शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

साप कधीच सूडभावनेने वागत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:29 IST

सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही.

ठळक मुद्देराहुल डोंगरे : मोहाडी खापा येथे समाज प्रबोधनातून प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सापाला कान नसतात त्यामुळे सापाला ऐकू येत नाही. मेंदु लहान असल्यामुळे स्मरणशक्ती कमजोर असते. साप डूख धरत नाही. सापाच्या अंगावर केस नसतात. सापाच्या डोक्यावर कोणताही मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे खडे हे बेझाईनचे असतात. सापाबद्दल समाजात चुकीचे विचार, अंधश्रध्दा पेरल्या गेल्या आहेत. मंत्राने, बाºयानी सापाचे विष उतरत नाही. पेशनीचा साप हा कधीच राहत नाही. साप कधीच सुड घेत नाही. नव्वद टक्के साप बिनविषारी असतात. जर सापाने दंश केल्यास लगेच त्याला रुग्णालयात नेणे हा एकमेव उपाय आहे. सर्प प्रतिबंधात्मक लसीमुळे दंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविता येते. तेव्हा जनतेने अंधश्रध्देला बळी पडू नये असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले. ते पोलीस ठाणे सिहोराच्यावतीने आयोजित अंधश्रध्दा निर्मुलन या विषयावर समाज प्रबोधन कार्यक्रम मोहाडी खापा येथे समाज प्रबोधन करत असताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिहोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक मनोहर कोरेटी तर प्रमुख अतिथी म्हणून वासू चरडे, पोलीस उपनिरीक्षक ए. जी. जटाल, सरपंच कुवरलाल बुध्दे, पंचायत समिती सदस्य विमला कानतोडे, पोलीस पाटील कैलास मिरासे, माजी सरपंच अंबादास कानतोडे, मनोहर शरणागत, ग्रा.पं. सदस्या कविता शरणागत, सुनिल माने, हरीद्वार पटले, रामदयाल पटले, संतोष शरणागत, शामराव बुध्दे, रंजित बुध्दे, ओमप्रकाश शरणागत आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे पुढे म्हणाले की, सापाबद्दल समाजात चुकीचे विचार पेरले गेले आहेत जसे सर्पदंशाच्या ठिकाणी नागवेलीचे मुळ उगाळून लावल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. सापाचे विष मंत्रतंत्राने उतरवता येते. कजरीच्या बिया खाल्यास सर्पविष बाधत नाही. याप्रकारच्या गोष्टीवर लोकांनी विश्वास ठेवू नये. सापाला कधी दुध पाजू नये. भुत भानामती जादूटोना या जगात कोठेही नाही. हे पटवून देण्यासाठी त्यांनी चिठ्ठीच्या प्रयोगातून कानाने चिठ्ठी वाचून समाजाला चिकित्सा करुन वैज्ञानिक दृष्टीकोण जागृत करण्याचा प्रयत्न केला व गावातील जी मंडळी मंत्रतंत्राच्या साहाय्याने गडेदोरे, पाणी भरुन देणे, बाºयाच्याद्वारे बाधीत व्यक्तीची दिशाभुल करणे बंद करण्याचे आवाहन केले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेतात त्यांचे प्राण वाचते व जे मंत्रतंत्रावर विश्वास ठेवून ढोंगी बुवाला बळी पडतात. त्यांना प्राणास मुकावे लागते. समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी प्रत्येकानी आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी व वैज्ञानिक दृष्टीकोण जागवून देशाला बळकट करावे अशी विनंती केली जर लोकांनी अंधश्रध्देला खतपाणी घातले तर जादूटोणा विरोधी कायदयांतर्गत पोलीस प्रशासन कारवाई करेल तेव्हा आता तरी जागे व्हा असा मोलाचा संदेश दिला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सरपंच कुवरलाल बुध्दे यांनी केले.