शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:37 IST

१५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ठळक मुद्देबळीराजाचे डोळे लागले आकाशाकडे : अपुऱ्या सिंचन सुविधांचा परिणाम, पीककर्ज मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १५ जून उलटला तरी अद्याप पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गोसे धरणाची निर्मिती झाली असली तरी जिल्ह्याचा बहुतांश भाग आजही कोरडवाहू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेतकºयांचे अर्थकारण चालते. योग्यवेळी मान्सूनचा पाऊस झाल्यास पीकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. खरीप हंगामातील उत्पन्न चांगले झाल्यास शेतकºयांची वर्षभराची चिंता मिटते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे.जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या दुग्धव्यवसायावर देखील परिणाम होत असून दूध उत्पादन निम्म्यावर आले आहे.शेतकºयाच्या समस्यांत वाढ होत असून याकडे शासन स्तरावरुन विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.पिक कर्जासाठी शासन कितीही गाजावाजा करत असले तरीही ग्रामीण भागातील बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतकºयांना बँकाचे उंबरठे झीजवावे लागत आहे. गावोगावी तलाठ्यांनी मुख्यालयी पाठ फिरविल्याने शेतकºयांना योग्य वेळेत कागदपत्र मिळत नाहीत.खरीप हंगामात देखील तलाठी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून महसुल व बँक कर्मचाऱ्यांना सुचना देवून शेतकºयांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांची मुख्यालयांकडे पाठअनेक ठिकाणी खरीप हंगामात देखील तलाठी,कृषी सहाय्यक उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.शेतकºयांना सात बारा,आठ अ,पिकपेरा ही कागदपत्रे बँकेत सादर केल्याशिवाय पिककर्ज मंजूर होत नाही.परंतु शासकीय कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकºयांना पिककर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत.दरवर्षीच्या कमी पावसाने शेतकºयांचे उत्पन्न घटले आहे. यावर्षी तरी वेळेत पाऊस झाल्यास चांगल्या पीकपाण्याची अपेक्षा होती. परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने अजूनही बी-बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही.-दीपक गिºहेपुंजे,शेतकरी, खरबी नाका