शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक काळातील ‘शीलाप्रकस्थ’ आजही दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:36 IST

पवनी तालुक्यात प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षित व उदासिन धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास झालेला नाही. परिणामी ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत नाही. याचे उत्तम उदाहरण खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ (डोलमेंट्स) यांचे देता येईल.

ठळक मुद्देपुरातत्व विभाग लक्ष देईना : तर मिळू शकते पर्यटनाला चालना

चरणदास बावणे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यात प्राचीन, मध्ययुगीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाधी आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षित व उदासिन धोरणामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा विकास झालेला नाही. परिणामी ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येत नाही. याचे उत्तम उदाहरण खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ (डोलमेंट्स) यांचे देता येईल.प्राचीन कालातील वैभवाची साक्ष देणारे वाकाटाक काळातील शीलाप्रकस्थ कोंढा गावापासून ७ ते ८ किमी अंतरावर खैरी (तेलोता) व पिंपळगाव नि. या गावात मिळतात. हे प्राचीन अवशेष ऊण, वारा, पाऊस याचा मार सहन करीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खैरी (तेलोता) येथील शिलाप्रकस्थ यामध्ये गावकरी जनावराचा चारा तणस भरुन ठेवतात. तसेच या ऐतिहासिक वास्तूला जनावरे बांधतात. यामुळे या ऐतिहासिक वास्तूला धोका निर्माण झाला आहे.शिलाप्रकस्थ ही एक समाधी आहे. महाराष्टÑाच्या प्राचीन इतिहासात वाकाटक घराणे इ. स. २७० ते इ.स. ५५० या काळात विदर्भात होऊन गेले. या घराण्याच्या राजधान्या प्रवरपूर (पवनार) नंदीवर्धन (नगरधन), वत्सगुलम (वाशिम) ह्या राहिल्या आहेत. वाकाटक राजा दुसरा ऋद्रसेन यास गुप्तसम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याने आपली मुलगी प्रभावती गुप्ता दिली होती. असा प्राचीन इतिहास आहे. अशा समृध्द वाकाटक काळात मनुष्य मेल्यानंतर पुरले जात असे तेथे चुलीच्या आकाराचे ती मोठे दगड मांडून त्यावर भलेमोठे गोलाकर सपाट दगड ठेवण्याची प्रथा होती. त्याला शिलाप्रकस्थ म्हणत.इ.स. पूर्व १ हजार वर्षापुर्वी महापाषाण काळात देखील मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात. त्याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढिग विशिष्ट पध्दतीने ठेवला जाई, असे अवशेष विदर्भात नागपूर जिह्यात माहूरझरी आणि भडारा जिल्हात खैरी (तेलोता), पिंपळगाव (नि) येथे प्रापत होतात. पुरातत्व विभागाने या शिलाप्रकस्थाला मंडप तयार करुन सुरक्षा भिंत करणे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. हा ठेवा अनमोल आहे. हे जपणे आवश्यक आहे. पिंपळगाव (नि) येथे ग्रा.पं. ने शिलाप्रकस्थाला तारेचे कंपाऊंड तयार केले आहे. पण खैरी (तेलोता) येथे शिलाप्रकस्थ बोळी (तलाव) व शेतात हे उघड्यावर आहे. खैरी (तेलोता) येथे दोन शिलाप्रकस्थ आहेत एक बोलीत खुल्याजागेत आहेत येथे पावसाळ्यात पाणी साचले असते. बोळीचे पाणी आटल्यानंतर गावकरी शिलाप्रकस्थाला लागून तणसाचे ठीग ठेवतात. तसेच शिलाप्रकस्थामध्ये तणस भरुन ठवेतात. त्यास जनावरे बांधतात. दुसरा शिलाप्रकस्थ बोळीला लागून श्ोतात आहे. येथे चुलीचे तीन भव्य दगड आहेत. त्यावरील मोठा गोल दगड सध्या नाही. यासंबंधी गावकºयांना विचारले असता खुप वर्षापासून वरचे दगड नसल्याचे सांगितले. तीन दगडातून सध्या कडूनिंबाचे झाड उभे आहे. दुरदुरचे पर्यटक यांना पाहण्यासाठी येतात. पण त्यांचे देखभाल नसल्याने नाराजी व्यक्त करतात.