शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोट्यवधी खर्चूनही कालव्याला भगदाड

By admin | Updated: August 25, 2016 00:29 IST

पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी...

पाण्यासाठी शेतकरी त्रस्त : इटियाडोह धरणाचे कालवे बेवारस, निकृष्ट बांधकामाचे परिणामलाखांदूर : पावसाळा असून पाणी नाही, धरण असून पाण्याचे नियोजन नाही. त्यामुळे इटियाडोह व गोसेखुर्द धरणाच्या पाण्याअभावी हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक अखेरची घटीका मोजत असल्याचे भयावह वास्तव बघायला मिळत आहे. लाखांदूर तालुक्याला इटियाडोह धरण व गोसेखुर्द धरणाची मोठी देणं लाभली आहे. चुलबंद व वैनगंगा नदीची भर पुन्हा तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यास मदत मिळणार म्हणून या भागातील शेतकरी आनंदात होता. अत्याधुनिक शेतीच्या तंत्राची जोड व धरणाच्या पाण्याचा वापर यातून आर्थिक प्रगती साधण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आता भंगणार आहे. इटियाडोह धरण कालव्याच्या दुरुस्तीकरिता नाबार्ड योजनेअंतर्गत करोडोचा निधी खर्च करण्यात आला. यातील अर्धेअधिक कामे पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले. निकृष्ट कामे झाल्याने आता ठिकठिकाणी भगदाड पडले. सिमेंट अस्तरीकरणाची कामे पाण्यात वाहून गेली. धरणाचे पाणी बंद केल्यावर शेवटच्या टोकावर पाणी पोहचते. त्यामुळे पाण्याअभावी धान पिक धोक्यात आले आहे. इटियाडोह धरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाले, वाहत आहेत. पाणी वापर संस्था लक्ष देत नसल्याने काही भागातील शेतकरी एक दुसऱ्या कडीला गेट बंद करून पाण्याचा गैरवापर करीत आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी पाणी वापर संस्थाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहेत. त्यामुळे धरणात पाणी असून शेतकऱ्यांना पाण्यासाठी बोंबा माराव्या लागत आहेत. अशी परिस्थिती राहिल्यास यावर्षी धान करपल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी) चौरास भागात गोसे धरणाचे कालवे फुटलेचौरास भागात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे अनेक ठिकाणी अर्धवट बांधकाम करण्यात आले. मुख्य कालव्याला लागून लहान कालव्याचे बांधकाम झाले नाही. आधीच निकृष्ट दर्जाचे केलेल्या बांधकामाला भेगा पडलेल्या असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्याना तडे जाऊन कालवे फुटले. तालुक्यातील मांढळ, ओपारा, गुंजेपार, भागडी, पालपेंढारी, गवराळा, किरमटी, नांदेड, विरली या चौरास भागातील कालवे नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभागाने लक्ष न दिल्यास भविष्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी चौरास भागात मिळणे कठीण जाणार आहे.