शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक प्रचारात सामाजिक विचारमंथन आवश्यक

By admin | Updated: December 24, 2015 00:44 IST

अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून...

साकोली : अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून त्यामुळे आपल्या लोकशाही राष्ट्रापुढे राजकीय नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरे तर निवडणुकांच्या प्रचारात विविध सामाजिक निकडीच्या प्रश्नांवरील गंभीर विचारमंथनाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. जोगेंद्र गवई यांनी केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातर्फे सार्वत्रिक निवडणुकामधील अलीकडचे प्रचारप्रवाह व त्यांचा मतदानवर्तनावरील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रातील विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आयोजिलेल्या या चर्चासत्रात बिलासपूर (छत्तीसगढ) येथील डॉ. ब्रिजकिशोर त्रिपाठी यांनी बीजभाषणातून निवडणुकांमधील भयमुक्त मतदानप्रक्रियेच्या आवश्यकतेवर विशेष भर दिला. याप्रसंगी चर्चासत्राचे संयोजक प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रस्तुत विषयाचे गांभीर्य व महत्व अधोरेखित केले. या चर्चासत्राचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी चर्चासत्राच्या विषयावरील शोधनिबंधक संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रस्तुत एकदिवसीय चर्चासत्रामधील सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भूमिका या विषयावरील पहिल्या सत्रात डॉ. मोहन काशीकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या सत्रात डॉ. विजय बोबडे व डॉ. ज्ञानेश्वर शंभरकर यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केलेत.निवडणुकांमधील मुद्रीत माध्यमे, दारोदार प्रचार आणि भव्य रॅलीच्या संदर्भातील दुसऱ्या सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. डी.आर. येवले यांनी भूषविले. या सत्रात डॉ. संजय मोरे व डॉ. प्रवीण भागडीकर यांची प्रभावी भाषणे झालीत. समारोपीय सत्रात डॉ. विवेक दिवाण व डॉ. नंदा सातपुते यांनी चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी समारोपीय भाषणात गंभीर विचारमंथनासाठी सर्व मान्यवर व अभ्यासक वक्त्यांचे व उपस्थित प्रतिनिधीचेही आभार मानले. या चर्चासत्रात डॉ. ए.एल. चुटे, डॉ. अमित टेंभुर्णे व डॉ. एल.पी. नागपूरकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी चर्चासत्राचे आयोजक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)