शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस धान बियाणांमुळे शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: April 27, 2017 00:31 IST

अडयाळ व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात याआधी फसले. परंतु उन्हाळी पीक घ्यावे म्हणून अडयाळ येथील कैलास कावळे यांनी....

कारवाईची मागणी : शेतकऱ्यावर हजारो रूपयांचा भूर्दंडविशाल रणदिवे अडयाळअडयाळ व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात याआधी फसले. परंतु उन्हाळी पीक घ्यावे म्हणून अडयाळ येथील कैलास कावळे यांनी दीड एकरासाठी व दिपक गभने यांनी दीड एकरासाठी वृंदावन कृषी केंद्र अडयाळ येथून यांच्या सांगण्यानुसार २५ नोव्हेंबर १६ ला सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ जातीची धान विकत घेतले. मात्र हे धान्य १२० दिवसाचे होते. परंतु १६० दिवसानंतरही पिकाचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. या दोन्ही शेतकऱ्यांची फसवूणक झाली. यात धान्य कंपनी तथा कृषी केंद्र चालकावर कायदेशीर कारवाइ करण्याची मागणी जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी भंडारा यांना दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांनी केली आहे.दोन्ही शेतकऱ्यांनी शेतात गहू न लावता १२० दिवसाचे भातपीक लावले. तेव्हापासून ते आतापर्यंत कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्यानुसार खत, फवारणी, औषधी मारली. आपल्या कंपनीचे धान्य १२० दिवसाचे असून धान्य आतापर्यंत आले नाही. याच्या पाहणीसाठी कंपनीचे मोठमोठे अधिकारी येऊन गेले. परंतु त्यांच्याकडून वेळकाढूपणाचे उत्तर मिळाले आणि त्यानंतर पुन्हा आले नाही. कैलास कावळे या शेतकऱ्यांने शेतात नेवून आपबिती सांगितले. शेतातले दृश्य एवढे भयंकर आहे की त्या शेतकऱ्यांची फसवणूक आल्याचे कळते. धान १२० दिवसाचा आहे म्हणून हे धान पेरले. १५० दिवस होवून सुध्दा पुढिल अंदाजे एक महिना फसल धानाची हातात येवू शकत नही. आजच्या घडला त्या धानाला पाण्याची गरज आहे. परंतु कैलास कावळे यांच्या बोरला पाणी नाही म्हणजे दात आहेत तर चने नाही आणि चने आहेत तर दात नाही. आपल्या कंपनीचे धान १२५ दिवसाचे आहे असे या कंपनीचे अधिकारी व कृषी केंद्र चालक ही सांगतात. मग आज १५० दिवस होवून सुद्धा त्या सिजंटा कंपनीचे एनके ५२५१ हे धान आले का नाही? या शेतकऱ्यांची आतापर्यंत या धानाच्या शेतीसाठी ७६,६६० रुपये खर्च केले. पण आज यामुळेच मानसिक तणावात वावरतांना दिसत आहे. जिल्ह्यात दरवर्षी असे प्रकार घडतात. कंपनी संचालकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. सिजंटा हायब्रीड एनके-५२५१ हे धान १२५ दिवसाचे आहे. आम्ही या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणीकरिता येणार होतो. पण येवू शकलो नही, आणि याविषयी मी काहीही माहिती मोबाईलवर देवू शकत नाही. लवकरच शेतीची पाहणी केली जाईल.- किशोर डामरे, सेल्स युनिट लीडर.मी या विषयी अनेकदा सिजंटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो. परंतु त्यांनी आज-येतो उद्या येतो असेच बोलतात. परंतु या कंपनीमुळे हा शेतकरी फसला आहे. याला न्याय मिळणे गरजेचे आहे.- महेश वैद्य, वृंदावन कृषी केंद्र.१२० दिवसाची व्हेरायटी लावली. परंतु १५० दिवस होवून सुद्धा धान परिपक्वअवस्थेत आले नाही. पाणी नाही त्यामुळे हातची फसल जाईल. त्यामुळे मला धान्य कंपनीने मदत करावी हीच मागणी आहे.- कैलाश कावळे, शेतकरी.