शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे

नागरिक बोलेना- पालिका ऐकेना : ऐन पावसाळ्यात आजाराला आमंत्रण इंद्रपाल कटकवार भंडारा‘‘पाऊस आणि पुरूष केव्हा येईल, याचा नेम नाही’’, असे नेहमी बोलल्या जाते. अशीच स्थिती शहरातील घनकचरा व्यवस्थापन संदर्भात झाली आहे. स्वच्छ व सुंदर प्रशासनांतर्गत शहराचे सौंदर्य अबाधित कसे राखता येईल, हे न सांगण्यासारखे आहे. अस्वच्छतेबाबत नागरिकांनी गप्प राहणे अन् पाहुनही न दिसल्याची पालिका प्रशासनाची भूमिका घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे काढायला पुरेशी आहे.दीड लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. पाठ करून गेल्यावर नागरिक पटकन कंटेनरच्या बाहेर कचरा फेकतात. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तथा मानसिकता कुणाची नाही, हे दिसत असले तरी त्याच क्षमतेने पालिका प्रशासानाला दोष दिला जातो. पालिकेच्या नियोजनाला उदासिन भंडारेकरांचा प्रतिसाद अल्प असतो, असे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. होय, पण हे सत्य असले तरी नागरिकांचे सहकार्य नसले तर कुठलिही योजना यशस्वी होत नाही. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांची जबाबदारी संपली असे होत नाही. दमदार नियोजन तथा नागरिकांची मानसिकता बदलण्याची तयारी घेऊनच जनतेसमोर येण्याचे धाडस केले पाहिजे. झाडूपासून ते घंटागाडीपर्यंत वेगवेगळे नियोजन आखून अस्वच्छतेवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात, यासाठी हमखासपणे नागरिकांचे सहकार्य सर्वतोपरी ठरते. घंटागाडीवाला दहा रूपयांऐवजी १५ ते २० रूपये लोकांना मागतो, असे बोलून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. परंतु उघड्यावरील या समस्येमुळे संभाव्य आजाराचा धोका तुमच्याच कुंटुबासाठी धोकादायक ठरू शकतो, ही बाब समजण्यापलिकडे आहे. शहरातील जुन्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापनेची काय स्थिती आहे, ही बाब भंडारेकरांसाठी नवीन नाही. परंतु आरोग्याचा विषयावर पेटून उठण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न नागरिकांना घरीच बसवून ठेवतो. पालिका काही तरी उपाययोजना करेल, याच आशेवर नागरिक बोलत नाही. दुसरीकडे पालिका प्रशासनातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अस्वच्छतेची स्थिती दिसुनही ब्र काढत नाही, हे भंडाराचे दुर्देव म्हणावे लागेल. लक्षावधी रूपयांचा खर्च होऊनही तोंडावर रूमाल घेऊन रहदारी करण्याची वेळ भंडारेकरांवर आली असेल तर सुयोग्य प्रशासनाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरेल. ‘नागरिक हो...जागृत व्हा’ असे बोलण्याची वेळ ओढवून घेऊ नका, असेच शेवटी म्हणावे लागेल. नगर परिषद अधिनियम कलम १९६५ तथा अधिनियम २००४ नुसार संपूर्ण स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. वेळोवेळी यावर विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली, परंतु सभा घेण्यात आली नाही. आरोग्याशी निगडीत असलेल्या मुद्यावर पालिका प्रशासन गंभीर नाही. दूषित पाणी पुरवठ्यातही नागरिकांचे हाल होत आहे. लक्षावधी खर्चुनही शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहे.-हिवराज उके, नगरसेवक, भंडारा