पोटाची खळगी कशी भरावी, येणाऱ्या खरीप हंगामात शेतीची मशागत कशी करावी असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे.

खरीप हंगामातील शेतकामे आटोपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले असून रोजगार मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. संबंधित विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत संबंधित विभागाच्या यंत्रणेने वेळीच दखल घेऊन लाखनी, लाखांदूर, साकोली, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस.के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमणे, अरुण ठवरे, दामोदर उके, संदीप बर्वे, बंडू फुलझेले, अंबादास नागदेवे,रक्षानंद नंदागवळी, मंगेश मेश्राम, नितीश काणेकर, नत्थु वाघमारे यांनी रोजगार हमी योजना मंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.