शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावात पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST

बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडा : उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत राहुल भुतांगे तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर ...

बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडा

: उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत

राहुल भुतांगे

तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला आहे. तालुक्यातील विहिरी, तलाव पूर्णतः आटले व बोरवेल सुद्धा बंद पडल्याने विशेषतः नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर तर आला आहेच त्याच बरोबर शेतकऱ्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.

तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बवनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणात आहे. त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंड्या वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र गत पावसाळ्यात पडलेला अत्यल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे

त्यावर शेती फिडरच्या भारनियमन मुळे शेतकऱ्यांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेद ने उन्हाळी हंगामात ऊस व धान पिक शेतात लावले परंतु विहारी तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बावनथडी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा आहे त्या पाण्याचा नदीपात्रात निचरा झाल्यास जलस्तर वाढून विहिरी ना पाणी येईल व पिकांना जीवनदान मिळेल मात्र शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून पाणी शेतकऱ्यांना मिळत नसेल व पाण्याअभावी शेतकऱ्यांचे उभे पीक मरत असतील तर त्या प्रकल्पाचा फायदा तरी काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे लोक प्रतिनिधीने याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.

कोट

आतापर्यंत शेतकऱ्यांनी आपले पीक कसेबसे वाचविले मात्र समस्या बिकट झाल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडवण्याकरिता लेखी पत्र दिले परंतु अद्याप पाणी सोडले गेले नाही परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहे.

- ठाकचंद मुंगूसमारे, तालुका अध्यक्ष रायुका