शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टीचे काश्मीर उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:46 IST

वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.

ठळक मुद्देपर्यटनाची मोठी संधी। भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झाडीपट्टीचे काश्मिर आज उपेक्षित झाले आहे.भंडारा हा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीत श्रीमंत असा जिल्हा आहे. पूर्वी या प्रदेशाला गोंडवण म्हणत. आता त्याला झाडीपट्टी म्हणून संबोधले जाते. वैनगंगेच्या तिरावर वसलेल्या या जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा लाभला आहे. निसर्ग समृद्धीने नटलेला भंडारा जिल्हा विविधतनेमुळे मोहक आणि वैभवसंपन्न आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. प्रांतगंगा म्हणून या प्रदेशाची ओळख असून आंभोरा येथे मराठीतील आद्यग्रंथ विवेकसिंधू ग्रंथाची निर्मिती झाली. या ग्रंथाचे रचयिता आद्यकवी मुकुंदराज यांचे येथे वास्तव्य होते. वैनगंगा व इतर लहान मोठ्या नऊ नद्या आपल्या कुशीत वसवून उत्तरेस डोंगराळ सातपुडा पर्वतमाला आहे. त्यात गायमुख, चांदपूर, गायगुरी डोंगराचा समावेश आहे. उत्तरेकडील उंचवट्याचा प्रदेश सातपुडा पर्वतरांगेत भिवसेन, कोका टेकड्या आहेत.आपल्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशा शांत, रमणीय, ऐतिहासीक तिर्थक्षेत्र म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीचे काश्मिर आणि महाराष्ट्राचे स्पेन म्हणून ही भूमी ओळखली जाते. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालिचा, खळखळणाऱ्या नद्या, निसर्गरम्य जलाशय, किल्ले, प्राचीन व ऐतिहासिक वास्तू, वन्यप्राणी आणि जैववैविधता येथे मुबलक आहेत. त्यामुळेच भंडारा जिल्हा पर्यटन चक्रवर्ती सिद्ध होऊ शकतो. परंतु सध्या शासन आणि प्रशासनाचे जिल्ह्याच्या पर्यटनाकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे.भंडारा जिल्ह्यात गोंड राजे बख्तबुलंदशाह द्वारे निर्मित सुंदर व वास्तूशिल्पांचा ऐतिहासिक आंबागड किल्ला, सानगडी, पवनी, प्रतापगड, भंडारा येथील किल्ले प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे. विदर्भाची काशी म्हणून पवनी प्रसिद्ध आहे. अड्याळ येथील हनुमान मंदिर, भंडाराचे भ्रृशुंड गणेश मंदिर, प्रतापगडचे मंदिर व दरगा, माडगी येथील नृसिंह टेकडी, कोका अभयारण्य, चांदपूर, आंभोरा, कोरंभी, पांडे महल, रावणवाडी जलाशय, बंदरझिरा, नागझिरा, हत्तीडोई, गोसेखुर्द धरण असे एक ना अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. परंतु आजही येथे सुविधा नसल्याने पर्यटक पाठ फिरवितात. जाणीवपूर्वक प्रयत्न करून पर्यटकांना येथे आणले तर रोजगाराची मोठी संधी जिल्ह्यात निर्माण होऊ शकते.तांदळाची पेठभंडारा हा जिल्हा संपूर्ण राज्यात तांदळाची पेठ म्हणून ओळखली जाते. येथील शेतकरी भाताचे मुख्य पीक घेतात. सर्वाधिक तलावांचा जिल्हा म्हणूही भंडाराची ओळख आहे. या जिल्ह्याला आद्यकवी मुकुंदराज, महानुभावाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचा पावनचरण स्पर्श झाला आहे. सम्राट अशोक, राजे बख्त बुलंदशाह, राजे रघुजी भोसले, पवन राजा यासारख्या शूरविरांच्या शौर्याचा व पराक्रमाचा हा जिल्हा आहे.शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचा जिल्ह्याचा मोठा लौकीक आहे. झाडाझुडपांची बोली म्हणजेच झाडीबोली. साकोली परिसर झाडीबोलीचे प्रमुख केंद्र होय. नाटक, दंढार, तमाशा, भारुड असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा या सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळाचा मेळ घालणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यटन अभ्यासक

टॅग्स :Natureनिसर्ग