शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील किलबिलाट पुन्हा होणार सुरू

By admin | Updated: June 27, 2017 00:34 IST

नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसाठी शाळेचा पहिला दिवस म्हणजे थोडी एक्साइटमेंट...ङ्घथोडी भीती...नवीन स्कूलबॅग, नवीन पुस्तके, ...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसाठी शाळेचा पहिला दिवस म्हणजे थोडी एक्साइटमेंट...ङ्घथोडी भीती...नवीन स्कूलबॅग, नवीन पुस्तके, नवा युनिफॉर्म आणि सोबतीला आई-बाबा असले तरी चिमुरड्यांची रडारड, आरडाओरड रुसव्या-फुगव्यांचा खेळ ठरलेलाच असतो, हे सर्व बघायला मिळणार आहे शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी. काही ठिकाणी पहिल्या दिवसाची उत्सुकता तर काही ठिकाणी शाळेच्या भीतीने बालकांचे आईला बिलगून रडणे, असे चित्र शाळेच्या आवारात एक भावनिक वातावरण निर्माण करणारे राहणार आहे. ‘नेमिचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेलाही याच महिन्यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्पादन घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्याच्या तारखेकडे, शाळेच्या घण घण आवाज करणाऱ्या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच.तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्याची ते वाट बघत असतील असे म्हणणे आश्चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र, नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी ओढ त्यांच्या मनात असते त्याचमुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्तके त्यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याच्या शासनाच्या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते. अर्ध्या किमतीत पुस्तकांची खरेदी बंदपूर्वी जेव्हा शाळेतून पुस्तक वाटप केल्या जात नव्हते तेव्हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्चे कंपनी शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारातून पुस्तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्तके जवळच्या मित्रांकडून अर्ध्या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्याची मजा आज नक्कीच नाही. पुस्तके मोफत मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकांना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांना अजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.मागच्या पानावरून पुढेअशा शाळेचा पहिला दिवस जरी नवीन दाखल होणाऱ्या चिमुरड्यांनी रडत-रडत काढला तरीही त्या रडण्यालाही एक वेगळी मजा असते. अशा चिमुरड्यांच्या आई-वडिलांनीही आपल्या बालपणी तेच केलेले असते. याचा अर्थ हे सारे ‘मागच्या पानावरुन पुढे’ असेच चालू असते. आपल्या जिल्ह्यातील शाळांतही नव्याने दाखल होणाऱ्या चिमुरड्यांची रडारड आणि पुढच्या इयत्तांत गेलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. शिक्षण खात्यातील अनागोंदी, शिक्षकांवरील शिक्षणबाह्य कामाचा ताण, शिक्षण संस्थांनी चालवलेला बाजार याचीही आता ओढताण वाढणार आहे. विद्यार्थ्यांचे बदलते जीवनशाळेच्या पहिल्या दिवसाची इतकी उत्सुकता आणि एवढा आपलेपणा का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वर्षी वयानुसार बदलत जातात. ज्यावेळी विद्यार्थी प्राथमिक स्तरावर असतो, तेव्हा या पहिल्या दिवशी नवीन दप्तर, नवीन ड्रेस, नवीन डबा आणि डब्यात मिळणारा नवीन खाऊ याचं आकर्षण, तर माध्यमिक स्तरावर नवीन वर्ग, नवे मित्र-मैत्रिणी, नवी वह्या-पुस्तके, त्यांचा दरवळणारा नवाकोरा गंध हे सारं अप्रुपचं असतं. पहिल्या दिवसाला शालेय जीवनात महत्वाचे स्थान असते. या शालेय जीवनाच्या पायावर विद्यार्थ्यांची इमारत उभी राहते. ती शाळा त्यांना लळा लावते.