शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीक नुकसान 'निरंक'चा जावई शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देमोहाडी तालुका कृषी विभागाचा अहवाल : शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगाने अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रोश

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात परतीच्या पावसाने अनेक शेतकºयांच्या धान पिकाचे नुकसान झाले असून शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मोहाडी तालुक्यात धान पिकाचे नुकसान निरंक असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला आहे. तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचा अर्ज त्यांच्याकडे केला असून पिक विमा मिळण्याची मागणी केली आहे. परंतु या जावई शोधाने आता शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा भंग झालेली आहे.मोहाडी तालुक्यात २८ हजार ६६४ हेक्टरवर सर्वसाधारण धान रोवणी करण्यात आली होती. ५१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धान लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच झालेल्या पावसामुळे १०० टक्के भात रोवणी पुर्ण झाली होती. हलक्या धानाची कापणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने कहर केला. कापलेला धान शेतात ठेवला असतानाच शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने काही शेतकऱ्यांचे धान ओले झाले. अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला भाव मिळत नाही व त्याला शासन किंवा व्यापारी सुद्धा खरेदी करीत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. काही शिक्षित शेतकऱ्यांनी लगेच कृषी व महसूल विभागात अर्ज करून पीक विम्याची मागणी केली असता त्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे व फोटो काढून संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ मिळेल की नाही हे येणारा काळच सांगू शकतो. परतीच्या पावसाने या भागाला झोडपून काढल्यावरही कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानच झाले नाही असे सांगत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी टेबलवर बसूनच पंचनामे केले असल्याची शेतकºयांची ओरड आहे. नुकसान निरंक पाठविण्यात आल्याने शेतकरी दुखावला आहे.कृषी व महसूलचे कार्यालयात बसून पंचनामेकृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व महसूल विभागातील तलाठ्यांनी मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कार्यालयात बसूनच संपूर्ण तालुक्यातील पंचनामे पूर्ण केले अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीची धामधूम व त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असताना सुद्धा मोहाडी तालुक्यातील कृषी विभागातील कर्तव्यनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील पंचनामे लगेच पूर्ण केले व वरिष्ठांची शाब्बासकी मिळविली, अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येथील संपूर्ण शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित झालेले आहेत. नुकसान होऊनही अहवाल निरंक दाखविणे म्हणजे शेतकºयांची थट्टाच नाही काय?

टॅग्स :agricultureशेती