शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

सामाजिक न्याय,न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

पी.एस.खुणे : शास्त्री विद्यालयात कायदेविषयक शिबिर भंडारा : स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( माजी मन्रो) ...

पी.एस.खुणे : शास्त्री विद्यालयात कायदेविषयक शिबिर

भंडारा : स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय( माजी मन्रो) येथे विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात विधी सेवा प्राधिकरण भंडाराच्या निमंत्रित कायदेतज्ज्ञांनी दहावीतल्या विद्यार्थ्यांना विविध विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन केले. द ’मेंटनन्स ॲन्ड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीझन‘ या विषयावर ॲड. रेणुका बेदरकर यांनी मार्गदर्शन केले. ‘दी महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट’२०१५ या कायद्यांची माहिती ॲड. नेहा गजभिये यांनी दिली. विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.एन.के वाळके यांनी सामाजिक न्याय या संकल्पनेविषयी सखोल व अभ्यासपूर्ण भाष्य करुन त्याअंतर्गत एनएएलएसए या संस्थेचे कार्य कथन केले. या शिवाय महिला, मुली, बालकांच्या कायद्यांची माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस.खुणे यांनी या छोटेखानी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना समाजात कोणावरही अन्याय होऊ नये,न्यायापासून कोणीही वंचित राहू नये,संविधानाने दिलेले हक्क व अधिकार प्रत्येकाला उपभोगता यायला हवेत, सामाजिक न्याय हा न्याय्य समाजरचनेच्या निर्मितीसाठी उपयोगात यायला हवा, असे प्रतिपादन केले.

सामाजिक न्यायदिनानिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यातल्या विजेत्यांना या वेळी विधी सेवा प्राधिकरणाकडून न्यायाधीश महोदयांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यात चेतना देवेंद्र निनावे इयत्ता सातवी हिला प्रथम पारितोषिक मिळाले तर नारायण देवकाते इयत्ता अकरावी याला द्वितीय पारितोषिक देण्यात आले तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी भूषण नरेश डहाके हा ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी प्रास्ताविक केले व अतिथींचे शाब्दिक स्वागत केले.या कार्यक्रमास माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे,जिल्हा न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक मोहन हुंडरी,हे उपस्थित होते. संचालन वरिष्ठ शिक्षिका स्मिता गालफाडे यांनी तर आभार प्रदर्शन वीणा सिंगणजुडे यांनी केले. निबंध स्पर्धेचे परीक्षण वीणा सिंगणजुडे, वैशाली तुमाने, नीता भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक सुनील खिलोटे, विजयकुमार बागडकर व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. कोरोनाच्या काळातील सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.