शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साप कधीच सूडभावनेने वागत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:29 IST

सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही.

ठळक मुद्देराहुल डोंगरे : मोहाडी खापा येथे समाज प्रबोधनातून प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही. सापाच्या अंगावर केस नसतात. सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे खडे हे बेझाईनचे असतात. सापाबद्दल समाजात चुकीचे विचार, अंधश्रध्दा पेरल्या गेल्या आहेत. मंत्राने, बाºयानी सापाचे विष उतरत नाही. पेशनीचा साप हा कधीच राहत नाही. साप कधीच सुड घेत नाही. नव्वद टक्के साप बिनविषारी असतात. जर सापाने दंश केल्यास लगेच त्याला रुग्णालयात नेणे हा एकमेव उपाय आहे. सर्प प्रतिबंधात्मक लसीमुळे दंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविता येते. तेव्हा जनतेने अंधश्रध्देला बळी पडू नये असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले. ते पोलीस ठाणे सिहोराच्यावतीने आयोजित अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर समाज प्रबोधन कार्यक्रम मोहाडी खापा येथे समाज प्रबोधन करत असताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिहोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोहर कोरेटी तर प्रमुख अतिथी म्हणून वासू चरडे, पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जटाल, सरपंच कुवरलाल बुध्दे, पंचायत समिती सदस्य विमला कानतोडे, पोलीस पाटील कैलास मिरासे, माजी सरपंच अंबादास कानतोडे, मनोहर शरणागत, ग्रा.पं. सदस्या कविता शरणागत, सुनिल माने, हरीद्वार पटले, रामदयाल पटले, संतोष शरणागत, शामराव बुध्दे, रंजित बुध्दे, ओमप्रकाश शरणागत आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे पुढे म्हणाले की, सापाबद्दल समाजात चुकीचे विचार पेरले गेले आहेत जसे सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीचे मुळ उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. सापाचे विष मंत्रतंत्राने उतरवता येते. कजरीच्या बिया खाल्यास सर्पविष बाधत नाही. याप्रकारच्या गोष्टीवर लोकांनी विश्वास ठेवू नये. सापाला कधी दुध पाजू नये. भुत भानामती जादूटोना या जगात कोठेही नाही. हे पटवून देण्यासाठी त्यांनी चिठ्ठीच्या प्रयोगातून कानाने चिठ्ठी वाचून समाजाला चिकित्सा करुन वैज्ञानिक दृष्टीकोण जागृत करण्याचा प्रयत्न केला व गावातील जी मंडळी मंत्रतंत्राच्या साहाय्याने गडेदोरे, पाणी भरुन देणे, बाºयाच्याद्वारे बाधीत व्यक्तीची दिशाभुल करणे बंद करण्याचे आवाहन केले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेतात त्यांचे प्राण वाचते व जे मंत्रतंत्रावर विश्वास ठेवून ढोंगी बुवाला बळी पडतात. त्यांना प्राणास मुकावे लागते. समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी प्रत्येकानी आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी व वैज्ञानिक दृष्टीकोण जागवून देशाला बळकट करावे अशी विनंती केली जर लोकांनी अंधश्रध्देला खतपाणी घातले तर जादूटोणा विरोधी कायदयांतर्गत पोलीस प्रशासन कारवाई करेल तेव्हा आता तरी जागे व्हा असा मोलाचा संदेश दिला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरपंच कुवरलाल बुध्दे यांनी केले.