शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:50 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसबका साथ-सबका ग्राम-सबका विकास : २०१२ पर्यंत विविध योजना राबविणार

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत या गावांमध्ये १४ ते २१ एप्रिल या सप्ताहादरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.त्याचबरोबर आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, अजीवीका दिवसही साजरे करण्यात येणार आहेत.याशिवाय स्वच्छ भारत दिवस, श्रमदान, शौचालय बांधणे व ते वापरणेबाबत जनजागृती रॅली, राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करणे, विशेष ग्रामसभा आयोजित करणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, स्त्री बळकटीकरण सामाजिक विकास आदी बाबतीचे चर्चासत्र आयोजित करणे बालपंचायत आयोजित करून त्यात रांगोळी, चित्रकला, हस्तकला, याबाबत निबंध वक्तृत्व स्पर्धा घेणे, शासकीय विषयांवरील चर्चासत्र व पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वयंसहायता महिला बचत गट, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेचे लाभार्थी, शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकर्स, सामाजिक संस्था, यांनाही सामावून घेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निवड करण्यात आलेली गावे'ग्रामस्वराज अभियान' अंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात गावांमध्ये अशोकनगर, सावरी, टेकेपार, गोलेवाडी, जांभळी, मासलमेटा, कान्हळगाव (सोमनाळा) गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये २१ एप्रिलपर्यत विविध योजना राबविणार येत आहेत.