शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
4
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
5
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
6
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
7
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
8
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
9
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
10
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
11
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
12
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
13
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
14
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
15
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
16
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
17
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
18
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
19
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
20
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज

ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:50 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसबका साथ-सबका ग्राम-सबका विकास : २०१२ पर्यंत विविध योजना राबविणार

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत या गावांमध्ये १४ ते २१ एप्रिल या सप्ताहादरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.त्याचबरोबर आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, अजीवीका दिवसही साजरे करण्यात येणार आहेत.याशिवाय स्वच्छ भारत दिवस, श्रमदान, शौचालय बांधणे व ते वापरणेबाबत जनजागृती रॅली, राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करणे, विशेष ग्रामसभा आयोजित करणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, स्त्री बळकटीकरण सामाजिक विकास आदी बाबतीचे चर्चासत्र आयोजित करणे बालपंचायत आयोजित करून त्यात रांगोळी, चित्रकला, हस्तकला, याबाबत निबंध वक्तृत्व स्पर्धा घेणे, शासकीय विषयांवरील चर्चासत्र व पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वयंसहायता महिला बचत गट, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेचे लाभार्थी, शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकर्स, सामाजिक संस्था, यांनाही सामावून घेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.निवड करण्यात आलेली गावे'ग्रामस्वराज अभियान' अंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात गावांमध्ये अशोकनगर, सावरी, टेकेपार, गोलेवाडी, जांभळी, मासलमेटा, कान्हळगाव (सोमनाळा) गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये २१ एप्रिलपर्यत विविध योजना राबविणार येत आहेत.