शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: June 2, 2015 00:43 IST

ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो.

वाहन चालविण्याचा परवाना नसतो : पोलीस दप्तरी नोंद न होता प्रकरण होते रफादफा, पालकांचे अपत्यांकडे दुर्लक्ष, पोलीसही असतात लक्ष्मीच्या शोधातलाखनी : ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. या वाहन चालकांमुळे असुरक्षा वाढली असून उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे केवळ शहराकडे लक्ष असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागात आता प्रत्येक घरी दुचाकी आली. कुटुंबातील लहानात लहान मुलगा वडीलधाऱ्यांकडे वाहन चालविण्यासाठी हट्ट धरतो. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकीची चावी देतात. यातून अनेकदा अपघात घडतात. पाचव्या वर्गात शिकणारा व ओठावर मिशीची कोर न आलेला मुलगाही गावातून ‘फ्लॅश’ मारत सुसाट वेगाने दुचाकीने जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. सोबत आपल्या अप्रशिक्षित मित्रालाही गावातून, शाळेसमोरून जाण्यासाठी वाहन चालविण्यास सहकार्य करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, काहींकडे ट्रक आहेत. त्यापैकी बहुतांश चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवितात. त्यात किरकोळ व गंभीर अपघात दररोज कुठे न कुठे घडतात. मात्र कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करून वाहन मालक-चालक जागीच तडजोड करून सुटका करवून घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात त्या अपघाताची नोंदच होत नाही. ग्रामीण भागात आता प्रत्येकाकडे दुचाकी आली. मात्र परवाना प्रत्येकाकडे नसतो. तरीही रस्त्याने वेडी-वाकडी वळणे घेत भरधाव वेगाने दुचाकी चालविली जाते. परिणामी अनेकदा अपघात घडतात. कधी सुसाट वेगाने जाणारेच एखाद्या अपघातात आपला जीवही गमावतात. या अप्रशिक्षित दुचाकीस्वारांमुळे जनावरेही जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. ग्रामीण रस्ते आता असुरक्षित बनले आहे. मात्र तरीही चालक परवाना तपासणीचे काम ग्रामीण भागात होत नाही. ग्रामीण भागातील काही ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसुलीपुरते फाट्यावर उभे राहून वाहन चालकांना अडवितात. त्यांच्याकडून पैसे वसूल करून सोडून दिले जाते. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले पोलिसांनाही न घाबरता पैसे देऊन आपली सुटका करवून घेतात. पोलिसांचा वाहतूक विभाग शहरातील वाहतूक सांभाळतो. ग्रामीण भागात मात्र वाऱ्यावरच असतो. (तालुका प्रतिनिधी)