शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे ...

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे

चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे कामांना यांत्रिकी विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने सुरुवात केली असली तरी गाळ आणि केरकचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात आले नाही. यामुळे कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत. यात शासनाच्या निधीचे वारे न्यारे होणार असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी १२ हजार हेक्टर आर शेतीला वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजकरिता पाटबंधारे विभागाचे कार्यलय आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणकरिता स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत. उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून, स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. प्रत्येकी कालवाअंतर्गत ६ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणली जात आहे. पाणी वाटपाचे नियोजन करण्याचे आधी कालवे आणि नहरे स्वच्छ करण्यात येत आहेत.

खरीप आणि उन्हाळी धान पिकांचे लागवडकरिता पाणीवाटप करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ आणि नहरे खोलीकरणाची कामे करण्यासाठी जलसंपदा विभागाअंतर्गत ई निविदा काढण्यात येत आहेत. निविदा धारक स्वतःचे यंत्रामार्फत कालवे, नहरे आदी स्वच्छ व खोलीकरण करीत आहेत. कालव्यातील निघणाऱ्या गाळ व केरकचऱ्याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत आहे. कालवे व नहरातील गाळ, केरकचरा, खोलीकरण करण्याचे कामे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाअंतर्गत करण्यात येत आहेत. उजवा कालवा अंतर्गत मुख्य कालव्यातील गाळ व केरकचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उपसा करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ काठावर ठेवण्यात येत आहे. गाळ आणि केरकचरा पुन्हा कालव्यात जमा होत आहे. यामुळे शासनाच्या निधीचे वारे न्यारे करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकी विभागाअंतर्गत काठावरील माती मिश्रित गाळ ट्रॅक्टरच्या साहायाने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. यांत्रिकी विभाग गाळ काढण्याची औपचारिकता करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जेसीबी मशीनचालकाला गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे गाळ व केरकचरा काढताना ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. यात शासनाच्या निधीचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, गाळ उपसा करताना पारदर्शकता नाही. परिसरातील कालवे आणि नहरे गाळ व केरकचऱ्याने तुंबले आहेत. यामुळे जलद गतीने पाणी शेतशिवारात पोहोचत नाही. यानंतर शेतकऱ्यांची बोंबाबोंब सुरू होत आहे. शासनाने या बाबीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

सत्यतेला अधिकाऱ्यांचा दुजोरा

कालव्यातील मातीमिश्रित गाळ आणि केरकचरा उपसा करताना अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. उपसा करण्यात आलेली गाळ कालव्याचे काठावर ठेवण्यात येत असल्याने पुन्हा कालव्यात जमा होणार आहे. यामुळे ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होणार आहे. या प्रकाराला उजव्या कालव्याचे शाखा अभियंता गंगाधर हटवार यांनी दुजोरा दिला आहे. कालव्यातून निघालेल्या गाळ व केरकचऱ्याची अन्य जागेत विल्हेवाट लावण्याची गरज असून, हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, असे असले तरी हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आलेला नाही. यामुळे चर्चां सुरू झालेल्या आहेत.