शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पेरणी ५६%, रोवणी ५०%, पाऊस ५८%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:39 IST

जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांचा जीव मेटाकुटीला : पावसाची प्रतीक्षा कायमच, मध्यम तथा मालगुजारी तलाव कोरडे

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जगाचा पोशिंदा असणाºया बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. धानपीक डौलात उभे राहण्याच्या काळात पेरणी व रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. सद्यस्थितीत १६ आॅगस्टपर्यंत भंडारा जिल्ह्यात धान पिकाची केवळ ५६ टक्के पेरणी, रोवणी ५० टक्के तर पाऊस ५८ टक्के झाला आहे. विशेष म्हणजे रोवणीनंतर पाऊस न आल्याने यावर्षी कोरड्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वरुणराजाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस धानपिकाला तारणार का? असा प्रश्न आहे. परंतु आता पाऊस येऊनही त्याचा उपयोग नसल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे.भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ४९ टक्के असल्याची सांगण्यात येते. भात नर्सरी लागवडीची टक्केवारी ९४.५० टक्के इतकी आहे.भंडारा तालुक्यात ११ हजार २२२ हेक्टर, मोहाडी ८ हजार ०२२ हेक्टर, तुमसर १४ हजार ७०५ हेक्टर, पवनी १९ हजार ६४६, साकोली ११ हजार ७३५, लाखनी १५ हजार ११३ तर लाखांदूर तालुक्यात २२ हजार ३७० हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र सिंचनाची सुविधाच उपलब्ध नसल्याने व वरुण राजाच्या वक्रदृष्टीमुळे सिंचन तरी कसे करायचे असा प्रश्न बळीराजासमोर निर्माण झालेला आहे.कर्जबाजारीपणा, कर्जमुक्तीची फसवेगिरी, पिक विम्याचा न मिळालेला लाभ या समस्यांमध्ये वेढलेल्या बळीराजावर संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.यावर्षी जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक असून १५ आॅगस्टपर्यंत निम्म्याहून अधिक शेतकºयांची रोवणी झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. भंडारा तालुक्यात ४१ टक्के, मोहाडीत २७ टक्के, तुमसर ४१ टक्के, पवनी ५९ टक्के, लाखांदूर ६९ टक्के, लाखनी ५९ टक्के तर साकोली तालुक्यात ५९ टक्के रोवणी झाली आहे. परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यावर्षी ५३ टक्के रोवणी झाल्याची माहिती दिली आहे. ९७ हजार ७३७ इतक्या क्षेत्रात रोवणी झाल्याचे सांगितले आहे.प्रकल्पांमध्ये २० टक्के जलसाठामागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावांमध्येही जलसाठा घसरला आहे. सद्यस्थितीत ६३ प्रकल्पांमध्ये २०.३८ टक्के जलसाठा आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊनही प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढण्यापेक्षा खालावत आहे. आता समाधानकारक पाऊस न बरसल्यास पाणी टंचाईसह जनावरांचा चारा व लघु उद्योगांना फटका बसू शकतो. पावसाअभावी रोवणी होऊ न शकल्याने तांदूळ उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पेरणी क्षेत्र कमी त्यापाठोपाठ रोवणीही कमी झाल्याने उत्पादन कमी झाले तर धानाचे दर वाढण्याची शक्यता आहे.