शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवारातून निघू लागलाय धूर

By admin | Updated: June 9, 2017 00:40 IST

काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे.

चाहूल खरीप हंगामाची : कर्जासाठी धावपळ सुरुराजू बांते। लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : काळ्या मातीत मातीत... हे गीत कानावर आले की, नजरेसमोर येतो तो शेतकरी, शेतकरी राजा काळ्या मातीत राबण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतशिवारातून निघणारे धूर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचे संकेत देत आहे. जणू या धुरातून धुक्याची अनुभूती होत आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. उकाडा सहन करीत बळीराजा शेतीत राबायला सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मुख्य पीक असल्याने मशागतीसाठी शेतकरी बांधावर जावून अनावश्यक केरकचरा काढत आहे. हा काडीकचरा पेटवत आहे. पेटलेल्या कचऱ्यातून निघणारा धूर खरीप हंगाम सुरु झाल्याची चाहूल देत आहे. घरी निघणारा दररोजचा केरकचरा, जनावरांचे शेण, वर्षभर खड्ड्यात घातलेल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ते खत शेतात टाकत आहे. धान शेती बेभरवशाची झाली आहे. घरी दाणा येईपर्यंत काही खरे नसते. उत्पादन खर्चाएवढा भाव शेतमालाला मिळत नाही, हे वास्तव असले तरी सगळे विसरून सगळे राबायला सज्ज होतो. वर्षभराचे घरी खायला पिकले तरी शेतकरी समाधानाने झोपतो. परंतु असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही, ज्याच्यावर कर्ज नाही. बँक, सावकार हातउसणे आदी कर्जाचा भार शेतकऱ्यांवर असतो. शेतीतून कर्जाची परतफेड होईल, याची शाश्वती नसणारा शेतकरी दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर कर्जाच्या खाईत जावून पडतो. तिथून निघणे अवघड असते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, लग्न, सण आदीचा खर्च शेतकरी कसा करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मायबाप सरकारला कळल्या नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कराल तर टिकाल असे बोलले जाते. ते खरे असेलही. परंतु प्रत्यक्षात हे शक्य नाही. शेतकऱ्यांना प्रत्येक वस्तू खरेदी करावी लागते. बियाणे, खत, कीटकनाशके शेतीपयोगी साहित्यांचा भाव वाढतच आहे. शेतकऱ्यांना हवा उत्पादन खर्चाएवढा भाव, सिंचन सुविधा, नियमित वीज, सुटीवर बियाणे, खत व अवजार साहित्य एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कितीही ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’चे गुण गायले जात असले तरी ते निरर्थकच. आजही शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. वीज कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. पाच सहा महिने प्रतीक्षा करावी लागते. वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पैशाची सोय करावीच लागते. तेव्हा कुठे वीज कनेक्शन मिळत असते. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ असे म्हटले जाते. आता शेतकरी दु:खी राजकारणी सुखी असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष घटक योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांसाठीच १०० टक्के अनुदानावर बियाणे, खते दिली जाणार आहेत. इतर शेतकऱ्यांना बि बियाणे खताच्या योजना नाहीत. कृषी केंद्रात यावर्षी मुबलक धानाचे वाण व खते उपलब्ध झाली आहेत.- रविंद्र वंजारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.