शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

आजारी मायलेकींचे चंद्रमोळीत वास्तव्य

By admin | Updated: December 18, 2014 00:34 IST

मानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे.

मोहन भोयर तुमसरमानवाच्या तीन गरजांपैकी निवारा ही एक अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. एका आजारी मायलेकींना नाईलाजाने निवाऱ्याअभावी चंद्रमोळीत थंडीत कुडकुडत जीवन जगावे लागत आहे. गोबरवाही डोंगरी बु. या जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारीच या मायलेकींचे सध्या वास्तव्य आहे. श्रीमंतीच्या वाटेवर चंद्रमोळीत वास्तव्याला असणाऱ्या मायलेकींकडे कुणाचेच लक्ष नाही. धकाधकीच्या आधुनिक जगात कुणाकडे वेळ व सहाय्य नाही असे दिसून येते.गोबरवाही डोंगरी बु. रस्त्याशेजारी हिगबाई सजदलाल उईके (६५) व तिची मुलगी दशमी उईके (२०) एका गवत व लाकडाच्या चंद्रमोळीत मागील पाच वर्षापासून वास्तव्याला आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे गोबरवाही येथील घर पडले. त्यानंतर हिगबाई आपली मुलगी दशमी सोबत चंद्रमोळीत वास्तव्याला आली. हिगबाईचे नाव दारिद्र्य रेषेखाली यादीत नाही. त्यांच्याकडे शेती नाही. उपजिवीकेकरिता हिगबाई मोलमजुरी करीत आहे. आजारी दशमीला सोडून जाता येत नाही. म्हणून या हंगामात चंद्रमोळीजवळील नहराखाली मोकळ्या जागेत धानाचे पीक घेतले. दोन ते तीन पोती धानाचे पीक या हंगामात आले. त्याची भरडाई करण्याकरिता पैसा नाही. काय करावे या विवंचनेत त्या सध्या आहेत.हिगबाईची चंद्रमोळी जमिनीशी समतल आहे. मागे पाणी आहे. गवत व इतर कचरा असल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा येथे सदैव भीती आहे. मुलगी दशमीला न कळणारा आजार आहे. नाकातून व डोळ्यातून सतत पाणी पसरत असतो. एकदा नागपूर येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेले होते. पुन्हा तो आजार बळावला आहे. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण दशमीने घेतले आहे. हिगबाई रात्री आपल्या चंद्रमोळीत एकटीच राहते. मुलगी दशमीला सुरक्षितेकरिता शेजारच्या घरी रात्री पाठविते. आजार बरा कसा होईल ही चिंता हिगबाईला सतावत आहे.गोबरवाही डोंगरी बु. मार्ग श्रीमंतीचा मार्ग आहे. या मार्गावर जयप्रसिद्ध मॅग्नीजच्या खाणी आहेत. मोठे अधिकारी, कंत्राटदार तथा कर्मचारी याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. परंतु एकाही सहृदय माणसांचे लक्ष या चंद्रमोळीकडे गेले नाही. खनिज विकास निधीतून कोट्यवधींचा निधी मॉईल प्रशासन दरवर्षी देण्याचा दावा करते. चंद्रमोळीत वास्तव्य करणाऱ्या मायलेकींना एक निवारा बांधून देण्याची गरज आहे.गोबरवाही ग्रामपंचायतीचेही येथे दुर्लक्ष असून बीपीएल यादीत नाव समाविष्ट करणे व निवारा बांधून देण्याची गरज आहे.