शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

१० पोलिसांवर ५१ हजार लोकांची सुरक्षा

By admin | Updated: December 16, 2015 00:44 IST

सिहोरा पोलीस ठाण्याच्या मंजुरीला अनेक वर्षे लोटली ; परंतु अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.

पोलिसांचे पदे रिक्त : बपेरा पोलीस चौकीची मंजुरी रखडली, बिट अमलदारांना अतिरिक्त प्रभारचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा पोलीस ठाण्याच्या मंजुरीला अनेक वर्षे लोटली ; परंतु अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. रिक्त पदांमुळे १० पोलिसांवर ५१ हजार नागरिकांची सुरक्षा करण्याची वेळ आली असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे.आंतरराज्यीय सिमेवर असलेल्या सिहोरा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची कैफियत वेदनादायक आहे. या ठाण्याच्या पूर्व आणि दक्षीणेला हाकेच्या अंतरावर नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्हयाच्या सिमा लागून आहेत. या शिवाय सिहोरा परिसरात वाढती गुन्हेगारी असतांना शासन स्तरावर देण्यात येणाऱ्या सुविधा मात्र बोटावर मोजण्याइतपत आहेत. पुरग्रस्त गावे, जंगलव्याप्त परिसर तथा भौगोलिक दृष्ट्या विस्तारलेला परिसर लक्षात घेता पोलीस ठाण्यात सुविधा उपलब्ध करण्याची ओरड आहे. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व पोलीस तथा कर्मचारी असे एकुण ५५ पदे आहेत. परंतु हा आकडा आजवर कधी पुर्ण झालेला नाही. रिक्त पदे तथा प्रभारावर गावांची जबाबदारी असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था दिसून येते. पोलीस ठाण्यात सद्यस्थितीत पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व २७ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दर दिवशी १२-१५ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावतात. उर्वरित पोलीस ठिकाणी बंदोबस्त, समन्स वाटप, रजा आरोपीची शोध मोहिम तथा न्यायालयात हजेरी लावत आहेत. यामुळे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. एखादी मोठी घटना घडल्यास कर्मचारी बोलविण्यात येत आहेत. या पोलीस ठाण्यात महिला पोलिसांची समस्या आहे. ५ महिला पोलिसांची गरज असतांना फक्त २ कार्यरत आहेत. या पैकी १ महिला पोलीस रजेवर असल्याने कर्तव्य बजावतांना एका महिला पोलिसाला कसरत करावी लागत आहे. वायरलेस मध्ये काम दिल्यास महिला आरोपींना अटक करतांना डोकेदुखी ठरत आहे. दोष पोलीस कर्र्मचाऱ्यांना नाही. रिक्त पदे असल्याने अतिरिक्त तणावात कर्तव्य बजाविण्याची वेळ आली आहे. बपेरा, महालगाव, मोहगाव (खदान), चादंपुर आणि सिहोरा असे एकुण ५ बिट या पोलीस ठाणे अंतर्गत आहेत. एका बिट अमलदाराकडे दोन बिट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिरिक्त गावांचा प्रभार देण्यात आल्याने दमछाक सुरु झाली आहे. २८ पदे अद्यापही रिक्त आहेत. याशिवाय पोलीस ठाण्यात प्रस्तावित महिला बंदीगृह आहे. पंरतु अद्याप बांधकाम झाले नाही. पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला प्रसादन गृहाची सोय करण्यात आली नाही. यामुळे महिलांची कुंचबना होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागा उपलब्ध असतांना वसाहत बांधकाम झाले नाही. प्रशासकीय कामकाज करतांना इमारतीत खोल्यांचा अभाव आहे. यामुळे गोंधळाची स्थिती आहे. स्वतंत्र नविन इमारत मंजुर करण्याची ओरड आहे. परंतु जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत नाही. मध्यंतरी पोलीस ठाण्याला हायटेक करण्याची चर्चा होती. नंतर मात्र ही चर्चा हवेतच विरली. सुविधा आणि रिक्त पदामुळे नागरिकांना न्याय देण्यात विलंब होत आहे. यामुळे असंतोषाचे खापर पोलीस प्रशासनावर फोडले जात आहेत. या असंतोषाचा फटका ठाणेदार व पोलिसांना बसला आहे. प्रशासकीय कामकाज तथा फिर्यादींना जलदगतीने न्याय देण्यासाठी पोलिसांची रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया पोलिसांनी दिल्या आहेत. या सदंर्भात अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही. (वार्ताहर)