शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

शहरातील फुटपाथ बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:01 IST

शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

ठळक मुद्देअपघाताची भीती : व्यवसायिकांच्या पर्यायी जागेचा विसर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. यातून अपघाताची भितीही वाढली आहे. काही वर्षापुर्वी अतिक्रमण हटविताना या व्यवसायीकांना पर्यायी जागेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाचाही प्रशासनाला विसर पडला आहे.भंडारा शहरात गल्लीबोळात अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. बेरोजगारीमुळे अनेकजण चरितार्थासाठी टपरी टाकून व्यवसाय करीत आहेत. शहराच्या राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका यासह शहराच्या विविध भागात लघु व्यवसायीकांनी फुटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडळी याठिकाणी आपला व्यवसाय करीत असतात. मात्र यात शहरातील फुटपाथ गायब झाले आहे. नागरिकांना रहदारीच्या रस्त्यावरून चालावे लागते.त्यामुळे कायम अपघाताची भिती असते. तसेच खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना आपली वाहने भर रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलीस वारंवार या व्यवसायीकांना सूचना देऊन दुकानासमोरील वाहने हटविण्याचा प्रयत्न करतात. परंतु वर्षानुवर्ष हीच परिस्थिती भंडारा शहरात कायम आहे.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे आधीच शहरवासीय जीव मुठीत घेऊन वाहने चालवितात. अहोरात्र या मार्गावरून भरधाव वाहतूक सुरू असते. त्यातच आता या महामार्गावर पार्किंग झोन झाले आहेत. तसेच अनेक व्यववसायीकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे याठिकाणी एकादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी धडाकेबाज कारवाई करून शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढले होते. त्यावेळी शहरातील रस्त्यानी मोकळा श्वास घेतला. परंतु बेरोजगारीचा प्रश्न पुढे आला. अनेकांचे व्यवसाय उध्वस्त झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.त्यावेळी या अतिक्रमणधारक व्यवसायीकांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतर यावर कोणीही विचार केला नाही. परिणामी आज शहरातील सर्व फुटपाथ दुकानांनी गजबजले आहे.दुकानातील साहित्य रस्त्यावरशहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणचे दुकानदार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडत असल्याने दिसून येते. अनेक चौकात हॉटेल व्यवसायीक चक्क भट्टी लावून माल तयार करतात. तर स्टेशनरीसह विविध व्यवसायीक दुकानाच्यापुढे साहित्य मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होवून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नगरपरिषदेसह बांधकाम विभागाने याप्रकरणी लक्ष देवून अशा व्यवसायीकांना समज देण्याची गरज आहे.