शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे

नागरिक बोलेना- पालिका ऐकेना : ऐन पावसाळ्यात आजाराला आमंत्रण इंद्रपाल कटकवार भंडारा‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे. स्वच्छ व सुंदर प्रशासनांतर्गत शहराचे सौंदर्य अबाधित कसे राखता येईल, हे न सांगण्यासारखे आहे. अस्वच्छतेबाबत नागरिकांनी गप्प राहणे अन् पाहुनही न दिसल्याची पालिका प्रशासनाची भूमिका घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे काढायला पुरेशी आहे.दीड लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. पाठ करून गेल्यावर नागरिक पटकन कंटेनरच्या बाहेर कचरा फेकतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तथा मानसिकता कुणाची नाही, हे दिसत असले तरी त्याच क्षमतेने पालिका प्रशासानाला दोष दिला जातो. पालिकेच्या नियोजनाला उदासिन भंडारेकरांचा प्रतिसाद अल्प असतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. होय, पण हे सत्य असले तरी नागरिकांचे सहकार्य नसले तर कुठलिही योजना यशस्वी होत नाही. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. दमदार नियोजन तथा नागरिकांची मानसिकता बदलण्याची तयारी घेऊनच जनतेसमोर येण्याचे धाडस केले पाहिजे. झाडूपासून ते घंटागाडीपर्यंत वेगवेगळे नियोजन आखून अस्वच्छतेवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात, यासाठी हमखासपणे नागरिकांचे सहकार्य सर्वतोपरी ठरते. घंटागाडीवाला दहा रूपयांऐवजी १५ ते २० रूपये लोकांना मागतो, असे बोलून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. परंतु उघड्यावरील या समस्येमुळे संभाव्य आजाराचा धोका तुमच्याच कुंटुबासाठी धोकादायक ठरू शकतो, ही बाब समजण्यापलिकडे आहे. शहरातील जुन्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापनेची काय स्थिती आहे, ही बाब भंडारेकरांसाठी नवीन नाही. परंतु आरोग्याचा विषयावर पेटून उठण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न नागरिकांना घरीच बसवून ठेवतो. पालिका काही तरी उपाययोजना करेल, याच आशेवर नागरिक बोलत नाही. दुसरीकडे पालिका प्रशासनातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अस्वच्छतेची स्थिती दिसुनही ब्र काढत नाही, हे भंडाराचे दुर्देव म्हणावे लागेल. लक्षावधी रूपयांचा खर्च होऊनही तोंडावर रूमाल घेऊन रहदारी करण्याची वेळ भंडारेकरांवर आली असेल तर सुयोग्य प्रशासनाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरेल. ‘नागरिक हो...जागृत व्हा’ असे बोलण्याची वेळ ओढवून घेऊ नका, असेच शेवटी म्हणावे लागेल. नगर परिषद अधिनियम कलम १९६५ तथा अधिनियम २००४ नुसार संपूर्ण स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. वेळोवेळी यावर विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली, परंतु सभा घेण्यात आली नाही. आरोग्याशी निगडीत असलेल्या मुद्यावर पालिका प्रशासन गंभीर नाही. दूषित पाणी पुरवठ्यातही नागरिकांचे हाल होत आहे. लक्षावधी खर्चुनही शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहे.-हिवराज उके, नगरसेवक, भंडारा