शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

सोंड्याटोला उपसासिंचन प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: June 11, 2014 23:07 IST

सुमारे ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सोंड्याटोला सिंचन या प्रकल्पाची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर आहे. परिणामी या प्रकल्पाच्या मुख्य ठिकाणी कुणालाही सहजतेने पोहोचता येत आहे.

अप्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात : प्रकल्पाचे हस्तांतरणही रखडलेरंजित चिंचखेडे - सिहोरासुमारे ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सोंड्याटोला सिंचन या प्रकल्पाची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांवर आहे. परिणामी या प्रकल्पाच्या मुख्य ठिकाणी कुणालाही सहजतेने पोहोचता येत आहे. याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात न केल्यास भविष्यात  धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘लोकमत’ने या प्रकल्पाच्या आतील परिसराची पाहणी केली असता त्याठिकाणी काही मुले पोहताना आढळून आली. बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प बांधण्यात आला आहे. मागील सात वर्षापासून बावनथडी नदीपात्रातून या प्रकल्पाने पाण्याचा उपसा सुरू केला आहे. शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाने तारले आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकऱ्यांना संजिवनी मिळाली आहे. दरम्यान यावर्षी प्रकल्पाला विविध समस्यांनी घेरले आहे. यंदा पाण्याचा उपसा होणार किंवा नाही हे सांगण्यासाठी प्रकल्पस्थळी कुणी अधिकारी नाही. प्रकल्प सुरू होण्यासाठी निधीची गरज आहे. कंत्राटदाराच्या हातात प्रकल्पाची सुत्रे आहेत. या प्रकल्पाचे हस्तांतरण झालेले नाही. ६० कोटीच्या शासकीय मालमत्तेसाठी जबाबदार अधिकारी नाहीत. या प्रकल्प स्थळात विद्युत पुरवठा सुरू आहे. परंतु प्रकल्प स्थळात संपूर्ण काळोख आहे. अंधारात सुरक्षा करण्यात येत आहे. या प्रकल्प स्थळाचा परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलात वन्यप्राणी आहेत. बिबट या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. यामुळे अप्रशिक्षीत सुरक्षा रक्षक भयग्रस्त वातावरणात राहत आहेत. या प्रकल्पाला विज पुरवठा करण्यासाठी ३३/६.६ केव्हीचे उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. कवलेवाडा येथून विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला आहे. यासाठी मीटर रूम तयार करण्यात आली आहे. या रूमपर्यंत वीज पुरवठा थांबला आहे. उपकेंद्रात वीज पुरवठा नाही. विद्युत उपकेंद्रात बिघाड असल्यामुळे समस्या निकाली निघाली नाही. नदीपात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी कालावधी असला तरी समस्या निकाली काढण्यात येणार किंवा नाही, हे सांगणारे कुणी नाही. या प्रकल्प स्थळाला भेट दिली असता, सुरक्षा रक्षक हे तिथे पोहण्याचा आनंद घेत होते. एकाही सुरक्षा रक्षकाने प्रकल्प स्थळात दाखल होणाऱ्या प्रतिनिधीची चौकशी केली नाही. प्रकल्प स्थळी महत्वपूर्ण उपकरणे आहेत. त्यासाठी स्वतंत्र कक्ष असून या कक्षात कुणालाही सहजतेने प्रवेश करता येऊ शकतो. या प्रकल्प स्थळात प्रवेश निर्बंध असे फलक नाही. कोट्यवधीचा प्रकल्प यंत्रणेने दुर्लक्षित केला आहे. यामुळे उपकरणाची नासधुस झाली आहे. दुरूस्तीचा ताण आता शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.