शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसान 'निरंक'चा जावई शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देमोहाडी तालुका कृषी विभागाचा अहवाल : शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगाने अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रोश

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात परतीच्या पावसाने अनेक शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान झाले असून शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मोहाडी तालुक्यात धान पिकाचे नुकसान निरंक असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे. तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचा अर्ज त्यांच्याकडे केला असून पिक विमा मिळण्याची मागणी केली आहे. परंतु या जावई शोधाने आता शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा भंग झालेली आहे.मोहाडी तालुक्यात २८ हजार ६६४ हेक्टरवर सर्वसाधारण धान रोवणी करण्यात आली होती. ५१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धान लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच झालेल्या पावसामुळे १०० टक्के भात रोवणी पुर्ण झाली होती. हलक्या धानाची कापणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने कहर केला. कापलेला धान शेतात ठेवला असतानाच शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने काही शेतकऱ्यांचे धान ओले झाले. अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. काही शिक्षित शेतकऱ्यांनी लगेच कृषी व महसूल विभागात अर्ज करून पीक विम्याची मागणी केली असता त्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे व फोटो काढून संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ मिळेल की नाही हे येणारा काळच सांगू शकतो. परतीच्या पावसाने या भागाला झोडपून काढल्यावरही कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानच झाले नाही असे सांगत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी टेबलवर बसूनच पंचनामे केले असल्याची शेतकºयांची ओरड आहे. नुकसान निरंक पाठविण्यात आल्याने शेतकरी दुखावला आहे.कृषी व महसूलचे कार्यालयात बसून पंचनामेकृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व महसूल विभागातील तलाठ्यांनी मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कार्यालयात बसूनच संपूर्ण तालुक्यातील पंचनामे पूर्ण केले अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीची धामधूम व त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा मोहाडी तालुक्यातील कृषी विभागातील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील पंचनामे लगेच पूर्ण केले व वरिष्ठांची शाब्बासकी मिळविली, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येथील संपूर्ण शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित झालेले आहेत. नुकसान होऊनही अहवाल निरंक दाखविणे म्हणजे शेतकºयांची थट्टाच नाही काय?

टॅग्स :agricultureशेती