शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे ...

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे

चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे कामांना यांत्रिकी विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने सुरुवात केली असली तरी गाळ आणि केरकचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात आले नाही. यामुळे कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत. यात शासनाच्या निधीचे वारे न्यारे होणार असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी १२ हजार हेक्टर आर शेतीला वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजकरिता पाटबंधारे विभागाचे कार्यलय आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणकरिता स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत. उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून, स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. प्रत्येकी कालवाअंतर्गत ६ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणली जात आहे. पाणी वाटपाचे नियोजन करण्याचे आधी कालवे आणि नहरे स्वच्छ करण्यात येत आहेत.

खरीप आणि उन्हाळी धान पिकांचे लागवडकरिता पाणीवाटप करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ आणि नहरे खोलीकरणाची कामे करण्यासाठी जलसंपदा विभागाअंतर्गत ई निविदा काढण्यात येत आहेत. निविदा धारक स्वतःचे यंत्रामार्फत कालवे, नहरे आदी स्वच्छ व खोलीकरण करीत आहेत. कालव्यातील निघणाऱ्या गाळ व केरकचऱ्याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत आहे. कालवे व नहरातील गाळ, केरकचरा, खोलीकरण करण्याचे कामे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाअंतर्गत करण्यात येत आहेत. उजवा कालवा अंतर्गत मुख्य कालव्यातील गाळ व केरकचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उपसा करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ काठावर ठेवण्यात येत आहे. गाळ आणि केरकचरा पुन्हा कालव्यात जमा होत आहे. यामुळे शासनाच्या निधीचे वारे न्यारे करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकी विभागाअंतर्गत काठावरील माती मिश्रित गाळ ट्रॅक्टरच्या साहायाने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. यांत्रिकी विभाग गाळ काढण्याची औपचारिकता करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जेसीबी मशीनचालकाला गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे गाळ व केरकचरा काढताना ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. यात शासनाच्या निधीचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, गाळ उपसा करताना पारदर्शकता नाही. परिसरातील कालवे आणि नहरे गाळ व केरकचऱ्याने तुंबले आहेत. यामुळे जलद गतीने पाणी शेतशिवारात पोहोचत नाही. यानंतर शेतकऱ्यांची बोंबाबोंब सुरू होत आहे. शासनाने या बाबीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

सत्यतेला अधिकाऱ्यांचा दुजोरा

कालव्यातील मातीमिश्रित गाळ आणि केरकचरा उपसा करताना अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. उपसा करण्यात आलेली गाळ कालव्याचे काठावर ठेवण्यात येत असल्याने पुन्हा कालव्यात जमा होणार आहे. यामुळे ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होणार आहे. या प्रकाराला उजव्या कालव्याचे शाखा अभियंता गंगाधर हटवार यांनी दुजोरा दिला आहे. कालव्यातून निघालेल्या गाळ व केरकचऱ्याची अन्य जागेत विल्हेवाट लावण्याची गरज असून, हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, असे असले तरी हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आलेला नाही. यामुळे चर्चां सुरू झालेल्या आहेत.