शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:29 IST

गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले.

ठळक मुद्देतारांकित प्रश्नानंतरही तिढा कायम : प्रकरण ठाणा पेट्रोलपंप येथील दीड कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचायतला दिले. मासिक व ग्रामसभेत चर्चा न करता अर्जाकडे दुर्लक्ष केले. परिणामी तहकुब ग्रामसभेत महिलांनी मागणी रेटून धरली. अखेर सचिवाला विशेष ग्रामसभेचे आयोजन ११ फेब्रुवारीला करण्याचे भाग पाडले.जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले विकसीत खेडेगाव म्हणजे ठाणा पेट्रोलपंप. येथे १५ अधिक सरपंच असे एकंदरीत १६ सदस्य ग्रामपंचायतमध्ये विराजमान आहे. येथील भौगोलीक परिस्थितीचा विचार करता ९० टक्के घरे व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहेत. १२ वर्षापुर्वी टंचाईकृती आराखड्याअंतर्गत खरबी-ठाणा संयुक्त नळयोजना कार्यान्वित होती. १३ सार्वजनिक नळ स्टॅडपोस्टद्वारे जमीनीवर दोन फुट उंचावर उच्चदाबयुक्त पाणी दिवसाला दोन वेळा गावकऱ्यांना मिळत होते. दरम्यान गावाला जलशुध्दीकरणाव्दारे पाणी मिळावे, याकरिता तत्कालीन राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, सामाजिक कार्यकर्ते दिनदयाल देशभ्रतार, माजी सरपंच राजेश गिरी, उपसरपंच रामचंद्र किंदर्ले, पाणीपुरवठा समिती सदस्य अनिल पाटील, ऋषीराज मेळे, प्रल्हाद हुमणे, किसन मानकर यांच्याद्वारे ३० जुन २००५ मध्ये महाजल स्वजलधारा अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे स्वतंत्र नविन नळ योजना मंजुरीचा ठराव पारीत करुन मुंबई-दिल्ली कार्यालयाद्वारे एक कोटी ४६ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी नळ योजना आणली. रितसर नळयोजनेचे भूमीपूजन जून २००९ ला करण्यात आले.नियोजनानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. लगेच ग्रामपचांयत निवडणुका लागल्या नविन सदस्य ग्रामपचांयत व पाणीपुरवठा समितीमध्ये आले. कालांतराने राज्यातही रस्ता परिवर्तन झाले. एकाच कामाला तीन कंत्राटदाराकरवी गावातील पाणीपुरवठा कामे करण्यात आली. काम कसे सुरु आहे यावर कुणाचेही लक्ष नव्हते. ९० टक्के रक्कम खर्च झाले. मात्र गावाला एक थेंब पाण्याचे मिळाले नाही. तरुण, ज्येष्ठ महिला पुरुषांनी पाणी प्रश्नाबाबत ग्रामपंचायत पाणीपुरवठा समिती व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत होते. गावातील नवीन वाढीव पाईप लाईनची मागणी मंजुर करुन ‘क’ चे मिशन करीत होते. दिड कोटी खर्च झाले, मात्र गावाला एक थेंब पाणी देऊ शकले नाही. आमदार रामचंद्र अवसरे यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केले होते. येथे ही ‘क’ चे मिशन करणारा खाऊदास पोहचला आणि प्रकरण थंडावला. पालकमंत्र्यांकडेही ठाणा येथील पाणी प्रश्न रेटले यातही यश पदरी पडले नाही. अमित देशभ्रतार यांनी माहितीचा अधिकार वापर केला. यावरही ‘क’ चे मिशनधारक येऊन ठेपले. हतबल झालेले ग्रामस्थ आता शेवटचा उपाय म्हणून ४ जानेवारीला दिडसे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंपला दिला. मात्र ग्रामपंचायतच्या मासिक सभेत २६ जानेवारीच्या तहकुब ग्रामसभेत विषय चर्चेला घेतला नाही व निर्णय घेतला नाही. गावातील महिलांनी २ फेब्रुवारीच्या तहकुब ग्रामसभेत गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारीला आयोजित केली होती.

टॅग्स :water transportजलवाहतूक