शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आयुष्यमान भारत' योजनेच्या नोंदणीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:54 IST

'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची गैरसोय : जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवर होणार एक लाख ३४ हजार कुंटुबांची नोदणी

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ही योजना देशभर लागू केली. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचाराकरिता या योजनेतून पाच लाखांची मदत करण्यात येते. या योजनेत एक हजार ३५० आजारांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. यातून दीड लाखापर्यंतच मदत मिळते.अलीकडेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी कुटुंब आणि त्यातील सदस्यांची यादी सरकारकडून प्रसिध्द करण्यात आली असून लाभार्थ्यांना तसे पत्र प्राप्त झाले आहेत.पत्रानुसार लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी जिल्ह्यात असलेल्या पाच केंद्रावर नोंदणीसाठी भेट दिली असता त्या केंद्रावर लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. लाभार्थी सकाळपासून रात्री ७ वाजतापर्यंत रांगेत असूनही त्यांची नोंदणी होत नसल्याने त्यांच्यात हिरमोड होत आहे. नोंदणीदरम्यान लिंक फेलमुळे नोंदणी ठप्प होत आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.अनेक केंद्रावर अरेरावी करुन आपली नोंदणी व्हावी यासाठी हमरीतुमरी होताना दिसून येते. एका केंद्रावर गर्भवती महिला भोवळ येवून पडल्याची घटना झाली आहे. काही लाभार्थी उपाशीच केंद्रावर येत असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचेही सांगण्यात येते. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीची गरजजिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची नोंदणी होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्याने पाच केंद्रावर नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी उसळत आहे. लाभार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर घेणे आवश्यक आहे.योजनेच्या नोंदणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय या सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात डॉ. भोंडेकर रुग्णालय, डॉ. नाकाडे दवाखाना, डॉ. रंगारी रुग्णालय यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी ही पाच केंद्र असली तरी सेतु केंद्राद्वारे देखील नोंदणी करता येऊ शकते. इंटरनेट बिघाडामुळे कामात व्यत्यय येत आहे. लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रयत्न केले जातील.- प्रमोद खंडातेशल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा