शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील फुटपाथ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:01 IST

शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

ठळक मुद्देअपघाताची भीती : व्यवसायिकांच्या पर्यायी जागेचा विसर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. यातून अपघाताची भितीही वाढली आहे. काही वर्षापुर्वी अतिक्रमण हटविताना या व्यवसायीकांना पर्यायी जागेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाचाही प्रशासनाला विसर पडला आहे.भंडारा शहरात गल्लीबोळात अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. बेरोजगारीमुळे अनेकजण चरितार्थासाठी टपरी टाकून व्यवसाय करीत आहेत. शहराच्या राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका यासह शहराच्या विविध भागात लघु व्यवसायीकांनी फुटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडळी याठिकाणी आपला व्यवसाय करीत असतात. मात्र यात शहरातील फुटपाथ गायब झाले आहे. नागरिकांना रहदारीच्या रस्त्यावरून चालावे लागते.त्यामुळे कायम अपघाताची भिती असते. तसेच खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना आपली वाहने भर रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलीस वारंवार या व्यवसायीकांना सूचना देऊन दुकानासमोरील वाहने हटविण्याचा प्रयत्न करतात. परंतु वर्षानुवर्ष हीच परिस्थिती भंडारा शहरात कायम आहे.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे आधीच शहरवासीय जीव मुठीत घेऊन वाहने चालवितात. अहोरात्र या मार्गावरून भरधाव वाहतूक सुरू असते. त्यातच आता या महामार्गावर पार्किंग झोन झाले आहेत. तसेच अनेक व्यववसायीकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे याठिकाणी एकादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी धडाकेबाज कारवाई करून शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढले होते. त्यावेळी शहरातील रस्त्यानी मोकळा श्वास घेतला. परंतु बेरोजगारीचा प्रश्न पुढे आला. अनेकांचे व्यवसाय उध्वस्त झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.त्यावेळी या अतिक्रमणधारक व्यवसायीकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतर यावर कोणीही विचार केला नाही. परिणामी आज शहरातील सर्व फुटपाथ दुकानांनी गजबजले आहे.दुकानातील साहित्य रस्त्यावरशहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणचे दुकानदार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडत असल्याने दिसून येते. अनेक चौकात हॉटेल व्यवसायीक चक्क भट्टी लावून माल तयार करतात. तर स्टेशनरीसह विविध व्यवसायीक दुकानाच्यापुढे साहित्य मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेसह बांधकाम विभागाने याप्रकरणी लक्ष देवून अशा व्यवसायीकांना समज देण्याची गरज आहे.