शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

साहेब, पीककर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना ...

पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना झाला तरी चुकारे नाही. आता पीककर्ज भरण्यासाठी आठवडाही उरला नाही. सांगा अशाने आम्हाला शून्य व्याज दर योजनेचा कसा फायदा मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपुढे हा नवा पेच निर्माण झाला आहे. साहेब, पीक कर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी... अशी आर्त हाक शेतकरी शासनाला मारत आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची रक्कम भरण्यासाठी शेवटची तरीख ३१ मार्च आहे. यापूर्वी पैसे भरले तरच शून्य व्याजदर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वेळेत पीक कर्ज भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आधारभूत केंद्रावर आपला धान विकाला. काही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले पण हजारो शेतकरी गत महिना दीड महिन्यापासून चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात मिळेल त्याच्याकडून उधार उसनवार घेण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. पीक कर्ज भरण्याची अंतिम घडी जवळ येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाकडेच शेतकऱ्यांचे पैसे आहेत, पण ते पैसे ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटाका बसणार आहे. गत वर्षापासूनची नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आशादायी ठरलेली प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना मृगजळच ठरलेली आहे.

शासनाने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर झालेला आहे. तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. गतवर्षी हाच बोनस शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याकरिता महत्त्वाचा ठरलेला होता. १८ फेब्रुवारीपासून धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. आता शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहेत.

बॉक्स

आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची चुकारे अगदी दोन ते तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. असा आशावाद जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांच्याकडून कळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे टकाणे सुरू झाले आहेत. पालांदूर सेंटरला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागू शकतो. अशी अधिकृत माहिती जिल्हा पणन कार्यालयाकडून मिळालेली आहे.

कोट

शासनाने आमचे हक्काचे असलेले पैसे वेळेत आम्हाला दिल्यास शून्य व्याज जर योजनेचे लाभार्थी ठरू. शासन-प्रशासनाने ३१ मार्चपूर्वी आमचे पैसे खात्यात वळते करावे. ओला दुष्काळ, मावा, तुडतुडे यांनी आलेले अत्यल्प उत्पन्न निश्चितच चिंतादाई ठरले. सरकारने आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्यावे व आमची चिंता दूर करावी.

मनोहर खंडाईत, शेतकरी