शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

तुमसर तालुक्यातील ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:08 IST

तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरीनींही गाठला तळ : नदीपात्र कोरडे, तलाव बनले क्रिकेटचे मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. अनेक गावात पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. बावनथडी धरण व कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने यापूर्वीच बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता एल्गार केला आहे.तुमसर तालुका धान उत्पादक तालुका असुन यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांनी लावला आहे. सध्या सूर्य आग ओकत असून विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक मोठी तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. कारली, बघेडा हे मोठे तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चिचोली जवळील तलाव पूर्ण कोरडा पडला असून त्याचे रुपांतर मैदानात झाले आहे. चांदपूर तलावातही पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे समजते.कडक उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. नदी, तलाव, कोरडे पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याच सुरु आहे. मे महिन्यात पाण्याकरिता टँकर लावण्याची गरज प्रशासनाला करावी लागण्याची अधिक शक्यता आहे. मानवासोबतच वन्यप्राण्यांची पाण्याकरिता भटकंती सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी समस्या निर्माण झाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाणीटंचाई व तीव्र पाणी टंचाईची गावे याची माहिती गोळा करणे सध्या सुरु आहे.बावनथडी धरणात उपलब्ध पाणी साठा २२.८५ टक्के असून धरणात पाण्याची पातळी ३३७ मीटर आहे. २१७ दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृतसाठा १०.५१ टक्के आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलबध आहे.बावनथडी धरणातून कारली जलाशयात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता भटकंती सुरु असून या गावात सर्व्हे करुन टंचाईग्रस्त गावांची यादी व आराखडा तयार करुन टँकरने पाणीपूरवठा करण्याची मागणीही डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता कटंगी, वारासिवनी येथील पठार संघर्ष समितीने एल्गार सुरु केला आहे. बावनथडी व कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग न केल्यास आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनी दिला आहे.बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.- क्षितीश मानवटकर,कार्यकारी अभियंता, भंडारा