शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

स्मार्टफोनने आणली सायबर कॅफेवर संक्रांत

By admin | Updated: October 29, 2014 22:44 IST

दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची.

भंडारा : दोन वर्षाअगोदर सायबर कॅफेला फार महत्व होते. मित्रांसोबत चॅटिंग, शैक्षणिक कामासाठी सायबर कॅफेचा वापर, ई-मेलद्वारे संदेश पाठवण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी असायची. मात्र, आता हे चित्र पालटले असून आता सायबर कॅफेवर मोबाईलमुळे संक्रांत आली आहे.आधुनिक काळातील नव्या तंत्रज्ञानाबरोबरच मोबाईल जगतातही क्रांती झाली आहे. टॅब, आयफोन यांच्याबरोबर दररोज बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञान, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमती, नवीन विकसित तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरण्याची वृत्ती, सहज आणि वेगाने उपलब्ध होणारे इंटरनेट यामुळे सध्याचा जमाना चांगलाच वेगवान झाला आहे. जगभरात कोणतीही गोष्ट घडली की, ताबडतोब ती आपल्यापर्यंत पोहोचते. गॅस सिलिंडरचा नंबर लावण्यापासून घरगुती कोणतेही बिल भरण्यासाठी, स्पर्धा परीक्षांचा फार्म भरण्यापासून सोशल मिडिया वापरण्यापर्यंतची सर्वच कामे घरच्या घरी हातातल्या मोबाईल, टॅब या साधनांमुळे सहज शक्य होत आहेत. साधारणपणे १२-१५ वर्षापूर्वी सायबर कॅफे नावाची संकल्पना रूढ होऊ लागली. सायबर कॅफे ही संकल्पना आपल्याकडे फारशी माहिती नव्हती. इंटरनेट म्हणजे खूब काही तरी गंभीर, अवघड, आपल्या कार्यकक्षेच्या बाहेरील गोष्ट असेच बोलले जात होते. परंतु, हळूहळू शिक्षण, सामाजिक, आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा शिरकाव होऊ लागला. त्यानंतर सायबर कॅफेची गरज वाढल्याने शहरात ठिकठिकाणी सायबर कॅफे उघडण्यात आले.गेम, सोशल नेटवर्किंग साईट्स, त्यावर आधारित कलाकृती, शैक्षणिक अभ्यासक्रम वाढत गेले तसे समाजात इंटरनेटबाबत अधिक माहिती होत गेली. सायबर कॅफे विद्यार्थी, तरूणांच्या गर्दीने फुलून जात होते. महाविद्यालय प्रवेश असो, अभियांत्रिकीचा कॅप राऊंड असो, एसटी किंवा रेल्वेचे आरक्षण असो प्रत्येक गोष्टीच इंटरनेटची पर्यायाने इंटरनेट कॅफेची गरज भासू लागली. त्याच दरम्यान, आपल्याकडे मोबाईल विकसित होत गेला. सुरूवातीला मोबाईलही महागडे होते, मात्र, नंतर मोबाईल निर्मिती जगतात विविध कंपन्यांनी शिरकाव केल्याने सर्वसामान्यांना परवडेल अशा मोबाईलची निर्मिती झाली आणि प्रत्येक घरात मोबाईलने प्रवेश केला. आता तर स्मार्टफोनही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होत असल्याने फेसबुक, ट्विटरसारखे सोशल साईट्स मोबाईलवरच उपलब्ध झाले आहे. पर्यायाने इंटरनेटची सुविधा मोबाईलवर मिळत असल्याने अनेक शैक्षणिक कामेही मोबाईलवर होत असल्याने सायबर कॅफेत तासनतास घालविणारा विद्यार्थी आता घरबसल्या मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाईलचा वापर करू लागला आहे. मोबाईलने जग जवळ आणले तर इंटरनेटने जग सोडले आहे. त्यामुळे सायबर कॅफेची गरज आता तेवढी भासत नसून हातातच तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. (शहर प्रतिनिधी)