शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

By admin | Updated: December 18, 2014 00:34 IST

मानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे.

मोहन भोयर तुमसरमानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे. गोबरवाही डोंगरी बु. या जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारीच या मायलेकींचे सध्या वास्तव्य आहे. श्रीमंतीच्या वाटेवर चंद्रमोळीत वास्तव्याला असणाऱ्या मायलेकींकडे कुणाचेच लक्ष नाही. धकाधकीच्या आधुनिक जगात कुणाकडे वेळ व सहाय्य नाही असे दिसून येते.गोबरवाही डोंगरी बु. रस्त्याशेजारी हिगबाई सजदलाल उईके (६५) व तिची मुलगी दशमी उईके (२०) एका गवत व लाकडाच्या चंद्रमोळीत मागील पाच वर्षापासून वास्तव्याला आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे गोबरवाही येथील घर पडले. त्यानंतर हिगबाई आपली मुलगी दशमी सोबत चंद्रमोळीत वास्तव्याला आली. हिगबाईचे नाव दारिद्र्य रेषेखाली यादीत नाही. त्यांच्याकडे शेती नाही. उपजिवीकेकरिता हिगबाई मोलमजुरी करीत आहे. आजारी दशमीला सोडून जाता येत नाही. म्हणून या हंगामात चंद्रमोळीजवळील नहराखाली मोकळ्या जागेत धानाचे पीक घेतले. दोन ते तीन पोती धानाचे पीक या हंगामात आले. त्याची भरडाई करण्याकरिता पैसा नाही. काय करावे या विवंचनेत त्या सध्या आहेत.हिगबाईची चंद्रमोळी जमिनीशी समतल आहे. मागे पाणी आहे. गवत व इतर कचरा असल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा येथे सदैव भीती आहे. मुलगी दशमीला न कळणारा आजार आहे. नाकातून व डोळ्यातून सतत पाणी पसरत असतो. एकदा नागपूर येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेले होते. पुन्हा तो आजार बळावला आहे. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण दशमीने घेतले आहे. हिगबाई रात्री आपल्या चंद्रमोळीत एकटीच राहते. मुलगी दशमीला सुरक्षितेकरिता शेजारच्या घरी रात्री पाठविते. आजार बरा कसा होईल ही चिंता हिगबाईला सतावत आहे.गोबरवाही डोंगरी बु. मार्ग श्रीमंतीचा मार्ग आहे. या मार्गावर जयप्रसिद्ध मॅग्नीजच्या खाणी आहेत. मोठे अधिकारी, कंत्राटदार तथा कर्मचारी याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. परंतु एकाही सहृदय माणसांचे लक्ष या चंद्रमोळीकडे गेले नाही. खनिज विकास निधीतून कोट्यवधींचा निधी मॉईल प्रशासन दरवर्षी देण्याचा दावा करते. चंद्रमोळीत वास्तव्य करणाऱ्या मायलेकींना एक निवारा बांधून देण्याची गरज आहे.गोबरवाही ग्रामपंचायतीचेही येथे दुर्लक्ष असून बीपीएल यादीत नाव समाविष्ट करणे व निवारा बांधून देण्याची गरज आहे.