शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

बारदाणाअभावी केंद्र बनले शोभेचे

By admin | Updated: November 13, 2015 00:45 IST

दिवाळी पूर्व संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासन यशस्वी झाला खरा.

धान खरेदी पूर्णत: बंदच : विक्रीकरिता नेलेले धान केंद्रावरून माघारीराहुल भुतांगे तुमसरदिवाळी पूर्व संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासन यशस्वी झाला खरा. मात्र त्या आधारभूत केंद्रावर अजूनपर्यंत बारदानाच पोहचला नाही. तुर्तास पूर्णत: धान खरेदी बंदच असल्याने आधारभूत केंद्र शोभेची वास्तू बनली आहे. परिणामी विक्रीकरिता आणलेला धान शेतकऱ्यांना आल्यापावली परत नेण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दृश्य आहे.हलक्या धानाचे उत्पादन दिवाळीपूर्व निघून जाते. ते धान आधारभूत केंद्रावर विकून शेतकरी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु एक महिन्याच्या जवळपास कालावधी लोटून गेला तरी शासनाचा धान आधारभूत खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकरी नाईलाजास्तव आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात खुल्या बाजार विक्री करून आर्थिक तोटा सहन करीत होते. त्यामुळे विविध स्तरावर तात्काळ आधारभूत केंद्र सुरु होण्याची मागणी होत होती. अशातच शासनाची वचनपूर्ती रॅली जिल्ह्यात निघाली. त्यावेळी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले व लगबगीत आधारभूत केंद्राने कसलेही नियोजन नकताना दिवाळीपूर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी आधारभूत केंद्राची फिती कापून मोठ्या थाटात शुभारंभ केला व त्याचा प्रसारमाध्यमाद्वारे प्रचारही करण्यात आल्याने शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात शासनाचे प्रतिनिधी काही अंशी सफल झाले. आधारभूत केंद्र सुरु झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती होताच सहाचाकी, दहाचाकी वाहन, ट्रॅक्टरमध्ये धानाचे बोरे लादून आधारभूत केंद्रावर पोहचले. परंतु अजूनपर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने बारदाना (खाली बोरे) आधारभूत केंद्रावर पोहचते केले नाही. त्यामुळे धान खरेदी कसे करायचे या विवंचनेत आधारभूत केंद्राचे संचालक सापडले असून धान खरेदी पुर्णत: बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला धान परत न्यावा लागत आहे. दरम्यान वाहन भाडे, इंधन, हमाली आधीची बेरीज वजाबाकी करता शेतकऱ्यांना दुबार आर्थिक संकटात ढकलण्याचे महापाप शासनाच्या लोकप्रतिनिधींनी चालविल्याने शेतकऱ्यांची तर निराशा झाली उलट त्यांच्या रोषानेही परिसीमा गाठली आहे, हे यावरून दिसुन येत आहे.