शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रस्त्यासाठी कोट्यवधी खर्च केले; पण प्रवास करतो तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले.

चंदन मोटघरेलाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी - रेंगेपार - चंद्रपूर रस्ता बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, चिखलाबोडीच्या पुढे रस्ता बांधकाम रखडल्याने अनेक प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने सुरक्षित प्रवास जर होऊ शकत नसेल तर हा रस्ता कोणत्या उपयोगाचा, असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे. शिवालय कंपनीच्या माध्यमातून लाखनी, सोमलवाडा, रेंगेपार, चंद्रपूर, कोका अभयारण्य आणि पुढे खापामार्गे रामटेक असा हा रस्ता तयार करण्यात आला. शासनाचे कोट्यवधी रुपये या रस्त्यासाठी खर्च झाले. हा रस्ता तयार करण्यापूर्वी पेट्रोल, पैसा व वेळ वाचेल असा प्रचार प्रसार केला होता. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. वडसा, ब्रह्मपुरी, लाखनी, लाखांदूर,  पवनी येथून येणाऱ्यांना  कमी वेळात कमी खर्चात सुरक्षित खापा, रामटेकमार्गे पुढे जाता येईल, असे खोटे स्वप्न दाखविण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.  अनेक दिवस या रस्त्याचे काम चालले. जेव्हा काम सुरू होते तेव्हा या रस्त्यावरील गावातील लोकांनी किती यातना भोगल्या त्यांचे त्यांनाच माहीत. ते  त्यांनी सहन केले. मात्र, या रस्त्यावर कोट्यवधी खर्च करून साध्य काय झाले,  याचे उत्तर कुणाजवळही नाही.  शासनाचे रुपये खर्च झाले, कंपनीची मात्र चांदी झाली. लाखनीवरून पुढे गेल्यावर चिखलाबोडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर रस्ता तसाच ठेवून शिवालय कंपनी कुठे गेली माहीत नाही. एवढा हा रस्ता असा का ठेवला, त्याचे उत्तरही मिळत नाही.  लाखनीमार्गे जवळचा रस्ता म्हणून प्रवासी या मार्गाने  निघतात. चिखलाबोडी गावाच्या पुढे जातात आणि त्यांना दिसतो चिखल मातीचा भयानक रस्ता. इतक्या दूर गेल्यानंतर पुन्हा त्यांना लाखनीला परत यावे लागते.  त्यांना जो मनस्ताप सहन करावा लागतो. दररोज दहा ते बारा चार चाकी तिथून परत जात आहेत. इतका लांबचा प्रवास करून चिखलाबडी ते चंद्रपूर केवळ एक किलोमीटर; परंतु एवढाच रस्ता भयानक आहे.   चंद्रपूरच्या अगदी जवळ  जाऊन परत यावे लागते म्हणून तक्रारी केल्या. सर्व तक्रारी दुर्लक्षित झाल्या.  आजही लोकांची फजिती होतच आहे. चार चाकी गाड्या चिखलात फसत आहेत. जवळपासच्या गावातील ट्रॅक्टर नेऊन गाड्या ओढून काढाव्या लागत आहेत.चार चाकी वाहन चालकांनी या रस्त्याने अभयारण्य कोकामार्गे जाऊ नये, असा बोर्ड तरी निदान शासनाने लावावा, जेणेकरून लोकांची फजिती होणार नाही, अशी मागणी आता जनतेकडून होत आहे. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक