शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

तुमसर तालुक्यातील ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:08 IST

तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरीनींही गाठला तळ : नदीपात्र कोरडे, तलाव बनले क्रिकेटचे मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. अनेक गावात पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. बावनथडी धरण व कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यप्रदेशातील पठार संघर्ष समितीने यापूर्वीच बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता एल्गार केला आहे.तुमसर तालुका धान उत्पादक तालुका असुन यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांनी लावला आहे. सध्या सूर्य आग ओकत असून विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. अनेक मोठी तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. कारली, बघेडा हे मोठे तलाव कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. चिचोली जवळील तलाव पूर्ण कोरडा पडला असून त्याचे रुपांतर मैदानात झाले आहे. चांदपूर तलावातही पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे समजते.कडक उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. नदी, तलाव, कोरडे पडल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या एप्रिल महिन्याच सुरु आहे. मे महिन्यात पाण्याकरिता टँकर लावण्याची गरज प्रशासनाला करावी लागण्याची अधिक शक्यता आहे. मानवासोबतच वन्यप्राण्यांची पाण्याकरिता भटकंती सुरु आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी समस्या निर्माण झाल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाणीटंचाई व तीव्र पाणी टंचाईची गावे याची माहिती गोळा करणे सध्या सुरु आहे.बावनथडी धरणात उपलब्ध पाणी साठा २२.८५ टक्के असून धरणात पाण्याची पातळी ३३७ मीटर आहे. २१७ दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मृतसाठा १०.५१ टक्के आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणीसाठा उपलबध आहे.बावनथडी धरणातून कारली जलाशयात पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता भटकंती सुरु असून या गावात सर्व्हे करुन टंचाईग्रस्त गावांची यादी व आराखडा तयार करुन टँकरने पाणीपूरवठा करण्याची मागणीही डॉ. पंकज कारेमोरे यांनी केली आहे.बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याकरिता कटंगी, वारासिवनी येथील पठार संघर्ष समितीने एल्गार सुरु केला आहे. बावनथडी व कवलेवाडा बॅरेजमधून पाणी विसर्ग न केल्यास आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनी दिला आहे.बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.- क्षितीश मानवटकर,कार्यकारी अभियंता, भंडारा