शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

एसटीला बंदी, जड वाहतुकीस संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:34 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे.

ठळक मुद्देसावित्रींच्या लेकींचा पैदल मार्च : ८०० मीटर पायी प्रवास, शहरातून बसगाड्या नेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे. सकाळी शहरातूनच एसटी जाण्याची गरज आहे. शहरातून एसटी जाण्यास मनाई आदेश नाही तरी मागील अनेक महिन्यांपासून देव्हाडी मार्गावरील बसेस बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात.देव्हाडी-तुमसर मार्गावरील सकाळच्या बसेस विनोबा भावे बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात. त्यामुळे शहीद मंगेश बालपांडे चौकात देव्हाडी मार्गाने येणारे ग्रामीणचे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी येथे उतरतात. सदर चौकातून शाळा-महाविद्यालयाचे सुमारे ८०० ते एक किमी लांब अंतरावर आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांची येथे खूपच गैरसोय होते. विद्यार्थीनींना ते कष्टदायक आहे. दुसरीकडे सकाळी जड वाहतूक शहरातून सर्रास सुरु राहते. सकाळी ८ ते ११ पर्यंत वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती आहे. परंतु अन्य वाहने तर सर्रास शहरातून जातात.देव्हाडी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, देव्हाडा तथा मोहगाव, करडी येथून शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरीता तुमसर शहरात दररोज येतात. त्यांना पैदल मार्चचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी बस शहरातून नेण्याची विनंती बस वाहकास अनेकदा केली. त्याचाही येथे नाईलाज आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांनाही नियमानुसार कामे करावी लागतात. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने किमान सकाळी विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस शहरातून नेण्याची गरज आहे.सकाळी देव्हाडी मार्गाकडून येणाºया बसगाड्या विनोबा भावे बायपास रस्त्याने येतांना विद्यार्थींनींनी तशी मागणी केल्यास शहरातून बसगाड्या आणण्यास काहीच हरकत नाही. याबाबत आमच्याकडे तशी लेखी मागणी कुणी केली नाही.- युधिष्ठीर रामचौरे, आगार प्रमुख तुमसर आगार.देव्हाडी मार्गाने येणाºया सर्वच बसगाडया शहरातून नेण्यात याव्यात. सकाळी शहरातून बसगाडया आणण्यात अडचण नाही. दिवसभर ला शहरातूनच जातात. इतर जड वाहतूक येथे चोवीस तास सुरु राहते. विद्यार्थ्यांना वेठीस धरता कामा नये, लेखी मागणीची वाट पाहण्याची गरजच काय? तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.- डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते तुमसर.