शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी करा मनसोक्त, पण कोरोना नियमांचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या एकदम कमी झाली. प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलास मिळाला. आता दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्यातच प्रशासनाने सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत नागरिक मनसोक्त खरेदी करणार आहे. गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते. भंडारा शहरातील मेन लाईन मोठ्या बाजारमध्ये तर गत दोन दिवसांपासून तुफान गर्दी झाली आहे. अनेक दुकानात पाय ठेवायला जागा नाही. त्यातच आता प्रशासनाने शुक्रवारी आदेश निर्गमित करून रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांना होणार आहे. परंतु खरेदी करताना सद्य:स्थितीत कुणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्क तर बेपत्ताच झाला आहे. फिजिकल डिस्टन्सिंगही कोणी पाळत नाही. अशा स्थितीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. सहकुटुंब दिवाळीची खरेदी करीत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग जवळजवळ नाहीत जमा आहे. जिल्ह्यात केवळ चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व जण बिनधास्त झाले आहे. मात्र, होणारी गर्दी प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना खरेदी करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्यावसायिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु यानंतरही बाजारात कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही.

नियमांना तिलांजली धोक्याची घंटाकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक जण भयभीत होता. मास्क लावून आणि सॅनिटायझर सोबत ठेवूनच बाहेर पडत होता. परंतु आता असे चित्र कुठेही दिसत नाही. नाकावरून हनुटीवर आणि तेथून मास्क बेपत्ता झाला आहे. कुणीही मास्क लावताना दिसत नाही. शासकीय कार्यालयात जायचे असेल तर खिशात मास्क बाळगणारे अनेक जण आहे. गर्दी करून खरेदी करणे आणि नियमांना तिलांजली देणे धोक्याची घंटा ठरू शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार