शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचारात सामाजिक विचारमंथन आवश्यक

By admin | Updated: December 24, 2015 00:44 IST

अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून...

साकोली : अलीकडे देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात वैयक्तिक मानहानीने आणि अभद्र, सवंग भाषाप्रयोगांनी अत्यंत असभ्यतेचा तळ गाठला असून त्यामुळे आपल्या लोकशाही राष्ट्रापुढे राजकीय नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरे तर निवडणुकांच्या प्रचारात विविध सामाजिक निकडीच्या प्रश्नांवरील गंभीर विचारमंथनाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. जोगेंद्र गवई यांनी केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातर्फे सार्वत्रिक निवडणुकामधील अलीकडचे प्रचारप्रवाह व त्यांचा मतदानवर्तनावरील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रातील विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात आयोजिलेल्या या चर्चासत्रात बिलासपूर (छत्तीसगढ) येथील डॉ. ब्रिजकिशोर त्रिपाठी यांनी बीजभाषणातून निवडणुकांमधील भयमुक्त मतदानप्रक्रियेच्या आवश्यकतेवर विशेष भर दिला. याप्रसंगी चर्चासत्राचे संयोजक प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रस्तुत विषयाचे गांभीर्य व महत्व अधोरेखित केले. या चर्चासत्राचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी चर्चासत्राच्या विषयावरील शोधनिबंधक संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रस्तुत एकदिवसीय चर्चासत्रामधील सामाजिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भूमिका या विषयावरील पहिल्या सत्रात डॉ. मोहन काशीकर हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या सत्रात डॉ. विजय बोबडे व डॉ. ज्ञानेश्वर शंभरकर यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केलेत.निवडणुकांमधील मुद्रीत माध्यमे, दारोदार प्रचार आणि भव्य रॅलीच्या संदर्भातील दुसऱ्या सत्रांचे अध्यक्षस्थान डॉ. डी.आर. येवले यांनी भूषविले. या सत्रात डॉ. संजय मोरे व डॉ. प्रवीण भागडीकर यांची प्रभावी भाषणे झालीत. समारोपीय सत्रात डॉ. विवेक दिवाण व डॉ. नंदा सातपुते यांनी चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी समारोपीय भाषणात गंभीर विचारमंथनासाठी सर्व मान्यवर व अभ्यासक वक्त्यांचे व उपस्थित प्रतिनिधीचेही आभार मानले. या चर्चासत्रात डॉ. ए.एल. चुटे, डॉ. अमित टेंभुर्णे व डॉ. एल.पी. नागपूरकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी चर्चासत्राचे आयोजक आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)