शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणपोईचे दर्शन झाले दुर्मिळ, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:14 IST

जनता तहानलेली : बाटलीबंद पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पूर्वी उन्हाळा सुरू झाला की, भंडारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व आठवडी बाजारात तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय व निमशासकीय कार्यालयात पाणपोई दिसायची. त्यामुळे लांब प्रवासात थकलेल्या व्यक्तींना अगदी सहज पाणपोईचे थंडगार पाणी मोफत प्यायला मिळत होते. परंतु, आज जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी पाणपोई दिसून पडली तरी पाणपोई कुठेच दिसत नाही. बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात पाणपोईचे दर्शनदेखील दुर्मीळ झाले असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकावर मात्र निःशुल्क पाण्याची सुविधा उपलब्ध दिसते. परंतु, त्या ठिकाणीसुद्धा अनेकदा परिसरात अस्वच्छता दिसून येते. प्रवाशांना पाणी पिण्याची इच्छा होत नाही.

नळाच्या तोट्या तुटल्या, ठोसल्या जातात काठ्यासार्वजनिक पाणी सुविधांची अनेकदा नागरिकांकडून दुरवस्था केली जाते. अनेकदा नळाच्या तोट्या तोडून त्यात काठ्या ठोसल्या जात असतात.

माठही दुर्मीळपूर्वी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा झाकलेले पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास अशी पाणपोई असायची. उन्हाळ्यात शहरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी अनेकदा भटकंती करावी लागते. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

खिशाला भुर्दंडपूर्वी जार आणि बाटलीबंद पाण्याचा फारसा वापर होत नव्हता. मात्र, अलीकडे जारच्या माध्यमातून पाणी विकत व सवलतीच्या दरात मिळू लागल्याने पाणपोईची पद्धत मागे पडू लागली आहे. पाणपोई नसल्याने पाणी घेऊन पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.

हॉटेलमध्ये पैसे देऊन विकत घ्यावे लागते पाणीचहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी सहज मिळत नाही. त्यामुळे विकतचे पाणी घेऊन प्यावे लागते. ज्यांना विकतचे पाणी घेऊन पिणे शक्य नाही अशा सामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसतात. त्यामुळे सामाजिक संस्था व राजकीय संघटनांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे.

१.५० लाख शहरात शुद्ध पाण्याची वानवाशहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. परंतु अनेक वॉर्ड व कॉलनीमध्ये शुद्ध पाण्यासाठी बोंबाबोंब आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याची ओरड आहे

बसस्थानकावर टाकीची अवस्था काय ?भंडारा शहरातील बसस्थानकावर पाणी पुरविण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था आहे. पाण्याची टाकीही नियमित स्वच्छ केली जात असल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होते.

भंडारा शहरात दूषित पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जार अथवा बाटलीबंद पाणी नागरिकांना घ्यावे लागते.- संजय भोयर, नागरिक.

टॅग्स :bhandara-acभंडारा