शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

साईभक्त पायी निघाला शिर्डीला

By admin | Updated: September 13, 2015 00:30 IST

‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, ...

तिसऱ्यांदा निघाला वारीवर : विजयादशमीला शिर्डीला पोहोचणार भंडारा : ‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, हे जगदाता साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन’, या भजनातील वाक्याप्रमाणे आणि साईबाबांवर निस्सिम भक्ती असलेल्या ओडिसा राज्यातील एका भक्ताने ओडिशा ते शिर्डी असा पायदळ प्रवास सुरू केला आहे. बिपत तारण दास (४५) रा. बोलोनी, जि.केवझर, ओडिशा असे या साईभक्ताचे नाव आहे. ओडिसावरून दोन हजार किमी लांब असलेल्या शिर्डीला जाण्यासाठी बिपत दास हा अनवानी पायाने निघाला आहे. १६ आॅगस्ट रोजी सुरू झालेला त्याचा पायी प्रवास अडीच महिन्यानंतर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शिर्डी येथे संपणार आहे. याच प्रवासादरम्यान, काल बिपत दास यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यांचा मुक्काम तुकडोजी पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात होता. डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन आलेल्या बिपतशी चर्चा केली असता साईभक्तीमागील पार्श्वभूमी सांगितली. आपण सधन कुटुंबातील असून मला जेव्हा साईबाबांचा साक्षात्कार होतो, तेव्हा मी अनवानी पायाने शिर्डीच्या प्रवासाला निघतो. सधन कुटुंबातील असल्याने वाहतुकीची अनेक साधने आहेत. तरीसुद्धा एकाही वाहनाचा उपयोग करीत नाही. यापुर्वी शिर्डीला दोनदा पायी गेलेलो असून ही तिसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिसा ते शिर्डी या पायी प्रवासात तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लागतो. दररोज ४० कि.मी. पायी प्रवासानंतर एखाद्या मंदिरात मुक्काम करणे. सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणे असा दिनक्रम आहे. एका लहान बॅगेत कपडे व अन्य सामान आहेत. मुक्कामी असताना कुणाचीही मदत न घेत स्वत:ची व्यवस्था स्वत:च करीत असल्याचे सांगितले. दि. ११ सप्टेंबर रोजी त्यांनी भंडाऱ्याहून शिर्डीसाठी प्रस्थान केले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी मुक्काम करीत दसऱ्याच्या दिवशी ते शिर्डीत पोहोचतील. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने डोक्यावर साईबाबांची पालखी घेऊन तो बोलोनी या मूळ गावाकडे रवाना होईल. परतताना गावोगावात साईबाबांचा प्रसाद वाटत जाणार असून हा प्रवाससुद्धा अडीच महिन्याचा असेल. सन २०१० मध्ये त्यांनी बोलोनी ते शिर्डी हा प्रवास असा रात्रंदिवस केला होता. त्यावेळी शिर्डी येथे पोहोचण्यासाठी एक महिना १६ दिवसांचा कालावधी लागल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)