शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्राचीन अवशेषांचे जतन करुन प्रचार करा

By admin | Updated: February 27, 2016 01:00 IST

विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे.

पवनीत व्याख्यानमाला : नंदिनी साहू यांचे प्रतिपादनपवनी : विदर्भात प्राचिन अवशेषांचा खजीना आहे. विदर्भातील ९३ स्थळांना केंद्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग करीत आहे. पर्यटन विकासासाठी पवनीतील प्राचिन अवशेष असलेले स्थळ व प्रसिद्ध मंदिरांचे जतन करून लोकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, असे विचार भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिक्षक डॉ. नंदीनी साहु यांनी व्यक्त केले.पवनीची ऐतिहासिकता काल आणि आज या विषयावरील व्याख्यानमाला दरम्यान त्या बोलत होत्या. त्यांनी पवनी वैभवशाली गाव होते. पुरापाषाण, मध्यपुरापाषाण या कालावधीत येथे मनुष्य प्राण्याचे वास्तव्य होते, असे पुरावे उत्खननात सापडले आहेत. हे गाव बौद्ध धम्माचे फार मोठे गढ होते. येथे उत्खननात सापडलेले भव्य बौद्ध स्तुप त्याची साथ देते. नगराला फार पूर्वी जे महत्व होते ते पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी नागरिकांनी प्राचिन इतिहासाची आवड निर्माण करावी, समजून घ्यावे आणि इतरांना सांगावे तरच पर्यटनाला चालना मिळेल. सन २०१० मध्ये संरक्षीत स्मारकासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. वास्तुपासून ३०० मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभाग परिस्थितीनुरूप काही निर्णय घेत असले अशी माहिती त्यांनी दिली. व्याख्यानात डॉ. प्रियदर्शनी खोब्रागडे, सत्यजीत मौर्य, गजानन कातडे, उमेश मेंढे, आकाश गेडाम यांनी विचार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)