शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: August 27, 2015 00:59 IST

जग झपाट्याने बदलतोय आपणही बदलायला पाहिजे. शाश्वत विकासाकरिता तळागाळातला व्यक्ती प्रवाहात येणे गरजेचे आहे.

पालांदूर : जग झपाट्याने बदलतोय आपणही बदलायला पाहिजे. शाश्वत विकासाकरिता तळागाळातला व्यक्ती प्रवाहात येणे गरजेचे आहे. हे होण्याकरिता शासनाचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे नेण्याकरीता शासकीय योजनांची जाण, माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविणे आजची खरी गरज असल्याचे मत माजी जि.प. सदस्य दामाजी खंडाईत यांनी केले.महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित स्वरूपात समाधान योजना शिबिर व महसूल अदालत मंडळ कार्यालय पालांदूर येथे व्यक्त केले. यावेळी मंचावर उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, अध्यक्ष तहसिलदार डी.सी. बांबोरडे, प्रमुख अतिथी उपसभापती विजय कणसे, सरपंच शुभांगी मदनकर, तंमुस हेमराज कापसे, खंडविकास अधिकारी मेहर, पशुवैद्यकीय अधिकारी वाकचौरे, कृषी विस्तार अधिकारी जांभुळकर, कृषी पर्यविक्षक अनिल शहारे, नायब तहसिलदार एस.ए. घारगडे, अश्विनी जाधव आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी उपसभापती विजय कापसे म्हणाले, पालांदूरला नियमित नायब तहसिलदार व एक लिपीक द्या. येथे केवळ वास्तुरूपाने कार्यालय असून चालणार नाही. पालांदूरला पशुवैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे गौपालक संकटात आले आहेत. पंचायत समितीद्वारे ठराव करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी केली आहे. जनतेला त्रास होणार नाही याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यायला हवे.कार्यक्रमात पंचायत समितीतर्फे समाधान योजनेअंतर्गत स्प्रेपंप, ताडपत्री, नायलान जाळी लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले. कृषी विभागातर्फे पाथरी येथील पाच शेतकऱ्यांना अ‍ॅझोला सिटचे वाटप पार पडले. महसूल विभागामार्फत कुटूंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत भारती रतीराम नंदुरकर, राजश्री जांभुळकर, तारा मते, देवला थेर यांना वीस हजार रूपयाचे चेक तहसिलदार डी.सी. बांबोरडे, जि.प. सदस्य वर्षा रामटेके, सरपंच शुभांगी मदनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सातबारा, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, आठ-अ, नकाशा मागणीनुसार देण्यात आले. शेतकऱ्यांच्या अभ्यासाकरीता कृषी विभागाने स्टॉल लावून कृषी मार्गदर्शिका पुस्तकाचे वाटप केले. बचतगट, अंगणवाडी, पशुवैद्यकीय सेवा आदींनी स्वत:च्या कर्तव्याची माहिती उपस्थितांना दिली. मात्र बऱ्याच कार्यालयात पदाचा अनुशेष न भरल्याने कामाचा खोळंबा वाढला आहे. कार्यालयात कामापेक्षा बैठकावर अधिक भर देवून कामाचा व्याप वाढताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा ताळमेळ नसल्याने सुसंवाद हरवला आहे. शासन कामाची आखणी करतो परंतू अंमलबजावणीकडे अपेक्षित लक्ष पुरवित नसल्याने कागदी भार कार्यालयात वाढत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, संचालन विलेश देशमुख, आभार तलाठी नरेश पडोळे पालांदूर यांनी सांभाळले. कार्यक्रमाला शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने हजर होते. तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, इतर कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थितीत होते. (वार्ताहर)