शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'आयुष्यमान भारत' योजनेच्या नोंदणीसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:54 IST

'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची गैरसोय : जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवर होणार एक लाख ३४ हजार कुंटुबांची नोदणी

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : 'आयुष्यमान भारत' योजनेसाठी जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार ४४८ कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर ही नोंदणी होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळपासून आलेल्या लाभार्थ्यांची रात्री ७ वाजतापर्यत नोंदणी न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागत असल्याने त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ही योजना देशभर लागू केली. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचाराकरिता या योजनेतून पाच लाखांची मदत करण्यात येते. या योजनेत एक हजार ३५० आजारांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. यातून दीड लाखापर्यंतच मदत मिळते.अलीकडेच आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी कुटुंब आणि त्यातील सदस्यांची यादी सरकारकडून प्रसिध्द करण्यात आली असून लाभार्थ्यांना तसे पत्र प्राप्त झाले आहेत.पत्रानुसार लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी जिल्ह्यात असलेल्या पाच केंद्रावर नोंदणीसाठी भेट दिली असता त्या केंद्रावर लाभार्थ्यांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. लाभार्थी सकाळपासून रात्री ७ वाजतापर्यंत रांगेत असूनही त्यांची नोंदणी होत नसल्याने त्यांच्यात हिरमोड होत आहे. नोंदणीदरम्यान लिंक फेलमुळे नोंदणी ठप्प होत आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.अनेक केंद्रावर अरेरावी करुन आपली नोंदणी व्हावी यासाठी हमरीतुमरी होताना दिसून येते. एका केंद्रावर गर्भवती महिला भोवळ येवून पडल्याची घटना झाली आहे. काही लाभार्थी उपाशीच केंद्रावर येत असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचेही सांगण्यात येते. जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीची गरजजिल्ह्यात केवळ पाच केंद्रावर आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची नोंदणी होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी असल्याने पाच केंद्रावर नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी उसळत आहे. लाभार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर घेणे आवश्यक आहे.योजनेच्या नोंदणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय या सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात डॉ. भोंडेकर रुग्णालय, डॉ. नाकाडे दवाखाना, डॉ. रंगारी रुग्णालय यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी ही पाच केंद्र असली तरी सेतु केंद्राद्वारे देखील नोंदणी करता येऊ शकते. इंटरनेट बिघाडामुळे कामात व्यत्यय येत आहे. लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रयत्न केले जातील.- प्रमोद खंडातेशल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा