शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

५५ ग्रामपंचायतींची निवड

By admin | Updated: September 29, 2014 23:00 IST

वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब असतील अशा ५५ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे.

जनजागृती : राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा प्रारंभभंडारा : वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब असतील अशा ५५ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी देण्याकरिता २३ आॅक्टोंबरपर्यत राज्यभर राष्ट्रीय स्वच्छता अभियान या नावाने जनसंवाद माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात नुकतीच पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी, तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यपालन अधिकारी एस. एच. आडे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डि. एस. बिसेन यांनी केले. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची माहिती देवून अभियान दरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता एस. एच. आडे यांनी मार्गदर्शन करुन अभियानाची अंमलबजावणीबाबत माहिती देताना राष्ट्रीय स्तरावरुन ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी २ आॅक्टोंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावे यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने केंद्र शासनाच्यावतीने हे अभियान २३ आॅक्टोबरपर्यत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. राहुल द्विवेदी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरीय गट समन्वयक यांनी अंगणवाडी सेविका, निर्मल दूत, रोजगार सेवक, जल सुरक्षक, परिचर यांना सोबत घेऊन दररोज ३० घरांना भेटी देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्यांचा वापर करणे, शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा हे संदेश देऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी जास्तीत जास्त गृहभेटी करण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर बैठक घेऊन ग्रामस्तरावरील नियोजन करण्यास सांगितले. तालुकास्तरावर शालेय विद्यार्थ्यांची सामूहिक प्रभातफेरी काढून, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यास सांगितले. जेणे करुन अभियानाची प्रचार प्रसिध्दी करता येईल. या अभियान कालावधीत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था व प्रथम शौचालयाचे बांधकाम सुरु करणाऱ्या कुटुंबाचा सत्कार करणे तसेच सर्वाधिक गृहभेटी करणाऱ्या बोआरसी व सीआरसी यांचा सत्कार करणे या बाबीवर विशेष भर देण्यात येणार आहे. या बैठकीला भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत), गट समन्वयक (पाणी व स्वच्छता) तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापूरे, अंकुश गभणे, गजानन भेदे, नीलिमा जवादे, नेत्रदीपक बोडखे व प्रशांत मडामे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)