शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

शिवणी, पालडोंगरी, रेंगेपार ग्रा.पं. ठरल्या विजेत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:37 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्वच्छता स्पर्धेचा निकाल घोषित : विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी, शिवणीबांधची निवड

आॅनलाईन लोकमतभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.विजेत्या ग्रामपंचायतीमध्ये लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून ग्रामपंचायत पालडोंगरी द्वितीय तर ग्रामपंचायत रेंगेपार (कोहळी) व तृतीय क्रमांकाची ठरली आहे. या विजेत्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाख रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष पुरस्कारासाठी विरली (बुज.), रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती विजेत्या ठरल्या आहेत.सन २०१७-१८ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.निवड करण्यात आलेल्या तिन्ही ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायती या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरल्या होत्या. त्यामध्ये भंडारा पंचायत समिती अंतर्गत रावणवाडी व दाभा, मोहाडी पंचायत समिती अंतर्गत पालडोंगरी व नेरी, तुमसर पंचायत समिती अंतर्गत सितेपार व उमरवाडा, लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी व रेंगेपार (कोहळी), साकोली पंचायत समिती अंतर्गत वडद व शिवणीबांध, लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आसोला, व विरली (बुज) तर पवनी पंचायत समिती अंतर्गत सावरला व भावड या ग्राम पंचायतींचा समावेश होता.सदर ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी २२ मार्च रोी जिल्हास्तरीय चमूच्यावतीने पूर्ण करण्यात आली. शुक्रवारला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आले.विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून विशेष पुरस्कारात कुटूंब कल्याण या विषयात स्व.आबासाहेब खेडकर या पुररस्कारासाठी लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत, पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी या विषयात स्व.वसंतराव नाईक पुरस्कारासाठी ग्रामपंचायत रावणवाडी तर सामाजिक एकता विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी शिवणीबांध ग्रामपंचायत मानकरी ठरली आहे.