शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:45 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : सामाजिक न्याय दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जनू हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय उदघाटनपर भाषणात खा. कुकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे होते तर ा्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, कावेरी नाखले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभण उपस्थित होते. जातपात, धर्म, वंश विसरुन समाज संघटित राहीला पाहिजे तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपणास घेता येईल. हाच खरा सामाजिक न्यायाचा उद्देश आहे असे खासदार कुकडे म्हणाले. आपण कुठल्याही जाती पंथाचे नसून सर्व प्रथम भारतीय आहोत, अशी भावना जागृत झाली पाहीजे. त्यासाठी समाज उत्थानाचे कार्य करा, असेही ते म्हणाले.सामाजिक समतेचे जनक, सर्व प्रथम आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करणारे महापुरुष म्हणजे राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे म्हणाले.अमृत बन्सोड म्हणाले, सामाजिक न्यायाची संकल्पना महात्मा फुले यांनी मांडली. त्यास मूर्तरुप राजर्षी शाहू महाराजांनी दिले. सर्व प्रथम आपल्या संस्थानात विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत झाली. मागासवगीर्यांना ५० टक्के आरक्षण आपल्या संस्थानात लागू केले. अस्पृश्यता नष्ट करुन समता प्रस्थापित केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभणे यांची भाषणे झाली.सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हयातील दादासाहेब गायकवाड पुरस्कार प्राप्त मिरा भट, समाज भूषण पुरस्कार प्राप्त विनोद मेश्राम, दलित मित्र अमृत बन्सोड, ज्ञानेश्वर खंडारे, इश्वर सोनवाने, बाळकृष्ण शेंडे व ब्ल्यु डायमंड सोशल वेल्फेअर इंस्टीटयुट, मोहाडी या समाजभूषण प्राप्त संस्थेचा सत्कार करण्यात आला. शासकीय वसतीगृहातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी तर आभार मुख्याध्यापक मेंढे यांनी मानले. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी समता दिंडीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी सहाय्यक आयुक्त आशा कवाडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते. ही दिंडी शिवाजी स्टेडियमपासून निघून सामाजिक न्याय भवनात समारोप झाला.