शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST

भंडारा : कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनातही गतवर्षभरापासून कर्तव्य निभावत आहेत. एकीकडे २०२०-२१ चा खरीप हंगाम जवळ आल्याने ...

भंडारा : कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनातही गतवर्षभरापासून कर्तव्य निभावत आहेत. एकीकडे २०२०-२१ चा खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या भेटीगाठी, मार्गदर्शन व खरिपाचे नियोजन जिल्ह्यात सुरू आहे. त्यातच दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने आठ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृतांचा आकडाही वाढतच चालला आहे. अशातच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा कर्तव्य निभावताना जीव गमवावा लागल्याने कर्मचाऱ्यांत कोरोनाची दहशत वाढली आहे. अशातच गत आठवड्यात तुमसर तालुक्यातील एका कृषी सहायकाचा कोरोनाने मृत्यू झाला. सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यामुळे त्या कृषी सहायकाच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने तसेच घरात दुसरा कमावता पुरुष नसल्याने कुटुंबीयांना दवाखान्यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी शासनाने तत्काळ दखल घेऊन शासनाच्या आकस्मित निधीअंतर्गत मृत पावलेल्या कृषी सहायकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद मोहतुरे, कोषाध्यक्ष गोपाल मेश्राम, तांत्रिक सल्लागार गणेश शेंडे, जिल्हा संघटक एकनाथ पाखमोडे, सचिव भगीरथ सपाटे, प्रेमदास खेकारे, सचिव भगीरथ सपाटे, राज्य प्रतिनिधी श्रीकांत सपाटे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत भोयर, कार्याध्यक्ष गिरीश रणदिवे, महिला प्रतिनिधी निर्मला भोंगाडे, माहेश्वरी नाहोकर व पदाधिकारी यांनी शासनाकडे केली आहे.

शासनाने आरोग्य विभागासह अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच लागू केले आहे. मात्र, अद्यापही कोविड काळात वर्षभरापासून कार्यरत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापही ५० लाखांचे विमा कवच शासनाने लागू केलेले नाही. आजही अनेक कर्मचारी कोरोना संसर्गाने ग्रासले आहेत. अनेकांच्या जीविताला धोका असून आजपर्यंत राज्यभरात ३५ कृषी कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर दुसरीकडे अनेक कृषी कर्मचारी आजही मृत्यूशी झुंज देत आहेत.

बॉक्स

खरीप हंगामापूर्वी विम्याचा लाभ द्या

एकीकडे खरीप हंगामाचा कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असलेला ताण, तर दुसरीकडे जिल्ह्यात वाढलेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ ५० लाखांच्या विमा योजनेचा लाभ द्यावा. तसेच जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामापूर्वी दवाखान्यांमध्ये कृषी कर्मचाऱ्यांसाठी बेड राखीव ठेवावेत. तसेच इतर प्रशासकीय कामातून कृषी कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशीही मागणी राज्यस्तरावर संघटनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोट

जिल्ह्यातील कृषी विभागात कार्यरत कृषी कर्मचाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. त्यातच शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीचा ताण व जवळ आलेला खरीप हंगाम लक्षात घेता शासनाने तत्काळ कृषी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ देऊन कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयात बेड राखीव ठेवावेत, अशी आमची मागणी आहे.

गोपाल मेश्राम, कोषाध्यक्ष, कृषी सहायक संघटना, भंडारा.