खराशी : लाखनी तालुक्यातील परिसरातील खराशी, लोहारा, खुनारी, घोडेझरी, पळसगाव, विहीरगाव आदी गावात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीठीमुळे घरांचे अतोनात नुकसान झाले. घराच्या छतावर असणाऱ्या कवेलू चकनाचूर झाल्या. यानंतर शासनाने मदत जाहीर केली. मात्र ती मदत अर्ध्या गारपीठग्रस्तांना मिळाली तर अर्धे अजुनही प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आजही कित्येक घरांचे छत आहेत त्याच परिस्थतीत आहेत. पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ज्या घराच्या कवेलू आर्थिक परिस्थितीमुळे तसेच मदत न मिळाल्यामुळे फूटलेल्या अवस्थेतच आहेत. काहींनी पुन्हा ताळपत्र्या व टिनाच्या पत्र्यांचा आधार घेतला आहे. शासनाने मदत जाहीर केली ती सुद्धा तुटपूंजी आहे. एकीकडे ८० हजार ते २ लाख एवढा खर्च असताना गारपीटग्रस्तांना ३२०० रूपये देवून तोंडाला पाणे पुसण्याचा प्रकार केला आहे. त्यामध्ये भर म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना मदत मिळू शकली नाही. यापेक्षा दुर्देवी घटना दुरूस्ती दिसत नाही. गारपीठ कोसळली तेव्हा अनेक लोकप्रतिनिधी भेटी देवून गेले कुणी आश्वासन देवून गेले तर कुणी आंदोलन करण्याचा इशारा देवून गेले. मात्र एकही गोष्ट अजुनपर्यंत प्रत्यक्षात होताना दिसली नाही. शेवटी या गारपीठग्रस्तांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींचे राजकीय संबंध आहेत ज्यांचे धोडे वजन आहे, अशा व्यक्ती तहसील कार्यालयात धाव घेवून आपल्या खात्यावर मदत जमा करवून घेण्यात यशस्वी झाले. मात्र गरीब जनतेच काय त्यांनी मदत कोण करणार. आज ज्या घरांवरील कवेलू फुटलेल्या अवस्थेत आहेत त्यांच पावसाळ्यात कसे होणार हा प्रश्न अनुत्तरीय आहे. संबंधित विभागाने थोडासा लक्ष घालून मानुसकीच्या नात्याखातीर गारपीटग्रस्तांचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावे, अशी भावनिक मागणी माजी पं.स. सदस्य वसंता शेळके, हेमंतकुमार सेलोकर, अनिल फुंडे, उत्तम मेंढे, योगेश झलके, सुभाष ढोके, पुरूषोत्तम फटे, लेकराम मेश्राम, सुसनिल लुटे यांनी केली आहे. (वार्ताहर)
मदतीअभावी गारपीटग्रस्त घरांची परिस्थिती ‘जैसे थे’
By admin | Updated: June 14, 2014 01:38 IST