शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शिवारातून निघू लागलाय धूर

By admin | Updated: June 9, 2017 00:40 IST

काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे.

चाहूल खरीप हंगामाची : कर्जासाठी धावपळ सुरुराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतशिवारातून निघणारे धूर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचे संकेत देत आहे. जणू या धुरातून धुक्याची अनुभूती होत आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. उकाडा सहन करीत बळीराजा शेतीत राबायला सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मुख्य पीक असल्याने मशागतीसाठी शेतकरी बांधावर जावून अनावश्यक केरकचरा काढत आहे. हा काडीकचरा पेटवत आहे. पेटलेल्या कचऱ्यातून निघणारा धूर खरीप हंगाम सुरु झाल्याची चाहूल देत आहे. घरी निघणारा दररोजचा केरकचरा, जनावरांचे शेण, वर्षभर खड्ड्यात घातलेल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ते खत शेतात टाकत आहे. धान शेती बेभरवशाची झाली आहे. घरी दाणा येईपर्यंत काही खरे नसते. उत्पादन खर्चाएवढा भाव शेतमालाला मिळत नाही, हे वास्तव असले तरी सगळे विसरून सगळे राबायला सज्ज होतो. वर्षभराचे घरी खायला पिकले तरी शेतकरी समाधानाने झोपतो. परंतु असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही, ज्याच्यावर कर्ज नाही. बँक, सावकार हातउसणे आदी कर्जाचा भार शेतकऱ्यांवर असतो. शेतीतून कर्जाची परतफेड होईल, याची शाश्वती नसणारा शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जाच्या खाईत जावून पडतो. तिथून निघणे अवघड असते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न, सण आदीचा खर्च शेतकरी कसा करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मायबाप सरकारला कळल्या नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कराल तर टिकाल असे बोलले जाते. ते खरे असेलही. परंतु प्रत्यक्षात हे शक्य नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे, खत, कीटकनाशके शेतीपयोगी साहित्यांचा भाव वाढतच आहे. शेतकऱ्यांना हवा उत्पादन खर्चाएवढा भाव, सिंचन सुविधा, नियमित वीज, सुटीवर बियाणे, खत व अवजार साहित्य एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कितीही ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’चे गुण गायले जात असले तरी ते निरर्थकच. आजही शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. वीज कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. पाच सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पैशाची सोय करावीच लागते. तेव्हा कुठे वीज कनेक्शन मिळत असते. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असे म्हटले जाते. आता शेतकरी दु:खी राजकारणी सुखी असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष घटक योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीच १०० टक्के अनुदानावर बियाणे, खते दिली जाणार आहेत. इतर शेतकऱ्यांना बि बियाणे खताच्या योजना नाहीत. कृषी केंद्रात यावर्षी मुबलक धानाचे वाण व खते उपलब्ध झाली आहेत.- रविंद्र वंजारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.