शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
5
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
6
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
7
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
8
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
9
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
10
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
11
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
12
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
13
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:08 IST

तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरीनींही गाठला तळ : नदीपात्र कोरडे, तलाव बनले क्रिकेटचे मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. अनेक गावात पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. बावनथडी धरण व कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने यापूर्वीच बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता एल्गार केला आहे.तुमसर तालुका धान उत्पादक तालुका असुन यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांनी लावला आहे. सध्या सूर्य आग ओकत असून विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक मोठी तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. कारली, बघेडा हे मोठे तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चिचोली जवळील तलाव पूर्ण कोरडा पडला असून त्याचे रुपांतर मैदानात झाले आहे. चांदपूर तलावातही पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे समजते.कडक उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. नदी, तलाव, कोरडे पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याच सुरु आहे. मे महिन्यात पाण्याकरिता टँकर लावण्याची गरज प्रशासनाला करावी लागण्याची अधिक शक्यता आहे. मानवासोबतच वन्यप्राण्यांची पाण्याकरिता भटकंती सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी समस्या निर्माण झाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाणीटंचाई व तीव्र पाणी टंचाईची गावे याची माहिती गोळा करणे सध्या सुरु आहे.बावनथडी धरणात उपलब्ध पाणी साठा २२.८५ टक्के असून धरणात पाण्याची पातळी ३३७ मीटर आहे. २१७ दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृतसाठा १०.५१ टक्के आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलबध आहे.बावनथडी धरणातून कारली जलाशयात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता भटकंती सुरु असून या गावात सर्व्हे करुन टंचाईग्रस्त गावांची यादी व आराखडा तयार करुन टँकरने पाणीपूरवठा करण्याची मागणीही डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता कटंगी, वारासिवनी येथील पठार संघर्ष समितीने एल्गार सुरु केला आहे. बावनथडी व कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग न केल्यास आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनी दिला आहे.बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.- क्षितीश मानवटकर,कार्यकारी अभियंता, भंडारा