शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पालोरा येथे विषेश सभा घेऊन गावकऱ्यांच्या प्रश्नांची घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

पालोरा (चौ.) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे ...

पालोरा (चौ.) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच अनिता संदीप गिऱ्हेपुंजे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पालोरा येथे विषेश सभा घेऊन गावकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली.

नेहरू वाॅर्ड येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य देवानंद खोपे यांनी केले. आंबेडकर वाॅर्ड येथील ध्वजारोहण ज्योती शहारे यांनी केले. जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास सुपार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात गावातील कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय, पालोरा येथे सत्कार करण्यात आला.

तलाठी विवेक वासनिक यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांना त्रास न होता योग्य पद्धतीने आपले कर्तव्य व जबाबदारी पार पडली. त्याबद्दल सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. गावातील लाईनमन सुरज आघाव यांनीसुद्धा कोरोना काळात आपली कर्तव्य व जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळून गावात वेळोवेळी कार्य केले. त्याबद्दल उपसरपंच दुर्गा कावळे यांनी त्यांचा सत्कार केला.

गावात वेळोवेळी शासनाच्या निर्णयाबाबत जनजागृती करून माहिती देण्याचे कार्य केले, त्याबद्दल विनायकराव फुंडे यांनी महेश चोपकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. गावातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे काम योग्य पध्दतीने केल्याबद्दल पोलीसपाटील श्रीहरी गिऱ्हेपुंजे यांचा माजी सरपंच पुरूषोत्तम गिऱ्हेपुंजे यांनी सत्कार केला. गावातील लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकून गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे व सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

कोरोना काळात कुठलीही ग्रामसभा, सभा घेता येत नाही, तरीसुद्धा गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न केले. भंडारा पवनी रोड नाली बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी यांनी तात्पुरती पाणी निघण्याची व्यवस्था करून देतो, असे आश्वासित केले. गावात सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, रोड नाल्यांची समस्या अशा अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सचिव होमेश्वर लंजे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद खोपे, कैलास दिघोरे, उषा काजरखाने, रवीता धारगावे, ताराचंद गिऱ्हेपुंजे, सुनीता मस्के, गावातील युवा प्रमुख राहुल बागडे, दुर्याेधन फुंडे, राजेश काजरखाने, देविदास मथुरकर, अभिमन सुपारे, विजय साठवणे, विलास गिऱ्हेपुंजे, दिलीप धारगावे, सचिन कावळे, मनोज धाबेकर, गंगारम ठवरे, रवींद्र खोपे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.