शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

मदतीअभावी गारपीटग्रस्त घरांची परिस्थिती ‘जैसे थे’

By admin | Updated: June 14, 2014 01:38 IST

लाखनी तालुक्यातील परिसरातील खराशी, लोहारा, खुनारी, घोडेझरी, पळसगाव, विहीरगाव आदी ...

खराशी : लाखनी तालुक्यातील परिसरातील खराशी, लोहारा, खुनारी, घोडेझरी, पळसगाव, विहीरगाव आदी गावात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीठीमुळे घरांचे अतोनात नुकसान झाले. घराच्या छतावर असणाऱ्या कवेलू चकनाचूर झाल्या. यानंतर शासनाने मदत जाहीर केली. मात्र ती मदत अर्ध्या गारपीठग्रस्तांना मिळाली तर अर्धे अजुनही प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आजही कित्येक घरांचे छत आहेत त्याच परिस्थतीत आहेत. पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ज्या घराच्या कवेलू आर्थिक परिस्थितीमुळे तसेच मदत न मिळाल्यामुळे फूटलेल्या अवस्थेतच आहेत. काहींनी पुन्हा ताळपत्र्या व टिनाच्या पत्र्यांचा आधार घेतला आहे. शासनाने मदत जाहीर केली ती सुद्धा तुटपूंजी आहे. एकीकडे ८० हजार ते २ लाख एवढा खर्च असताना गारपीटग्रस्तांना ३२०० रूपये देवून तोंडाला पाणे पुसण्याचा प्रकार केला आहे. त्यामध्ये भर म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना मदत मिळू शकली नाही. यापेक्षा दुर्देवी घटना दुरूस्ती दिसत नाही. गारपीठ कोसळली तेव्हा अनेक लोकप्रतिनिधी भेटी देवून गेले कुणी आश्वासन देवून गेले तर कुणी आंदोलन करण्याचा इशारा देवून गेले. मात्र एकही गोष्ट अजुनपर्यंत प्रत्यक्षात होताना दिसली नाही. शेवटी या गारपीठग्रस्तांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींचे राजकीय संबंध आहेत ज्यांचे धोडे वजन आहे, अशा व्यक्ती तहसील कार्यालयात धाव घेवून आपल्या खात्यावर मदत जमा करवून घेण्यात यशस्वी झाले. मात्र गरीब जनतेच काय त्यांनी मदत कोण करणार. आज ज्या घरांवरील कवेलू फुटलेल्या अवस्थेत आहेत त्यांच पावसाळ्यात कसे होणार हा प्रश्न अनुत्तरीय आहे. संबंधित विभागाने थोडासा लक्ष घालून मानुसकीच्या नात्याखातीर गारपीटग्रस्तांचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावे, अशी भावनिक मागणी माजी पं.स. सदस्य वसंता शेळके, हेमंतकुमार सेलोकर, अनिल फुंडे, उत्तम मेंढे, योगेश झलके, सुभाष ढोके, पुरूषोत्तम फटे, लेकराम मेश्राम, सुसनिल लुटे यांनी केली आहे. (वार्ताहर)