कारवाईची मागणी : शेतकऱ्यावर हजारो रूपयांचा भूर्दंडविशाल रणदिवे अडयाळअडयाळ व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात याआधी फसले. परंतु उन्हाळी पीक घ्यावे म्हणून अडयाळ येथील कैलास कावळे यांनी दीड एकरासाठी व दिपक गभने यांनी दीड एकरासाठी वृंदावन कृषी केंद्र अडयाळ येथून यांच्या सांगण्यानुसार २५ नोव्हेंबर १६ ला सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ जातीची धान विकत घेतले. मात्र हे धान्य १२० दिवसाचे होते. परंतु १६० दिवसानंतरही पिकाचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. या दोन्ही शेतकऱ्यांची फसवूणक झाली. यात धान्य कंपनी तथा कृषी केंद्र चालकावर कायदेशीर कारवाइ करण्याची मागणी जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी भंडारा यांना दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांनी केली आहे.दोन्ही शेतकऱ्यांनी शेतात गहू न लावता १२० दिवसाचे भातपीक लावले. तेव्हापासून ते आतापर्यंत कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्यानुसार खत, फवारणी, औषधी मारली. आपल्या कंपनीचे धान्य १२० दिवसाचे असून धान्य आतापर्यंत आले नाही. याच्या पाहणीसाठी कंपनीचे मोठमोठे अधिकारी येऊन गेले. परंतु त्यांच्याकडून वेळकाढूपणाचे उत्तर मिळाले आणि त्यानंतर पुन्हा आले नाही. कैलास कावळे या शेतकऱ्यांने शेतात नेवून आपबिती सांगितले. शेतातले दृश्य एवढे भयंकर आहे की त्या शेतकऱ्यांची फसवणूक आल्याचे कळते. धान १२० दिवसाचा आहे म्हणून हे धान पेरले. १५० दिवस होवून सुध्दा पुढिल अंदाजे एक महिना फसल धानाची हातात येवू शकत नही. आजच्या घडला त्या धानाला पाण्याची गरज आहे. परंतु कैलास कावळे यांच्या बोरला पाणी नाही म्हणजे दात आहेत तर चने नाही आणि चने आहेत तर दात नाही. आपल्या कंपनीचे धान १२५ दिवसाचे आहे असे या कंपनीचे अधिकारी व कृषी केंद्र चालक ही सांगतात. मग आज १५० दिवस होवून सुद्धा त्या सिजंटा कंपनीचे एनके ५२५१ हे धान आले का नाही? या शेतकऱ्यांची आतापर्यंत या धानाच्या शेतीसाठी ७६,६६० रुपये खर्च केले. पण आज यामुळेच मानसिक तणावात वावरतांना दिसत आहे. जिल्ह्यात दरवर्षी असे प्रकार घडतात. कंपनी संचालकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ हे धान १२५ दिवसाचे आहे. आम्ही या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणीकरिता येणार होतो. पण येवू शकलो नही, आणि याविषयी मी काहीही माहिती मोबाईलवर देवू शकत नाही. लवकरच शेतीची पाहणी केली जाईल.- किशोर डामरे, सेल्स युनिट लीडर.मी या विषयी अनेकदा सिजंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो. परंतु त्यांनी आज-येतो उद्या येतो असेच बोलतात. परंतु या कंपनीमुळे हा शेतकरी फसला आहे. याला न्याय मिळणे गरजेचे आहे.- महेश वैद्य, वृंदावन कृषी केंद्र.१२० दिवसाची व्हेरायटी लावली. परंतु १५० दिवस होवून सुद्धा धान परिपक्वअवस्थेत आले नाही. पाणी नाही त्यामुळे हातची फसल जाईल. त्यामुळे मला धान्य कंपनीने मदत करावी हीच मागणी आहे.- कैलाश कावळे, शेतकरी.
बोगस धान बियाणांमुळे शेतकऱ्यांची बोळवण
By admin | Updated: April 27, 2017 00:31 IST