शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे३५ हजार पात्र लाभार्थी : सिल्ली-शहापूर येथे आधार प्रमाणीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सोमवार पासून जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. सिल्ली व शहापूर येथे प्रायोगीक तत्वावर कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार ३२५ लाभार्थी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. शहापूर ग्रामपंचायतीच्या सरकार सेवा केंद्रात जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, भंडारा जिल्हा सहकारी व्यवस्थापक संजय बुरडे व सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे यांनी सभासदांना कर्जमुक्ती योजनेची आधार प्रमाणिकरण पावती दिली. सिल्ली व शहापूर येथे २४० सभासद आहेत. कर्जमुक्तीचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेला प्रारंभ झाला असून उर्वरीत सभासदांची यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या शहापूर शाखेत उपनिबंधक मनोज देशकर यांनी कर्जमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला.महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात १ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली २ लाखापर्यंत रक्कम आहे. अशांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडील १० हजार ११० व भंडारा जिल्हा सहकारी बँकेने २५ हजार २१५ लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. पात्र शेतकरी सभासदांनी आपले नावे असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.शेतकरी म्हणतात, कर्जमुक्तीचा आनंद मोठाशहापूर येथील शेतकरी कमलाबाई रुपचंद हजारे म्हणाल्या, माझ्यावर सोसायटीचे १ लाख ५४ हजार ६७१ रुपये कर्ज होते. शासनाने कर्जमुक्ती दिली आहे. प्रक्रिया सुलभ व जलद होती. कार्यालयात चकरा माराव्या लागल्या नाही. आज आधार प्रमाणिकरण पावती मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, असे त्या म्हणाल्या.