शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

जिल्ह्यात दुसऱ्यांदा एकही पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा तेरा हजारी पार गेला आहे. मात्र संसर्गीत व्यक्तीला पुन्हा परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा तेरा हजारी पार गेला आहे. मात्र संसर्गीत व्यक्तीला पुन्हा परत त्याची लागण झालेली नाही, ही एक चांगली गोष्ट समोर आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार६१२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १३ हजार ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र यापैकी एकही जणांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोनामुळे गत वर्षभरात ३२८ जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीत २०५ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. बरे झालेल्यांनी स्वतःहून काळजी घेतल्याने ते बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत. या बाबीचा अन्य लोकांनीही धडा घ्यायला हवा. मास्क, सोशल डिस्टंसिंग, नियमित हात धूणे आणि सॅनिटायझरचा वापर हाच काेरोनापासून मुख्य बचाव असल्याचेही पूर्ण झालेले व्यक्ती आता सांगत आहेत.

कोरोनाबाबत जिल्हा आरोग्य विभागामर्फत सातत्याने जनजागृती केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी आकस्मिक भेट देत तपासणी करण्यात येत आहे. क्वारंटाइन झालेल्यांनी स्वत:हून काळजी घेतल्याने पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही.

- डॉ. निखिल डोकरीमारे, आरएमओ बाह्य विभाग जिल्हा रूग्णालय भंडारा

बॉ्क्स

मास्क, सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय

कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे. मास्कचा सदैव आणि योग्य वापर करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करीत असते. साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी २० सेकंदापर्यंत व्यवस्थित हात धूतल्यास संसर्गाचा फैलाव होणार नाही. याची काळजी प्रत्येकानेच घ्यावी लागणार आहे. साबण व पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तिन्ही नियमांचे पालन केल्यास कोरोनावर सहज नियंत्रण मिळविणे शक्य होइल.

अंटीबाडी किती महिन्यांपर्यंत प्रभावी

काेराेनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. प्लॉझ्मा दान करून अन्य रूग्णाला जीवदान देण्याचेही कार्य सुरू आहे. कोरोना झालेल्यांमध्ये ॲंटीबॉडी तयार झाल्यानंतर प्लॉझ्माच्या रूपाने ते किमान महिन्याभरापर्यंत प्रभावी राहू शकते, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावर आजही संशोधनात्मक कार्य सुरूच आहे.