शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

पाण्यासाठी शिवसेनेचा आज चक्काजामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:52 IST

धोक्यात आलेले धानपीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर गुरुवार ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

ठळक मुद्देनिवेदन : पेंचचे पाणी धानासाठी सोडा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धोक्यात आलेले धानपीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडले नाही तर गुरुवार ४ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.गत महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भंडारा तालुक्यासह जिल्ह्यातील भात उत्पादक हवालदिल झाले आहेत. पेंच प्रकल्पाला पाण्याची मागणी करूनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खुर्शीपार येथे शेतकऱ्यांचा संताप मंगळवारी दिसून आला. आता शिवसेनेने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा तालुक्यापर्यंत पोहचले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनचा इशारा देण्यात आला.भंडारा तालुका आणि लगतच्या परिसरातील ९ हजार हेक्टर क्षेत्रातील धानपिकाला जीवदान देण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी दोषी अधिकाºयांच्या वेतनातून रक्कम कपात करण्यात यावी, पेंचचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि तहसीलदारांवरही गुन्हे दाखल करावे अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.निवेदन देताना संजय रेहपाडे, अनील गायधने, सुरेश धुर्वे, मयूर लांजेवार, प्रभू हटवार, विलास लिचडे, नरेश झलके, अनील कढव, चेतन भुरे, हेमचंद भुरे, नरेश लांजेवार, राजेश सार्वे, शशीकांत आकरे, मुकेश ठवकर, नीळकंठ मानापुरे, रणजित आकरे, रामचंद्र बुरडे, प्रसाद कुकडकर, अनील चकोले आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.शेतकरी संतप्तपेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यास प्रशासन दिरंगाई करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक चक्काजाम आंदोलनातून दिसून येत आहे. यानंतरही प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे सद्यातरी दिसत आहे.