शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

उभ्या धानाला अंकुरल्या लोंबी

By admin | Updated: October 5, 2016 00:39 IST

शीर्षक वाचून अचंबित झाल्यासारखे वाटते, पण हे सत्य आहे.

नरव्हा येथील प्रकार : संकरीत बायर कंपनीचे ६१२९ जातीचे वाणमुखरू बागडे पालांदूरशीर्षक वाचून अचंबित झाल्यासारखे वाटते, पण हे सत्य आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंदच्या खोऱ्यात नरव्हा येथे उभ्या धानाच्या लोंबीलाच अंकुर फुटले आहे. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून अभ्यासूंची पुरूषोत्तम उपरीकर यांच्या शेतात गर्दी होत आहे.शक्यतो, धान परिपक्व झाल्यानंतर व जमिनीत ओलावा असल्यास धानाला अंकुर येतो. मात्र नरव्हा येथे धान कापणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. धान उभाच असून लोंबी अपरिपक्व आहे. अशा स्थितीत धानाला अंकुर फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचे आश्चर्य वाटत आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाताना पाहून शेतकरी घाबरला आहे. प्रभावित शेतकऱ्याचे नाव पुरूषोत्तम उपरीकर यांनी ‘ब्रायर’ कंपनीचे संकरीत वाण ६१२९ ची यावर्षी लागवड केली. या वाणाची लागवड केल्यानंतर प्रारंभीपासून आतापर्यंत चांगली वाढ झाली. परंतु उभ्या धानपिकाला अंकुर फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. यासंदर्भात उपरीकर यांनी सांगितलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकारी मुंबईला असल्यामुळे गुरूवारला शेतावर येऊन हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येईल, असे सांगितले. आता या कंपनीचे अधिकारी येऊन कोणती पाहणी करतील आणि निर्णय देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.बायर कंपनीचे ८१२९ संकरीत वाण कृषी केंद्राकडून पक्के बिल घेऊन खरेदी केले आहे. धान अंतिम टप्प्याकडे असून दीड एकरात लागवड केली आहे. सर्व खर्च आटोपून आज धान लोंबीतच अंकुरल्याने नुकसान झाले आहे. कंपनीने नुकसानभरपाई द्यावी.-पुरूषोत्तम उपरीकर, प्रभावित शेतकरी नरव्हा.बियाणातील सदोषता व पावसाळी वातावरणामुळे धान लोंबीतच अंकुरले असावे. लोंबी पूर्णपणे हिरवी असताना कापणी करणे शक्य नाही. त्यामुळे संकट ओढवले आहे. कंपनीने नुकसानीचा पंचनामा करून प्रभावित शेतकऱ्याला न्याय द्यावा.-प्रेमदास कांबळे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था लोहारा/नरव्हा.