शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शिवारातून निघू लागलाय धूर

By admin | Updated: June 9, 2017 00:40 IST

काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे.

चाहूल खरीप हंगामाची : कर्जासाठी धावपळ सुरुराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतशिवारातून निघणारे धूर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचे संकेत देत आहे. जणू या धुरातून धुक्याची अनुभूती होत आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. उकाडा सहन करीत बळीराजा शेतीत राबायला सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मुख्य पीक असल्याने मशागतीसाठी शेतकरी बांधावर जावून अनावश्यक केरकचरा काढत आहे. हा काडीकचरा पेटवत आहे. पेटलेल्या कचऱ्यातून निघणारा धूर खरीप हंगाम सुरु झाल्याची चाहूल देत आहे. घरी निघणारा दररोजचा केरकचरा, जनावरांचे शेण, वर्षभर खड्ड्यात घातलेल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ते खत शेतात टाकत आहे. धान शेती बेभरवशाची झाली आहे. घरी दाणा येईपर्यंत काही खरे नसते. उत्पादन खर्चाएवढा भाव शेतमालाला मिळत नाही, हे वास्तव असले तरी सगळे विसरून सगळे राबायला सज्ज होतो. वर्षभराचे घरी खायला पिकले तरी शेतकरी समाधानाने झोपतो. परंतु असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही, ज्याच्यावर कर्ज नाही. बँक, सावकार हातउसणे आदी कर्जाचा भार शेतकऱ्यांवर असतो. शेतीतून कर्जाची परतफेड होईल, याची शाश्वती नसणारा शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जाच्या खाईत जावून पडतो. तिथून निघणे अवघड असते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न, सण आदीचा खर्च शेतकरी कसा करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मायबाप सरकारला कळल्या नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कराल तर टिकाल असे बोलले जाते. ते खरे असेलही. परंतु प्रत्यक्षात हे शक्य नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे, खत, कीटकनाशके शेतीपयोगी साहित्यांचा भाव वाढतच आहे. शेतकऱ्यांना हवा उत्पादन खर्चाएवढा भाव, सिंचन सुविधा, नियमित वीज, सुटीवर बियाणे, खत व अवजार साहित्य एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कितीही ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’चे गुण गायले जात असले तरी ते निरर्थकच. आजही शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. वीज कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. पाच सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पैशाची सोय करावीच लागते. तेव्हा कुठे वीज कनेक्शन मिळत असते. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असे म्हटले जाते. आता शेतकरी दु:खी राजकारणी सुखी असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष घटक योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीच १०० टक्के अनुदानावर बियाणे, खते दिली जाणार आहेत. इतर शेतकऱ्यांना बि बियाणे खताच्या योजना नाहीत. कृषी केंद्रात यावर्षी मुबलक धानाचे वाण व खते उपलब्ध झाली आहेत.- रविंद्र वंजारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.