शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

शुद्ध पाण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाला प्रस्ताव पाठवा

By admin | Updated: April 17, 2016 00:29 IST

शहरातील नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी वितरीत केले जात आहे. शुध्द व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे...

हिवराज उके यांची मागणी: अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशाराभंडारा : शहरातील नागरिकांना दूषित पिण्याचे पाणी वितरीत केले जात आहे. शुध्द व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे आणि ते पुरविण्याची संपुर्ण जवाबदारी भंडारा नगर परिषदेची आहे. याकडे दुर्लक्ष करणे हा फार मोठा गुन्हा आहे. शुध्द पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी केली. अन्यथा पुन्हा उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.१५ मार्चपर्यंत सुजल निर्मल योजनेचा प्रस्ताव पूर्ण करुन स्वर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत नवीन वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास मंजुरी व अंमलबजावणीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी २० फेबु्रवारी रोजी पाणी प्रश्नावरील संयुक्त बैठकीत नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. परंतु अजूनपर्यंत तसा प्रस्ताव पाठविला गेला नाही. आपण कितीही लिकेजेस दुरुस्ती केले तरी जो पर्यंत पिण्याच्या पाण्याची जूनी-जिर्ण झालेली पाण्याची यंत्रणा पूर्णपणे बदलत नाही आणि नवीन यंत्रणा बसवत नाही, तोपर्यंत दुषित पाण्याची समस्या सुटू शकत नाही. भूमीगत गटार योजना व मलनिस्सारण योजना कार्यान्वित होवू शकत नाही. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण करुन देण्यासाठी शासनाला त्वरीत प्रस्ताव पाठवा, अन्यथा दुषित पाण्याचे निवारण व शुध्द पाण्याच्या उपाययोजनेसाठी पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक हिवराज उके यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनाची प्रत अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसह सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)सागर तलावाचे सौंदयीकरण कराशहरातील चांदणी चौक परिसरात असलेल्या सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम मंजुर करुन लवकर करण्यात यावे, मानवता शाळा पासून ते चांदणी चौक मार्गे काजीनगर गेट पर्यंतचा प्रलंबित रस्ता व नालीचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक हिवराज उके यांनी केली आहे. सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मागील दोन वर्षापासून म्हणजे सन २०१४ पासून नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. परंतु कधी निधीची कमतरता तर, कधी शासन निर्णयाचा आधार घेवून प्रस्ताव परत करण्यात आला. सागर तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान करुन शहराच्या सुंदरतेमध्ये सौंदर्यीकरण करुन हातभार लावावा. तसेच मानवता शाळा ते काजीनगर गेट पर्यंतचा रोड व नालीच्या बांधकामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना व मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक हिवराज उके यांनी केली आहे.