शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे३५ हजार पात्र लाभार्थी : सिल्ली-शहापूर येथे आधार प्रमाणीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सोमवार पासून जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. सिल्ली व शहापूर येथे प्रायोगीक तत्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार ३२५ लाभार्थी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. शहापूर ग्रामपंचायतीच्या सरकार सेवा केंद्रात जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात १ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली २ लाखापर्यंत रक्कम आहे. अशांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडील १० हजार ११० व भंडारा जिल्हा सहकारी बँकेने २५ हजार २१५ लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. पात्र शेतकरी सभासदांनी आपले नावे असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.शेतकरी म्हणतात, कर्जमुक्तीचा आनंद मोठाशहापूर येथील शेतकरी कमलाबाई रुपचंद हजारे म्हणाल्या, माझ्यावर सोसायटीचे १ लाख ५४ हजार ६७१ रुपये कर्ज होते. शासनाने कर्जमुक्ती दिली आहे. प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाही. आज आधार प्रमाणिकरण पावती मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, असे त्या म्हणाल्या.