शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

उभ्या धानाला अंकुरल्या लोंबी

By admin | Updated: October 5, 2016 00:39 IST

शीर्षक वाचून अचंबित झाल्यासारखे वाटते, पण हे सत्य आहे.

नरव्हा येथील प्रकार : संकरीत बायर कंपनीचे ६१२९ जातीचे वाणमुखरू बागडे पालांदूरशीर्षक वाचून अचंबित झाल्यासारखे वाटते, पण हे सत्य आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंदच्या खोऱ्यात नरव्हा येथे उभ्या धानाच्या लोंबीलाच अंकुर फुटले आहे. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून अभ्यासूंची पुरूषोत्तम उपरीकर यांच्या शेतात गर्दी होत आहे.शक्यतो, धान परिपक्व झाल्यानंतर व जमिनीत ओलावा असल्यास धानाला अंकुर येतो. मात्र नरव्हा येथे धान कापणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. धान उभाच असून लोंबी अपरिपक्व आहे. अशा स्थितीत धानाला अंकुर फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचे आश्चर्य वाटत आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाताना पाहून शेतकरी घाबरला आहे. प्रभावित शेतकऱ्याचे नाव पुरूषोत्तम उपरीकर यांनी ‘ब्रायर’ कंपनीचे संकरीत वाण ६१२९ ची यावर्षी लागवड केली. या वाणाची लागवड केल्यानंतर प्रारंभीपासून आतापर्यंत चांगली वाढ झाली. परंतु उभ्या धानपिकाला अंकुर फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. यासंदर्भात उपरीकर यांनी सांगितलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी मुंबईला असल्यामुळे गुरूवारला शेतावर येऊन हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येईल, असे सांगितले. आता या कंपनीचे अधिकारी येऊन कोणती पाहणी करतील आणि निर्णय देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.बायर कंपनीचे ८१२९ संकरीत वाण कृषी केंद्राकडून पक्के बिल घेऊन खरेदी केले आहे. धान अंतिम टप्प्याकडे असून दीड एकरात लागवड केली आहे. सर्व खर्च आटोपून आज धान लोंबीतच अंकुरल्याने नुकसान झाले आहे. कंपनीने नुकसानभरपाई द्यावी.-पुरूषोत्तम उपरीकर, प्रभावित शेतकरी नरव्हा.बियाणातील सदोषता व पावसाळी वातावरणामुळे धान लोंबीतच अंकुरले असावे. लोंबी पूर्णपणे हिरवी असताना कापणी करणे शक्य नाही. त्यामुळे संकट ओढवले आहे. कंपनीने नुकसानीचा पंचनामा करून प्रभावित शेतकऱ्याला न्याय द्यावा.-प्रेमदास कांबळे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था लोहारा/नरव्हा.