शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे

नागरिक बोलेना- पालिका ऐकेना : ऐन पावसाळ्यात आजाराला आमंत्रण इंद्रपाल कटकवार भंडारा‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे. स्वच्छ व सुंदर प्रशासनांतर्गत शहराचे सौंदर्य अबाधित कसे राखता येईल, हे न सांगण्यासारखे आहे. अस्वच्छतेबाबत नागरिकांनी गप्प राहणे अन् पाहुनही न दिसल्याची पालिका प्रशासनाची भूमिका घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे काढायला पुरेशी आहे.दीड लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. पाठ करून गेल्यावर नागरिक पटकन कंटेनरच्या बाहेर कचरा फेकतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तथा मानसिकता कुणाची नाही, हे दिसत असले तरी त्याच क्षमतेने पालिका प्रशासानाला दोष दिला जातो. पालिकेच्या नियोजनाला उदासिन भंडारेकरांचा प्रतिसाद अल्प असतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. होय, पण हे सत्य असले तरी नागरिकांचे सहकार्य नसले तर कुठलिही योजना यशस्वी होत नाही. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. दमदार नियोजन तथा नागरिकांची मानसिकता बदलण्याची तयारी घेऊनच जनतेसमोर येण्याचे धाडस केले पाहिजे. झाडूपासून ते घंटागाडीपर्यंत वेगवेगळे नियोजन आखून अस्वच्छतेवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात, यासाठी हमखासपणे नागरिकांचे सहकार्य सर्वतोपरी ठरते. घंटागाडीवाला दहा रूपयांऐवजी १५ ते २० रूपये लोकांना मागतो, असे बोलून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. परंतु उघड्यावरील या समस्येमुळे संभाव्य आजाराचा धोका तुमच्याच कुंटुबासाठी धोकादायक ठरू शकतो, ही बाब समजण्यापलिकडे आहे. शहरातील जुन्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापनेची काय स्थिती आहे, ही बाब भंडारेकरांसाठी नवीन नाही. परंतु आरोग्याचा विषयावर पेटून उठण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न नागरिकांना घरीच बसवून ठेवतो. पालिका काही तरी उपाययोजना करेल, याच आशेवर नागरिक बोलत नाही. दुसरीकडे पालिका प्रशासनातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अस्वच्छतेची स्थिती दिसुनही ब्र काढत नाही, हे भंडाराचे दुर्देव म्हणावे लागेल. लक्षावधी रूपयांचा खर्च होऊनही तोंडावर रूमाल घेऊन रहदारी करण्याची वेळ भंडारेकरांवर आली असेल तर सुयोग्य प्रशासनाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरेल. ‘नागरिक हो...जागृत व्हा’ असे बोलण्याची वेळ ओढवून घेऊ नका, असेच शेवटी म्हणावे लागेल. नगर परिषद अधिनियम कलम १९६५ तथा अधिनियम २००४ नुसार संपूर्ण स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. वेळोवेळी यावर विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली, परंतु सभा घेण्यात आली नाही. आरोग्याशी निगडीत असलेल्या मुद्यावर पालिका प्रशासन गंभीर नाही. दूषित पाणी पुरवठ्यातही नागरिकांचे हाल होत आहे. लक्षावधी खर्चुनही शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहे.-हिवराज उके, नगरसेवक, भंडारा