शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शिशू की तरह सरल और पानी की तरह तरल बनो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:40 IST

क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

ठळक मुद्देनऊ वर्षापूर्वीच्या प्रवचनाला उजाळा : मुनीश्री तरुणसागरजी महाराजांच्या अलौकिक उपदेशाने तृप्त झाले होते भंडारेकर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराज यांचे कडवे वचन ऐकण्याचे भाग्य भंडारा येथील नागरिकांना लाभले. येथील जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात ५ नोव्हेंबर २००९ रोजी केलेला उपदेश ऐकून भंडारेकर तृप्त झाले होते. ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा मुनीश्रींचा उपदेश आजही भंडारा येथील श्रोत्यांच्या स्मरणात आहे. मुनीश्रींचे देहावसान झाल्याचे वृत्त धडकताच भंडारा येथील प्रवचनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.क्रांतीकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे प्रवचन म्हणजे एक पर्वणीच. सरळ सोप्या भाषेतून नागरिकांना ते उपदेश करायचे. आपल्या विशिष्ट लकबीतून वाईट चालीरितींवर प्रहार करायचे. संपूर्ण विश्वात ख्यातकीर्त असलेले तरुण सागरजी महाराज यांचे आगमन भंडारा शहरात ५ नोव्हेंबर २००९ रोजी पदयात्रेदरम्यान झाले होते. त्यांनी भंडारा येथे एक दिवस विश्रांती घेतली.त्यावेळी भंडारा येथील नागरिकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ आणि अनमोल वचने ऐकण्याची संधी मिळाली. जशभाई मुलजीभाई पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात तर प्रवचन ऐकायला एवढी गर्दी झाली होती की, पाय ठेवायलाही जागा नव्हती. मुनीश्रींचे पालखीतून आगमन झाले, त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती. सभामंडपात तयार केलेल्या विशाल व्यासपीठावर मुनीश्रींचे आगमन झाले तेव्हा उपस्थित प्रत्येक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले होते.यावेळी तत्कालीन आमदार राजेंद्र जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी पद प्राक्षालन केले. राष्ट्रवादीचे धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, रुबी चढ्ढा, केशवराव निर्वाण यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. यानंतर मुनश्रींच्या ओजस्वी वाणीतून प्रवचनाला प्रारंभ झाला.संतश्री तरुण सागरजी महाराज म्हणाले, पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या धोक्याबाबत नेहमी बोलले जाते. त्यापासून बचावाचे उपायही शोधले जात आहेत. परंतु यापेक्षाही विचारांचे प्रदूषण अधिक धोकादायक आहे. या प्रदूषणाने माणसाचे मन दूषित केले आहे. माणसाचे विचारावर नियंत्रण नाही. तो बोलतो एक आणि करतो एक अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देत आपले मन ‘शिशु की तरह सरल और पानी की तरह तरल बनो’ असा उपदेश दिला. लहान मुलाचे मन जसे सरळ असते आणि पाणी सरळ असते अशा रुपकातून त्यांनी श्रोत्यांना संदेश दिला. मुनश्रींचे शब्दनशब्द उपस्थित श्रोत्यांनी आपल्या मनात कायमचे साठवून घेतले. शनिवारी मुनश्री तरुणसागरजी महाराज यांच्या देहवसनाचे वृत्त धडकताच भंडारेकर त्यांच्या आठवणींनी शोकमग्न झाले.