शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शिशू की तरह सरल और पानी की तरह तरल बनो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:40 IST

क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

ठळक मुद्देनऊ वर्षापूर्वीच्या प्रवचनाला उजाळा : मुनीश्री तरुणसागरजी महाराजांच्या अलौकिक उपदेशाने तृप्त झाले होते भंडारेकर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.क्रांतीकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे प्रवचन म्हणजे एक पर्वणीच. सरळ सोप्या भाषेतून नागरिकांना ते उपदेश करायचे. आपल्या विशिष्ट लकबीतून वाईट चालीरितींवर प्रहार करायचे. संपूर्ण विश्वात ख्यातकीर्त असलेले तरुण सागरजी महाराज यांचे आगमन भंडारा शहरात ५ नोव्हेंबर २००९ रोजी पदयात्रेदरम्यान झाले होते. त्यांनी भंडारा येथे एक दिवस विश्रांती घेतली.त्यावेळी भंडारा येथील नागरिकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ आणि अनमोल वचने ऐकण्याची संधी मिळाली. जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात तर प्रवचन ऐकायला एवढी गर्दी झाली होती की, पाय ठेवायलाही जागा नव्हती. मुनीश्रींचे पालखीतून आगमन झाले, त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती. सभामंडपात तयार केलेल्या विशाल व्यासपीठावर मुनीश्रींचे आगमन झाले तेव्हा उपस्थित प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले होते.यावेळी तत्कालीन आमदार राजेंद्र जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी पद प्राक्षालन केले. राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, रुबी चढ्ढा, केशवराव निर्वाण यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. यानंतर मुनश्रींच्या ओजस्वी वाणीतून प्रवचनाला प्रारंभ झाला.संतश्री तरुण सागरजी महाराज म्हणाले, पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या धोक्याबाबत नेहमी बोलले जाते. त्यापासून बचावाचे उपायही शोधले जात आहेत. परंतु यापेक्षाही विचारांचे प्रदूषण अधिक धोकादायक आहे. या प्रदूषणाने माणसाचे मन दूषित केले आहे. माणसाचे विचारावर नियंत्रण नाही. तो बोलतो एक आणि करतो एक अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देत आपले मन ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा उपदेश दिला. लहान मुलाचे मन जसे सरळ असते आणि पाणी सरळ असते अशा रुपकातून त्यांनी श्रोत्यांना संदेश दिला. मुनश्रींचे शब्दनशब्द उपस्थित श्रोत्यांनी आपल्या मनात कायमचे साठवून घेतले. शनिवारी मुनश्री तरुणसागरजी महाराज यांच्या देहवसनाचे वृत्त धडकताच भंडारेकर त्यांच्या आठवणींनी शोकमग्न झाले.