लोकमत न्यूज नेटवर्कखराशी : सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने सामान्य फंडातून खर्च करण्याचा आदेश दिले आहेत. मात्र हा खर्च आवश्यक असला तरी ग्रामपंचातयीच्या सामान्य फंडावर भुर्दंड पडत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात उपाययोजना करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खराशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधन्वा चेटुले यांनी शासन, प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. सामान्य फंडातून प्रतिबंधात्मक उपाययोजना औषध फवारणी, आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर मानधन इत्यादी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे शासन निर्णय लोकांच्या हिताचे असले तरी ग्रामपंचायतींना इतर कामात काटकसर करुन सामान्य फंडातील ही रक्कम खर्च करावी लागत आहे. याबाबत खराश्ीाचे उपसरपंच यांनी शासनाला मागणी करुन ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.सामान्य फंडावर भार न देता वेगळा निधी उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायती गांभिर्याने विचार करुन गावात उपाययोजना राबवतील आणि कोरोनावर मात करण्यात यश मिळेल. याबाबद लहान ग्रामपंचायती चिंतेत असून दिवसेंदिवस शासननिर्णय धडकत आहेत. यासंबंधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करुन विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करणार असल्याचे सुधन्वा चेटुले यांनी सांगितले.
कोरोना उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST
गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी द्यावा
ठळक मुद्देमागणी । सामान्य फंडावर पडतो भार