शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

धानाची उचल न झाल्याने फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळी धान निघून तीन-चार महिन्यांचा काळ लोटूनही शासनाने शेतकऱ्यांच्या धानाची ...

भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळी धान निघून तीन-चार महिन्यांचा काळ लोटूनही शासनाने शेतकऱ्यांच्या धानाची उचल केली नाही. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरळीत होण्याची वाट बघत आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करण्यास आधी सरकारकडून विलंब झाला. केंद्र सुरू झाल्यावरही समस्यांचा ससेमिरा मात्र शेतकऱ्यांच्या मागे राहिला. केंद्र सुरू होताच, बारदाने नसल्यामुळे काही केंद्र बंद पडले, काही केंद्रांवरील बारदाने खराब निघाला, अशा एक ना अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये राज्य सरकारने देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नियमित कर्जदारांना पन्नास हजार, तसेच जाहीर केलेला बोनस त्वरित देण्यात त्वरित देण्यात यावा. बारदान्याची व्यवस्था धारगाव आणि खुटसावरी धान खरेदी केंद्रावर त्वरित करण्यात यावी, अन्यथा ग्राम आंदोलन समिती जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचे कोंब फुटलेले धान नेऊन टाकेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. ज्या खरेदी केंद्राकडे स्वतःचे गोडाऊन नसतील, त्यांचे धान खरेदी केंद्र रद्द करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी ग्राम आंदोलन समितीचे संयोजक महेंद्र निंबार्ते, मंगेश वंजारी, संजय भोले, महेश गिऱ्हेपुंजे, सुनील खरवडे, दीपक वंजारी, सचिन पंचबुद्धे, सोनू मरघडे, कुमारने किंदर्ले, प्रकाश वंजारी, साहिल किंदर्ले, दिनेश वंजारी, देवा बोदेले, वाल्मिक वंजारी, मुकेश मेश्राम, आकाश वंजारी, उज्ज्वल गायधने, अनिल वंजारी, सुरेश वंजारी आदी उपस्थित होते.