शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पीक नुकसान 'निरंक'चा जावई शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देमोहाडी तालुका कृषी विभागाचा अहवाल : शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगाने अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रोश

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात परतीच्या पावसाने अनेक शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान झाले असून शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मोहाडी तालुक्यात धान पिकाचे नुकसान निरंक असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे. तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचा अर्ज त्यांच्याकडे केला असून पिक विमा मिळण्याची मागणी केली आहे. परंतु या जावई शोधाने आता शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा भंग झालेली आहे.मोहाडी तालुक्यात २८ हजार ६६४ हेक्टरवर सर्वसाधारण धान रोवणी करण्यात आली होती. ५१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धान लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच झालेल्या पावसामुळे १०० टक्के भात रोवणी पुर्ण झाली होती. हलक्या धानाची कापणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने कहर केला. कापलेला धान शेतात ठेवला असतानाच शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने काही शेतकऱ्यांचे धान ओले झाले. अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. काही शिक्षित शेतकऱ्यांनी लगेच कृषी व महसूल विभागात अर्ज करून पीक विम्याची मागणी केली असता त्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे व फोटो काढून संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ मिळेल की नाही हे येणारा काळच सांगू शकतो. परतीच्या पावसाने या भागाला झोडपून काढल्यावरही कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानच झाले नाही असे सांगत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी टेबलवर बसूनच पंचनामे केले असल्याची शेतकºयांची ओरड आहे. नुकसान निरंक पाठविण्यात आल्याने शेतकरी दुखावला आहे.कृषी व महसूलचे कार्यालयात बसून पंचनामेकृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व महसूल विभागातील तलाठ्यांनी मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कार्यालयात बसूनच संपूर्ण तालुक्यातील पंचनामे पूर्ण केले अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीची धामधूम व त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा मोहाडी तालुक्यातील कृषी विभागातील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील पंचनामे लगेच पूर्ण केले व वरिष्ठांची शाब्बासकी मिळविली, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येथील संपूर्ण शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित झालेले आहेत. नुकसान होऊनही अहवाल निरंक दाखविणे म्हणजे शेतकºयांची थट्टाच नाही काय?

टॅग्स :agricultureशेती