शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शिवणी, पालडोंगरी, रेंगेपार ग्रा.पं. ठरल्या विजेत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:37 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्वच्छता स्पर्धेचा निकाल घोषित : विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी, शिवणीबांधची निवड

आॅनलाईन लोकमतभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले.विजेत्या ग्रामपंचायतीमध्ये लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून ग्रामपंचायत पालडोंगरी द्वितीय तर ग्रामपंचायत रेंगेपार (कोहळी) व तृतीय क्रमांकाची ठरली आहे. या विजेत्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाख रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष पुरस्कारासाठी विरली (बुज.), रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती विजेत्या ठरल्या आहेत.सन २०१७-१८ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती.निवड करण्यात आलेल्या तिन्ही ग्रामपंचायतींपैकी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायती या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरल्या होत्या. त्यामध्ये भंडारा पंचायत समिती अंतर्गत रावणवाडी व दाभा, मोहाडी पंचायत समिती अंतर्गत पालडोंगरी व नेरी, तुमसर पंचायत समिती अंतर्गत सितेपार व उमरवाडा, लाखनी पंचायत समिती अंतर्गत शिवणी व रेंगेपार (कोहळी), साकोली पंचायत समिती अंतर्गत वडद व शिवणीबांध, लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आसोला, व विरली (बुज) तर पवनी पंचायत समिती अंतर्गत सावरला व भावड या ग्राम पंचायतींचा समावेश होता.सदर ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी २२ मार्च रोी जिल्हास्तरीय चमूच्यावतीने पूर्ण करण्यात आली. शुक्रवारला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आले.विशेष पुरस्कारासाठी विरली, रावणवाडी व शिवणीबांध या ग्रामपंचायती पात्र ठरल्या असून विशेष पुरस्कारात कुटूंब कल्याण या विषयात स्व.आबासाहेब खेडकर या पुररस्कारासाठी लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत, पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी या विषयात स्व.वसंतराव नाईक पुरस्कारासाठी ग्रामपंचायत रावणवाडी तर सामाजिक एकता विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी शिवणीबांध ग्रामपंचायत मानकरी ठरली आहे.