शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे ...

नियोजन चुकले : यांत्रिकी विभागावर शेतकऱ्यांचे ताशेरे

चुल्हाड ( सिहोरा ) : चांदपूर जलाशयअंतर्गत येणाऱ्या कालव्यातील गाळ उपसा करण्याचे कामांना यांत्रिकी विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने सुरुवात केली असली तरी गाळ आणि केरकचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात आले नाही. यामुळे कालव्यातील गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी ताशेरे ओढले आहेत. यात शासनाच्या निधीचे वारे न्यारे होणार असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.

सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी १२ हजार हेक्टर आर शेतीला वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटपाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजकरिता पाटबंधारे विभागाचे कार्यलय आहे. चांदपूर जलाशयाचे पाणी वितरणकरिता स्वतंत्र दोन विभाग करण्यात आले आहेत. उजवा आणि डावा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून, स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. प्रत्येकी कालवाअंतर्गत ६ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणली जात आहे. पाणी वाटपाचे नियोजन करण्याचे आधी कालवे आणि नहरे स्वच्छ करण्यात येत आहेत.

खरीप आणि उन्हाळी धान पिकांचे लागवडकरिता पाणीवाटप करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ आणि नहरे खोलीकरणाची कामे करण्यासाठी जलसंपदा विभागाअंतर्गत ई निविदा काढण्यात येत आहेत. निविदा धारक स्वतःचे यंत्रामार्फत कालवे, नहरे आदी स्वच्छ व खोलीकरण करीत आहेत. कालव्यातील निघणाऱ्या गाळ व केरकचऱ्याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत आहे. कालवे व नहरातील गाळ, केरकचरा, खोलीकरण करण्याचे कामे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाअंतर्गत करण्यात येत आहेत. उजवा कालवा अंतर्गत मुख्य कालव्यातील गाळ व केरकचरा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उपसा करण्यात येत आहेत. कालव्यातील गाळ काठावर ठेवण्यात येत आहे. गाळ आणि केरकचरा पुन्हा कालव्यात जमा होत आहे. यामुळे शासनाच्या निधीचे वारे न्यारे करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यांत्रिकी विभागाअंतर्गत काठावरील माती मिश्रित गाळ ट्रॅक्टरच्या साहायाने अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. यांत्रिकी विभाग गाळ काढण्याची औपचारिकता करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जेसीबी मशीनचालकाला गाळ पुन्हा कालव्यात जमा होणार असल्याचे सांगितले. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे गाळ व केरकचरा काढताना ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. यात शासनाच्या निधीचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, गाळ उपसा करताना पारदर्शकता नाही. परिसरातील कालवे आणि नहरे गाळ व केरकचऱ्याने तुंबले आहेत. यामुळे जलद गतीने पाणी शेतशिवारात पोहोचत नाही. यानंतर शेतकऱ्यांची बोंबाबोंब सुरू होत आहे. शासनाने या बाबीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

सत्यतेला अधिकाऱ्यांचा दुजोरा

कालव्यातील मातीमिश्रित गाळ आणि केरकचरा उपसा करताना अन्य जागेत विल्हेवाट लावण्यात येत नाही. उपसा करण्यात आलेली गाळ कालव्याचे काठावर ठेवण्यात येत असल्याने पुन्हा कालव्यात जमा होणार आहे. यामुळे ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होणार आहे. या प्रकाराला उजव्या कालव्याचे शाखा अभियंता गंगाधर हटवार यांनी दुजोरा दिला आहे. कालव्यातून निघालेल्या गाळ व केरकचऱ्याची अन्य जागेत विल्हेवाट लावण्याची गरज असून, हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, असे असले तरी हा प्रकार यांत्रिकी विभागाचे निदर्शनास आलेला नाही. यामुळे चर्चां सुरू झालेल्या आहेत.