शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:37 IST

१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे : अपुऱ्या सिंचन सुविधांचा परिणाम, पीककर्ज मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गोसे धरणाची निर्मिती झाली असली तरी जिल्ह्याचा बहुतांश भाग आजही कोरडवाहू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेतकºयांचे अर्थकारण चालते. योग्यवेळी मान्सूनचा पाऊस झाल्यास पीकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खरीप हंगामातील उत्पन्न चांगले झाल्यास शेतकºयांची वर्षभराची चिंता मिटते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे.जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या दुग्धव्यवसायावर देखील परिणाम होत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे.शेतकºयाच्या समस्यांत वाढ होत असून याकडे शासन स्तरावरुन विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.पिक कर्जासाठी शासन कितीही गाजावाजा करत असले तरीही ग्रामीण भागातील बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतकºयांना बँकाचे उंबरठे झीजवावे लागत आहे. गावोगावी तलाठ्यांनी मुख्यालयी पाठ फिरविल्याने शेतकºयांना योग्य वेळेत कागदपत्र मिळत नाहीत.खरीप हंगामात देखील तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून महसुल व बँक कर्मचाऱ्यांना सुचना देवून शेतकºयांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची मुख्यालयांकडे पाठअनेक ठिकाणी खरीप हंगामात देखील तलाठी,कृषी सहाय्यक उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.शेतकºयांना सात बारा,आठ अ,पिकपेरा ही कागदपत्रे बँकेत सादर केल्याशिवाय पिककर्ज मंजूर होत नाही.परंतु शासकीय कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना पिककर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत.दरवर्षीच्या कमी पावसाने शेतकºयांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी तरी वेळेत पाऊस झाल्यास चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा होती. परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने अजूनही बी-बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही.-दीपक गिºहेपुंजे,शेतकरी, खरबी नाका