पवनी तालुक्यात पर्यटन स्थळात सिंदपूरीचा महासमाधी स्तूप, गोसे प्रकल्प आणि पवनी शहर आणि खैरी (तेलोता), पिंपळगाव नि. येथील शिलाप्रकस्थ हे दोन ठिकाणे यांचा समावेश होऊ शकते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. पवनी शहराच्या बाबतीत माहिती प्रसिध्द होणे आश्यक आहे. हे नगर प्राचीन आहे. तसेच एक वैभवशाली नगर म्हणून मौर्य, सातवाहन, वाकाटक, शुंग, चालुक्य, राष्टÑकुट व मध्ययुगीन यादवकाळात प्रसिध्द शहर होते. येथे अनेकदा पुरातत्व विभागाने उत्खनन केले. त्यामध्ये नाणे, मातीची भांडी, बौध्द स्तूप आढळून आले आहे. सम्राट अशोक काळातील स्तंभ आजही पवनी शहरात आहेत. पवनी शहराला तसेच खैरी (तेलोता) व पिंपळगाव (नि.) येथील डोलमेंट्सला दोन हजार वर्षाचा इतिहास आहे. पवनी हे प्राचीन मंदिरे व बौध्द विहारासाठी प्राचीन काळापासून प्रसिध्द होते हे नगर मातीच्या परकोटने चारही बाजूने वेढलेली असून त्या परकोटास चार द्वार आणि आठ खिडकीवजा मार्ग आहेत. सध्या एकच द्वार सध्यास्थितीत आहे. या द्वारातून पवनी नगरीत प्रवेश करता येते. मातीच्या परकोटामुळे सभोवताली तळी, सरोवरे निर्माण झाली आहेत. त्यापैकी, कुºहाडा, बालसमुद्र, भाई तलाव उपलब्ध आहेत. वैनगंगा नदीच्या तीरावर दक्षीणेस ही नगरी आहे. येथे पायºयाचे घाट आहेत. तलाव, नदी यामध्ये पर्यटनास भरपूर वाव आहे. येथे बोटींगची सोय केल्यास पर्यटन पुन्हा वाढू शकते. मंदिरात मुरलीधर मंदिर, वैजेश्वर, राममंदिर, भुतेश्वर, पंचमुखी गणपती, पंचमुखी मारोती मंदिर व नागठाणी भरपुर आहेत. मुरलीधर मंदिराच्या शिखरावर सुवर्णचक्र उभारले आहे. जगन्नाथ टेकडीवर केलेल्या उत्खन्नात बौध्दकाळातील स्तंभ शिलालेख, स्तुप यांचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे दूरदूरचे पर्यटक जगन्नाथ टेकडीला भेट देण्यास येत असतात. पुरातत्व विभागाने पवनी शहर व खैरी (तेलोता), पिंपळगाव (नि) डॉलमेंट्सना संरक्षित स्थळ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.पर्यटन बस सुरु करणे आवश्यकपवनी तालुक्यातील पवनी, खैरी (तेलोता) पिपंळगाव (नि), अड्याळ, चकारा, गोसे (प्रकल्प), सिंदपूरी महासमाधी स्थळ या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या स्थळांना भेट देणारी पर्यटन बस एस.टी. महामंडळाने सुरु करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावकरी व पर्यटक यांना बसची सुविधा मिळेल. पवनी तालुक्यातील सर्वात दुर्लक्षीत स्थळे खैरी (तेलोता) पिपंळगाव (नि) येथील शिलाप्रकस्थ आहेत. यांना सभा मंडप तयार करुन सुरक्षाभिंत बांधणे आवश्यक आहे. पण पुरातन विभाग लक्ष देत नाही. तरी ऐतिहासिक दुर्लक्षित वास्तूचे संरक्षण करण्याची मागणी इतिहासप्रेमी पर्यटकप्रेमी लोकांनी केली आहे. तालुक्यातील अड्याळ हे देखील प्राचीन गाव आहे. येथे गावाच्या मध्यभागी हनुमानाची ९ फूट उंचीची मुर्ती आहे. ही मूर्ती प्राचीन वाकाटक काळातील असावी असा अंदाज आहे. सध्या अड्याळचे हनुमान मंदिर भव्य, सुंदर कलाकृती यांनी आकर्षक तयार केले आहे. तसेच अड्याळ जवळील निसर्गरम्य चकारा येथे प्राचीन महादेव मंदिर आहे. तसेच टेकडीवर बौध्द धर्मियांनी साधना केंद्र निर्माण केले आहे.पुरातन विभागाचे अधिकारी खैरी (तेलोता) येथे एकदा आले होते. त्यांनी सभामंडप व सुरक्षाभिंत बांधणार असल्याचे सांगितले. पण नंतर दोन तीन वर्षापासून ते आले नाहीत.- राजकुमार बावणेनागरिक रा. खैरी (तेलोता)