शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी कोट्यवधी खर्च केले; पण प्रवास करतो तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले.

चंदन मोटघरेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी - रेंगेपार - चंद्रपूर रस्ता बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, चिखलाबोडीच्या पुढे रस्ता बांधकाम रखडल्याने अनेक प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने सुरक्षित प्रवास जर होऊ शकत नसेल तर हा रस्ता कोणत्या उपयोगाचा, असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे. शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.  अनेक दिवस या रस्त्याचे काम चालले. जेव्हा काम सुरू होते तेव्हा या रस्त्यावरील गावातील लोकांनी किती यातना भोगल्या त्यांचे त्यांनाच माहीत. ते  त्यांनी सहन केले. मात्र, या रस्त्यावर कोट्यवधी खर्च करून साध्य काय झाले,  याचे उत्तर कुणाजवळही नाही.  शासनाचे रुपये खर्च झाले, कंपनीची मात्र चांदी झाली. लाखनीवरून पुढे गेल्यावर चिखलाबोडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर रस्ता तसाच ठेवून शिवालय कंपनी कुठे गेली माहीत नाही. एवढा हा रस्ता असा का ठेवला, त्याचे उत्तरही मिळत नाही.  लाखनीमार्गे जवळचा रस्ता म्हणून प्रवासी या मार्गाने  निघतात. चिखलाबोडी गावाच्या पुढे जातात आणि त्यांना दिसतो चिखल मातीचा भयानक रस्ता. इतक्या दूर गेल्यानंतर पुन्हा त्यांना लाखनीला परत यावे लागते.  त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो. दररोज दहा ते बारा चार चाकी तिथून परत जात आहेत. इतका लांबचा प्रवास करून चिखलाबडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर; परंतु एवढाच रस्ता भयानक आहे.   चंद्रपूरच्या अगदी जवळ  जाऊन परत यावे लागते म्हणून तक्रारी केल्या. सर्व तक्रारी दुर्लक्षित झाल्या.  आजही लोकांची फजिती होतच आहे. चार चाकी गाड्या चिखलात फसत आहेत. जवळपासच्या गावातील ट्रॅक्टर नेऊन गाड्या ओढून काढाव्या लागत आहेत.चार चाकी वाहन चालकांनी या रस्त्याने अभयारण्य कोकामार्गे जाऊ नये, असा बोर्ड तरी निदान शासनाने लावावा, जेणेकरून लोकांची फजिती होणार नाही, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक