शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:37 IST

१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे : अपुऱ्या सिंचन सुविधांचा परिणाम, पीककर्ज मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गोसे धरणाची निर्मिती झाली असली तरी जिल्ह्याचा बहुतांश भाग आजही कोरडवाहू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेतकºयांचे अर्थकारण चालते. योग्यवेळी मान्सूनचा पाऊस झाल्यास पीकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खरीप हंगामातील उत्पन्न चांगले झाल्यास शेतकºयांची वर्षभराची चिंता मिटते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे.जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या दुग्धव्यवसायावर देखील परिणाम होत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे.शेतकºयाच्या समस्यांत वाढ होत असून याकडे शासन स्तरावरुन विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.पिक कर्जासाठी शासन कितीही गाजावाजा करत असले तरीही ग्रामीण भागातील बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतकºयांना बँकाचे उंबरठे झीजवावे लागत आहे. गावोगावी तलाठ्यांनी मुख्यालयी पाठ फिरविल्याने शेतकºयांना योग्य वेळेत कागदपत्र मिळत नाहीत.खरीप हंगामात देखील तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून महसुल व बँक कर्मचाऱ्यांना सुचना देवून शेतकºयांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची मुख्यालयांकडे पाठअनेक ठिकाणी खरीप हंगामात देखील तलाठी,कृषी सहाय्यक उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.शेतकºयांना सात बारा,आठ अ,पिकपेरा ही कागदपत्रे बँकेत सादर केल्याशिवाय पिककर्ज मंजूर होत नाही.परंतु शासकीय कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना पिककर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत.दरवर्षीच्या कमी पावसाने शेतकºयांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी तरी वेळेत पाऊस झाल्यास चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा होती. परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने अजूनही बी-बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही.-दीपक गिºहेपुंजे,शेतकरी, खरबी नाका