शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

साहेब, पीककर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना ...

पालांदूर : मोठ्या मेहनतीने धान पिकवला. आधारभूत केंद्रावर धान विकण्यासाठी धडपड केली. एकदाचा धान विकला. पण आता दीड महिना झाला तरी चुकारे नाही. आता पीककर्ज भरण्यासाठी आठवडाही उरला नाही. सांगा अशाने आम्हाला शून्य व्याज दर योजनेचा कसा फायदा मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी करीत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांपुढे हा नवा पेच निर्माण झाला आहे. साहेब, पीक कर्ज भरायचे आहे, धानाचे पैसे द्या जी... अशी आर्त हाक शेतकरी शासनाला मारत आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची रक्कम भरण्यासाठी शेवटची तरीख ३१ मार्च आहे. यापूर्वी पैसे भरले तरच शून्य व्याजदर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी वेळेत पीक कर्ज भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आधारभूत केंद्रावर आपला धान विकाला. काही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले पण हजारो शेतकरी गत महिना दीड महिन्यापासून चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात मिळेल त्याच्याकडून उधार उसनवार घेण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. पीक कर्ज भरण्याची अंतिम घडी जवळ येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाकडेच शेतकऱ्यांचे पैसे आहेत, पण ते पैसे ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटाका बसणार आहे. गत वर्षापासूनची नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आशादायी ठरलेली प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना मृगजळच ठरलेली आहे.

शासनाने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर झालेला आहे. तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. गतवर्षी हाच बोनस शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याकरिता महत्त्वाचा ठरलेला होता. १८ फेब्रुवारीपासून धानाचे चुकारे प्रलंबित आहेत. आता शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहेत.

बॉक्स

आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची चुकारे अगदी दोन ते तीन दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. असा आशावाद जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांच्याकडून कळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे टकाणे सुरू झाले आहेत. पालांदूर सेंटरला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागू शकतो. अशी अधिकृत माहिती जिल्हा पणन कार्यालयाकडून मिळालेली आहे.

कोट

शासनाने आमचे हक्काचे असलेले पैसे वेळेत आम्हाला दिल्यास शून्य व्याज जर योजनेचे लाभार्थी ठरू. शासन-प्रशासनाने ३१ मार्चपूर्वी आमचे पैसे खात्यात वळते करावे. ओला दुष्काळ, मावा, तुडतुडे यांनी आलेले अत्यल्प उत्पन्न निश्चितच चिंतादाई ठरले. सरकारने आमचे हक्काचे पैसे आम्हाला द्यावे व आमची चिंता दूर करावी.

मनोहर खंडाईत, शेतकरी