शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवारातून निघू लागलाय धूर

By admin | Updated: June 9, 2017 00:40 IST

काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे.

चाहूल खरीप हंगामाची : कर्जासाठी धावपळ सुरुराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतशिवारातून निघणारे धूर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचे संकेत देत आहे. जणू या धुरातून धुक्याची अनुभूती होत आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. उकाडा सहन करीत बळीराजा शेतीत राबायला सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मुख्य पीक असल्याने मशागतीसाठी शेतकरी बांधावर जावून अनावश्यक केरकचरा काढत आहे. हा काडीकचरा पेटवत आहे. पेटलेल्या कचऱ्यातून निघणारा धूर खरीप हंगाम सुरु झाल्याची चाहूल देत आहे. घरी निघणारा दररोजचा केरकचरा, जनावरांचे शेण, वर्षभर खड्ड्यात घातलेल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ते खत शेतात टाकत आहे. धान शेती बेभरवशाची झाली आहे. घरी दाणा येईपर्यंत काही खरे नसते. उत्पादन खर्चाएवढा भाव शेतमालाला मिळत नाही, हे वास्तव असले तरी सगळे विसरून सगळे राबायला सज्ज होतो. वर्षभराचे घरी खायला पिकले तरी शेतकरी समाधानाने झोपतो. परंतु असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही, ज्याच्यावर कर्ज नाही. बँक, सावकार हातउसणे आदी कर्जाचा भार शेतकऱ्यांवर असतो. शेतीतून कर्जाची परतफेड होईल, याची शाश्वती नसणारा शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जाच्या खाईत जावून पडतो. तिथून निघणे अवघड असते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न, सण आदीचा खर्च शेतकरी कसा करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मायबाप सरकारला कळल्या नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कराल तर टिकाल असे बोलले जाते. ते खरे असेलही. परंतु प्रत्यक्षात हे शक्य नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे, खत, कीटकनाशके शेतीपयोगी साहित्यांचा भाव वाढतच आहे. शेतकऱ्यांना हवा उत्पादन खर्चाएवढा भाव, सिंचन सुविधा, नियमित वीज, सुटीवर बियाणे, खत व अवजार साहित्य एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कितीही ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’चे गुण गायले जात असले तरी ते निरर्थकच. आजही शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. वीज कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. पाच सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पैशाची सोय करावीच लागते. तेव्हा कुठे वीज कनेक्शन मिळत असते. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असे म्हटले जाते. आता शेतकरी दु:खी राजकारणी सुखी असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष घटक योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीच १०० टक्के अनुदानावर बियाणे, खते दिली जाणार आहेत. इतर शेतकऱ्यांना बि बियाणे खताच्या योजना नाहीत. कृषी केंद्रात यावर्षी मुबलक धानाचे वाण व खते उपलब्ध झाली आहेत.- रविंद्र वंजारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.